अमरावतीत काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन
केंद्रातील भाजपा सरकारने घेतलेल्या तुघलकी निर्णयामुळे देशातील जनता भरडली जात आहे. महागाईने कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले असून, देशात अराजकता माजली असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.