thumbnail

VIDEO : महाड दुर्घटना : सरकार यातून काही बोध घेणार का?

By

Published : Jul 25, 2021, 2:19 PM IST

रायगड - काही वेळा नियती माणसावर इतकी रुसते की. ती त्याचं सर्वस्व हिरावून घेते अनं पाहता पाहता त्याचं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं. अशीच परिस्थिती निर्माण झालीय रायगडच्या महाडमधील तळई परिसरातील नागरिकांची. गेल्या ३ दिवसांपासून कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाने जोरदार तडाखा दिला. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी तळई गावात दरड कोसळली. अनं संपूर्ण गावच मातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. या दुर्घटनेत अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 42 जणांचे मृतदेह हाती आलेत. मात्र, 43 जण अजूनही बेपत्ता आहे. घटना घडल्यानतंर पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचंय, सरकार आराखडा तयार करणार आहे, अशी उत्तरे प्रत्येक सरकार देत असतं. मात्र, जर दरड कोसळण्याच्या घटना घडणारच असतील तर तेथील घरं तरी सुरक्षित स्थळी हलवणं सरकारला गरजेचं का नाही वाटत? नैसर्गिक आपत्तींपासून ते नागरिकांच्या संरक्षणापर्यंत सरकारला आधीच विशिष्ट योजना राबवावीशी का नाही वाटत? नागरिकांचा जीव सरकारसाठी कवडीमोल झालाय का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होताएत. तळई दुर्घटनेचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष आढावा.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.