निसर्गाची उधळण असणाऱ्या 'या' गावांवर डोंगर कोसळण्याची भीती, अनेक ठिकाणी भूस्खलन, पाहा ईटीव्ही ग्राउंड रिपोर्ट
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12698445-thumbnail-3x2-konkan.jpg)
महापुराच्या संकटानंतर सांगली जिल्ह्यात आणखी एक संकट उभे ठाकले आहे, ते म्हणजे दरडी कोसळण्याचे. शिराळा तालुक्यातल्या डोंगरी भागात दरड कोसळून गावं, वाड्या-वस्त्या गाडल्या जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास 50 हून अधिक वाड्या-वस्त्या दरड कोसळण्याच्या भीतीच्या छायेखाली जगत आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरज आहे, अन्यथा माळीण, तळीये, आंबेघर सारख्या दुर्घटनांची पुनरावृत्ती शिराळा तालुक्यात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भिती व्यक्त होत आहे, पाहुयात ईटीव्ही भारतचा हा ग्राउंड रिपोर्ट..