महाराष्ट्र

maharashtra

भारतचं टी२० विश्वषचकाचा विजेता, पाहा अंतिम सामन्यातील काही अविस्मरणीय क्षण - IND Vs SA final match

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 10:37 AM IST

भारतानं टी२० विश्वचषक जिंकल्याच्या आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत. फॉर्ममध्ये नसल्यामुळे टीका होणारे विराट कोहली, हार्दिक पांड्या यांनी अंतिम सामन्यात चांगली कामगिरी केली. तर या सामन्यात क्रिकेट प्रशिक्षक राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा टी२० मधील शेवटचा सामना ठरला. (IANS)
गेली सहा महिने टीकेचा धनी ठरलेला हार्दिक पांड्यानं मैदानावरच निवांतपणा अनुभवला. (IANS)
टी२० विश्वषचकाची ट्रॉफी घेऊन जल्लोष करताना भारतीय संघ, सोबत बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह आहेत. (IANS)
भारतीय संघाच्या विजयासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या प्रशिक्षक राहुल द्रविडनं विजयानंतर मोहिम फत्ते झाल्याची खूण दाखविली. (IANS)
अक्सार पटेल, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज यांनी भारतीय ध्वज हातात घेत संघाचा विजयाचा आनंद व्यक्त केला. (IANS)
भारतानं विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मानं जल्लोष केला. (IANS)
भारताच्या विजयानंतर हार्दिक पांड्याला आनंदाश्रू आवरले नाहीत. यावेळी त्याला रोहित शर्मासह इतर खेळाडुंनी सावरले. (IANS)
भारतीय संघानं प्रशिक्षक राहुल द्रविडला उचलून विजयाचा आनंद व्यक्त केला. (IANS)
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टी २० विश्वचषकमधून निवृत्त झाले आहेत. यावेळी दोन्ही खेळाडूंनी ट्रॉफी आणि तिरंगा घेत पोझ दिली. (IANS)
विराट कोहलीनं मैदानावरून घरी म्हणजे पत्नी अनुष्का शर्माला फोन केल्याची चर्चा होत आहे. (IANS)

ABOUT THE AUTHOR

...view details