महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

अचानक विमान कर्मचारी सामूहिक रजेवर! एअर इंडिया एक्सप्रेसची विमान सेवा ठप्प - Air India Express - AIR INDIA EXPRESS

एअर इंडिया एक्सप्रेसची 70 हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. विमान कर्मचारी बढती प्रक्रियेवरून नाराज झाल्यानं सामूहिक रजेवर गेल्याची सूत्रानं माहिती दिली.

Air India Express
Air India Express (Source - ANI)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 12:47 PM IST

नवी दिल्ली -एअर इंडिया एक्सप्रेसची ७० हून अधिक विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. कारण, वरिष्ठ विमान कर्मचारी ही सामूहिकपणे आजारी असल्याचं कारण सांगून सुट्टीवर गेले आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यानं अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी नियोजित असलेली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द झाली आहे. अनेक विमान कर्मचारी सुट्टीवर गेल्यानं विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्याचा सर्वाधिक फटका एअर इंडिया एक्सप्रेसला बसला आहे. याची नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं गांभीर्यानं नोंद घेतली आहे.

विमान कंपनीनं ही दिली प्रतिक्रिया-एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानं म्हटलं, " काही विमान कर्मचाऱ्यांनी शेवटच्या मिनिटाला आजारी असल्याची माहिती दिली. त्याचा परिणाम म्हणून विमान उड्डाणे उशिरा होणे आणि रद्द होण्याचे प्रकार घडले आहे. या घटनेमागं काय कारण आहे, हे समजावून घेण्यासाठी आम्ही विमान कर्मचाऱ्यांशी संपर्कात आहोत. आमची टीम समस्या दूर करण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे. त्यामुळे ग्राहकांची कमीत कमी गैरसोय होईल, असा विश्वास एअर इंडिया एक्सप्रेसच्या कर्मचाऱ्यानं व्यक्त केला. विमान उड्डाण रद्द झाल्यानंतर ग्राहकांना संपूर्ण पैसे अथा इतर विमान तिकिटाचे नियोजन करून देण्यात येईल.

कशामुळे कर्मचारी आहेत नाराज?नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील सूत्राच्या माहितीनुसार काही विमान कर्मचाऱ्यांनी विमान सेवा सुरू होण्यापूर्वी मोबाईल बंद करून ठेवले आहेत. दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यानं विमान उड्डाण रद्द करावी लागली आहेत. सूत्राच्या माहितीनुसार बढतीचा प्रश्न असल्यानं काही वरिष्ठ विमान कर्मचारी नाराज होते. कर्मचाऱ्यांची बढतीचे निकष हे कर्मचारी किती वरिष्ठ आहे ऐवजी किती गुणवत्ता बाळगून आहेत, यावर असणार आहे. त्यामुळे विमान कर्मचारी हे सामूहिकपणे रजेवर गेले आहेत. एअर इंडिया एक्सप्रेस एम्पलॉईज युनियननं (AIXEU) ही नोंदणीकृत कर्मचारी संघटना आहे. या संघनेत ३०० विमान कर्मचारी आहेत. या संघटनेनं दावा केला आहे की, चुकीच्या व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांचं नीतीधैर्य खचलं आहे. दरम्यान, टाटा ग्रुपची मालकी असलेल्या एअर एक्सप्रेसकडे ७३ विमान असून रोज ३६० विमान उड्डाणे होतात.

हेही वाचा-

मुंबई विमानतळावर व्हीलचेअरअभावी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; एअर इंडियाला तीस लाखांचा दंड

ABOUT THE AUTHOR

...view details