राहुल नार्वेकरांच्या निकालाने पक्षांतराची गाईडलाईनच दिली, उल्हास बापट यांची उपरोधिक प्रतिक्रिया - Ulhas Bapat Reaction

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:24 PM IST

पुणे Ulhas Bapat Reaction : सुमारे दिड वर्षापासून सुरू असलेल्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल अखेर आज लागला आहे. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची असून 16 आमदारही पात्र असल्याचा निकाल अध्यक्षांनी दिला आहे. यावर राज्यातील विविध नेते मंडळी यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहे. आता यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा अध्यक्षांनी जो निकाल दिला आहे त्यात दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरविण्यात आलं आहे. हे पाहता उद्धव ठाकरे हे पुन्हा कोर्टात जातील. आता १० वे शेड्युल काढून टाकले तरी चालेल. पक्षांतर होऊ नये, भ्रष्टाचार कमी होईल यासाठी हा कायदा झाला. पण आता पळवाटा काढण्याचं काम केलं जातं आहे. या निर्णयामध्ये अनेक चुका आहेत. आता जे व्हायचं ते जनतेच्या कोर्टात होईल. अध्यक्षांची राज्यपालांची आता विश्वासार्हता कमी झाली आहे, असं यावेळी बापट म्हणाले. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.