मुंबई - आलिया भट्टने हे नेहमी सांगितले आहे की, जेव्हाही तिला कुठल्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा ती वडिलांकडे मदतीसाठी जाते. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी तिच्या मनातील मोठी भीती त्यांनी दूर केल्याचे आलियाने एकदा सांगितले होते. आलियाने २०१२मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
खरंतर आलिया ही फिल्म इंडस्ट्रीतील महत्त्वाच्या परिवारातील सदस्य आहे. तरीदेखील तिच्या मनात यशाबद्दल भीती होती. पदार्पण करण्यापूर्वी आलिया २० वर्षांची होती आणि ती खूप नर्व्हस होती. शाहरुख खान होस्ट करीत असलेल्या एका शोमध्ये तिने आपल्या मनातील भीती कशी दूर झाली याचा किस्सा सांगितला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
शूटिंगच्या पहिल्या दिवशी आलिया लोक कसा प्रतिसाद देतील हा विचार करीत नर्व्हस झाली होती. स्वतःचे डोके शांत करण्यासाठी तिने आपल्या वडिलांना फोन केला. त्यांनी आलियाला ऑफिसमध्ये बोलावून घेतले. तिने ऑफिसमध्ये पाऊल टाकले तेव्हा तिची बहिण पूजा भट्ट आणि इमरान हाश्मी महेश भट्ट यांच्यासोबत बोलत बसले होते. यातच महेश यांनी आलियाला बोलायला सांगितले.... आणि सर्व काही ठिक झाले. तेव्हापासून आजपर्यंत आलियाने मागे वळून पाहिलेले नाही. आज ती बॉलिवूडची आघाडीची नायिका आहे.