ETV Bharat / city

अनेक शाळांनी HIV बाधित मुलांना प्रवेश नाकारले; म्हणून आम्ही... - गिरीश कुलकर्णी

author img

By

Published : Sep 17, 2019, 8:35 PM IST

"आम्ही एचआयव्ही बाधित मुलांच्या विकासात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. जेवण, कपडे यात काही कमी अधिक झाले तरी चालेल पण शिक्षणाबाबत काहीही तडजोड केली नाही. मात्र, अनेक शाळांनी एचआयव्ही बाधित मुलांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे अखेर आम्ही स्वतः विनाअनुदानित शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला.

ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन

पुणे - समाजातील एचआयव्ही बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचे मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलडाण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, "आम्ही एचआयव्ही बाधित मुलांच्या विकासात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. जेवण, कपडे यात काही कमी अधिक झाले तरी चालेल पण शिक्षणाबाबत काहीही तडजोड केली नाही. मात्र, अनेक शाळांनी एचआयव्ही बाधित मुलांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे अखेर आम्ही स्वतः विनाअनुदानित शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. यामागे मुलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे हा मुख्य उद्देश होता. मुलांना शिक्षण देताना आम्ही बालककेंद्री शिक्षणावर अधिक भर दिला."

वोपाच्या टीमने केलेल्या मदतीने शाळेतील मुलांना आनंदी बनवले आणि शाळेची गोडी लावली. याआधी ते शाळेपासून कारणे शोधून शाळेत येणे टाळायचे. मात्र, अभ्यासपूर्ण प्रशिक्षणामुळे मुले आणि शिक्षकांमध्ये मित्रत्वाचे नाते तयार झाले, असेही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केले. अहमदनगर येथे झोपडपट्टी भागात धडपडणाऱ्या एका शिक्षकांचे उदाहरण देत त्यांनी शाळेला कशाप्रकारे डिजिटल केले याचेही उदाहरण दिले. वोपाने मेहनत घेऊन अभ्यास करून काम केले. तंत्रज्ञानावर पकड असलेल्या या टीमविषयी शिक्षकांमध्ये विशेष आवड आहे. त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर मुलांचे अभिप्राय देखील घेतले. या अभिप्रायातून आपले काम तपासले."

सामाजिक संस्थांना महत्वाचा सल्ला -
वोपा या संस्थेचे भविष्य खूप चांगले असल्याचे सांगताना गिरीश कुलकर्णी यांनी स्वयंसेवी संस्थांना एक मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले, "स्नेहालय एकाचवेळी अनेक विषय घेत मोठ्या प्रकल्पांवर काम करत आले आहे. त्यात स्नेहालयला यशही येत गेले. त्यातून अनेक प्रकल्प घेण्याचा विश्वास वाढला. मात्र, त्यामुळे कामावरील लक्ष विभाजित होते. त्यातून कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो हा अनुभव आहे. म्हणूनच वोपाने आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी मोजक्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून काम करावे. ते नक्कीच एक आदर्श संस्था म्हणून पुढे येतील."

"स्वयंसेवी संस्थांच्या रेट्याने अनेक चांगले कायदे आले"
स्वयंसेवी संस्थांच्या कामातून तयार झालेल्या दबावातून, रेट्यातून सरकारने अनेक कायदे केले. त्यामुळे समाजातील अनेक बदल शक्य झाले, असेही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केले.

"स्वयंसेवी संस्थांमध्ये सर्व धर्माचं प्रतिनिधित्व असावं"
गिरीश कुलकर्णी म्हणाले, "संस्थांमध्ये पारदर्शकता असायला हवी. तेथे भारताचे चित्र दिसावे म्हणजेच सर्वधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायला हवे. संस्थांच्या कारभाराला पुढील पिढीकडे देखील हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आणि संस्थांकडे कामासाठी निधीची कमतरता आहे, तर मोजक्या संस्थांकडे प्रचंड पैसा आहे. ही विषमता देखील कमी करणे आवश्यक आहे."

शासन कमी पडते तेथे वोपासारख्या संस्थांची मोठी गरज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी राम यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "तरुणांमध्ये क्षमता आहेत, मात्र, या क्षमतांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करायला हवे. यासाठी सामाजिकदृष्ट्या संशोधन होणे देखील आवश्यक. काही ठिकाणी प्रशासन आणि शासन कमी पडते, अशावेळी वोपासारख्या स्वयंसेवी संस्थांची मोठी गरज आहे. वोपाचे काम महत्वाचे आहे. सर्व लोकांनी या कामात सहभागी व्हावे."

वोपाकडून 'शिक्षण आणि तरुणांचा विकास' यावर भरीव काम सुरू आहे. व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी आणि तरुण महत्वाचा असतो. म्हणूनच त्यांच्या विकासासाठी व्यवस्थेत सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे, असेही नवल राम यांनी नमूद केले.

"ग्रामीण भागात शिक्षणावर काम होणे अत्यावश्यक"

वोपाच्या वर्धापन कार्यक्रमात बोलताना बुलडाण्याचे शिक्षणाधिकारी शिवशंकर बाळसकारे म्हणाले, "ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात काम होण्याची गरज आहे. शहर आणि मोठ्या शाळांबाबत विशेष लक्ष दिले नाही तरी चालेल. मात्र, दुर्गम ठिकाणी ग्रामीण भागात शिक्षणावर मूलभूत काम होणं आवश्यक आहे."

यावेळी बाळसकारे यांनी शैक्षणिक संस्थांचे काम, शिक्षणावर होणारा कमी खर्च आणि मुलीची शाळेतील गळती यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "चांगलं काम करणाऱ्या संस्था नक्कीच आहेत. मात्र त्यांचं प्रमाण 30-35 टक्के इतकंच आहे. उरलेल्या 65 ते 70 टक्के शाळांवर काम करावं लागेल. दुसरीकडे शिक्षणावर अत्यंत कमी खर्च होत आहे. त्याचाही मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे."

"शाळांमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक"
शाळांमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण मोठे असून ते चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणा मुलांची गळती नाही असे सांगते. त्यासाठी प्रमाणपत्र देखील दाखवते. मात्र, मोठ्या प्रमाणात मुले शाळांपासून दूर शेतात, दुकानात, घरात कामे करत आहेत."

"शिक्षकांच्या यांत्रिक कामाला जिवंतपणा आला"
वोपाच्या कामाबद्दल बोलताना अनेक शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आम्ही शिक्षक यांत्रिकपणे काम करत होतो. मात्र आता वोपाच्या प्रशिक्षणाने आमच्या कामात जिवंतपणा आला आहे. आम्ही यांत्रिकपणा टाळून मुलांशी आनंदाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत."

पुणे - समाजातील एचआयव्ही बाधित मुलांना मुख्य प्रवाहातील अनेक शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिल्याचे मत स्नेहालय संस्थेचे प्रमुख गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते पुण्यात ओवेल्स ऑफ द पीपल असोसिएशनच्या (VOPA) वर्धापनदिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बुलडाण्याचे गटविकास अधिकारी शिव बारसाकले, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चव्हाण हेही उपस्थित होते.

गिरीश कुलकर्णी म्हणाले, "आम्ही एचआयव्ही बाधित मुलांच्या विकासात शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. जेवण, कपडे यात काही कमी अधिक झाले तरी चालेल पण शिक्षणाबाबत काहीही तडजोड केली नाही. मात्र, अनेक शाळांनी एचआयव्ही बाधित मुलांना प्रवेश दिले नाहीत. त्यामुळे अखेर आम्ही स्वतः विनाअनुदानित शाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवला. यामागे मुलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे हा मुख्य उद्देश होता. मुलांना शिक्षण देताना आम्ही बालककेंद्री शिक्षणावर अधिक भर दिला."

वोपाच्या टीमने केलेल्या मदतीने शाळेतील मुलांना आनंदी बनवले आणि शाळेची गोडी लावली. याआधी ते शाळेपासून कारणे शोधून शाळेत येणे टाळायचे. मात्र, अभ्यासपूर्ण प्रशिक्षणामुळे मुले आणि शिक्षकांमध्ये मित्रत्वाचे नाते तयार झाले, असेही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केले. अहमदनगर येथे झोपडपट्टी भागात धडपडणाऱ्या एका शिक्षकांचे उदाहरण देत त्यांनी शाळेला कशाप्रकारे डिजिटल केले याचेही उदाहरण दिले. वोपाने मेहनत घेऊन अभ्यास करून काम केले. तंत्रज्ञानावर पकड असलेल्या या टीमविषयी शिक्षकांमध्ये विशेष आवड आहे. त्यांनी प्रशिक्षण कार्यक्रमानंतर मुलांचे अभिप्राय देखील घेतले. या अभिप्रायातून आपले काम तपासले."

सामाजिक संस्थांना महत्वाचा सल्ला -
वोपा या संस्थेचे भविष्य खूप चांगले असल्याचे सांगताना गिरीश कुलकर्णी यांनी स्वयंसेवी संस्थांना एक मोलाचा सल्लाही दिला. ते म्हणाले, "स्नेहालय एकाचवेळी अनेक विषय घेत मोठ्या प्रकल्पांवर काम करत आले आहे. त्यात स्नेहालयला यशही येत गेले. त्यातून अनेक प्रकल्प घेण्याचा विश्वास वाढला. मात्र, त्यामुळे कामावरील लक्ष विभाजित होते. त्यातून कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो हा अनुभव आहे. म्हणूनच वोपाने आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी मोजक्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून काम करावे. ते नक्कीच एक आदर्श संस्था म्हणून पुढे येतील."

"स्वयंसेवी संस्थांच्या रेट्याने अनेक चांगले कायदे आले"
स्वयंसेवी संस्थांच्या कामातून तयार झालेल्या दबावातून, रेट्यातून सरकारने अनेक कायदे केले. त्यामुळे समाजातील अनेक बदल शक्य झाले, असेही गिरीश कुलकर्णी यांनी नमूद केले.

"स्वयंसेवी संस्थांमध्ये सर्व धर्माचं प्रतिनिधित्व असावं"
गिरीश कुलकर्णी म्हणाले, "संस्थांमध्ये पारदर्शकता असायला हवी. तेथे भारताचे चित्र दिसावे म्हणजेच सर्वधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व द्यायला हवे. संस्थांच्या कारभाराला पुढील पिढीकडे देखील हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आणि संस्थांकडे कामासाठी निधीची कमतरता आहे, तर मोजक्या संस्थांकडे प्रचंड पैसा आहे. ही विषमता देखील कमी करणे आवश्यक आहे."

शासन कमी पडते तेथे वोपासारख्या संस्थांची मोठी गरज : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

जिल्हाधिकारी राम यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, "तरुणांमध्ये क्षमता आहेत, मात्र, या क्षमतांच्या विकासासाठी आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी काम करायला हवे. यासाठी सामाजिकदृष्ट्या संशोधन होणे देखील आवश्यक. काही ठिकाणी प्रशासन आणि शासन कमी पडते, अशावेळी वोपासारख्या स्वयंसेवी संस्थांची मोठी गरज आहे. वोपाचे काम महत्वाचे आहे. सर्व लोकांनी या कामात सहभागी व्हावे."

वोपाकडून 'शिक्षण आणि तरुणांचा विकास' यावर भरीव काम सुरू आहे. व्यवस्थेत प्रत्येक विद्यार्थी आणि तरुण महत्वाचा असतो. म्हणूनच त्यांच्या विकासासाठी व्यवस्थेत सकारात्मक बदल होणे आवश्यक आहे, असेही नवल राम यांनी नमूद केले.

"ग्रामीण भागात शिक्षणावर काम होणे अत्यावश्यक"

वोपाच्या वर्धापन कार्यक्रमात बोलताना बुलडाण्याचे शिक्षणाधिकारी शिवशंकर बाळसकारे म्हणाले, "ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात काम होण्याची गरज आहे. शहर आणि मोठ्या शाळांबाबत विशेष लक्ष दिले नाही तरी चालेल. मात्र, दुर्गम ठिकाणी ग्रामीण भागात शिक्षणावर मूलभूत काम होणं आवश्यक आहे."

यावेळी बाळसकारे यांनी शैक्षणिक संस्थांचे काम, शिक्षणावर होणारा कमी खर्च आणि मुलीची शाळेतील गळती यावरही भाष्य केले. ते म्हणाले, "चांगलं काम करणाऱ्या संस्था नक्कीच आहेत. मात्र त्यांचं प्रमाण 30-35 टक्के इतकंच आहे. उरलेल्या 65 ते 70 टक्के शाळांवर काम करावं लागेल. दुसरीकडे शिक्षणावर अत्यंत कमी खर्च होत आहे. त्याचाही मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो आहे."

"शाळांमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण चिंताजनक"
शाळांमधील मुलींच्या गळतीचे प्रमाण मोठे असून ते चिंताजनक आहे. सरकारी यंत्रणा मुलांची गळती नाही असे सांगते. त्यासाठी प्रमाणपत्र देखील दाखवते. मात्र, मोठ्या प्रमाणात मुले शाळांपासून दूर शेतात, दुकानात, घरात कामे करत आहेत."

"शिक्षकांच्या यांत्रिक कामाला जिवंतपणा आला"
वोपाच्या कामाबद्दल बोलताना अनेक शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली. आम्ही शिक्षक यांत्रिकपणे काम करत होतो. मात्र आता वोपाच्या प्रशिक्षणाने आमच्या कामात जिवंतपणा आला आहे. आम्ही यांत्रिकपणा टाळून मुलांशी आनंदाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत."

Intro:Body:

state news


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.