ETV Bharat / city

नागपुरात आठ दिवसांच्या निर्बंधानंतर नियम व अटींसह आस्थापने सुरू - नागपूर लॉकडाऊन

सलग आठ दिवस उपराजधानी नागपुरात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यानंतर आजपासून प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमात काही अटी-शर्तींसह सूट देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी शहरातील लहान मोठी आस्थापने सुरू झाली आहेत, तर तब्बल आठ दिवसांनंतर नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसून आले.

नागपुरातील आस्थापने नियम व अटींसह सुरू
नागपुरातील आस्थापने नियम व अटींसह सुरू
author img

By

Published : Mar 22, 2021, 7:50 PM IST

Updated : Mar 22, 2021, 7:59 PM IST

नागपूर - सलग आठ दिवस उपराजधानी नागपुरात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यानंतर आजपासून प्रशासनाकडून लॉकडाऊनच्या नियमात काही अटी शर्तींसह सूट देण्यात आली आहे. त्यानुसार आज सकाळी शहरातील लहान मोठी आस्थापने सुरू झाली आहेत, तर तब्बल आठ दिवसांनंतर नागरिक रस्त्यांवर फिरताना दिसून आले. नियम शिथिल झाल्यामुळे अचानक रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोनाला पोषक वातावरण मिळत असल्याची तक्रार काही नागरिकांनी केली आहे.

आठ दिवसांच्या कडक संचारबंदीनंतर नागपुरात निर्बंध शिथील
नागपूर शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. १० दिवसांपूर्वी नागपुरात दर दिवसाला दीड ते दोन हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत होते. त्यावेळी १५ मार्च ते २१ मार्च दरम्यान पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कडक संचारबंदी लागू केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत दर दिवसाला कोरोना रुग्णांची संख्या ही तीन ते चार हजारांच्या घरात गेली असताना प्रशासनाकडून नियम आणखी कठोर केले जातील, अशी अपेक्षा असताना नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील नागरिकांमध्ये आणखीच बेफिकरी वाढली आहे. नव्या अटी शर्तींसह आजपासून शहरातील आस्थापने संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत, त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पुन्हा वर्दळ वाढल्याचे बघायला मिळत आहे हे ही वाचा - टीआरपी घोटाळा : अर्णबबाबत तपास यंत्रणांची भूमिका काय? मुंबई उच्च न्यायालय
..हे बंद राहणार -
शहरातील सर्व धार्मिक स्थळे आजपासून बंद ठेण्यात आली आहेत. मात्र नियमित पूजेसाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे तर लग्न समारंभावर बंधने कायम ठेवण्यात आली आहेत. याच बरोबर शहरातील उद्याने, शाळा महाविद्यालये, शिकावणी वर्ग, आठवडी बाजार, जलतरण केंद्र, व्यायाम शाळा आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
..हे सुरू राहणार -
अत्यावश्यक सेवेत मोडणारे सर्व आस्थापणे नियमित सुरू राहणार आहेत. किराणा दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर रेस्टॉरंट, हॉटेल्स, खाद्यगृहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दूध दुकानांना देखील सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. दुचाकीवर दोघांना प्रवास करता येणार आहे.
Last Updated : Mar 22, 2021, 7:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.