मुंबई - घाटकोपर परिसरातील लाल बहादूर शास्त्री रस्त्याचे व घाटकोपर अंधेरी जोड रस्त्याचे प्रशासनाने रुंदीकरणाचे काम होती घेतले आहे. या दोन्ही रस्ते बाधितांनी आज पालिकेच्या घाटकोपर येथील एन विभाग कार्यालया बाहेर धरणे आंदोलन केले. कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय, हमारी मांगे पुरी करो, नही तो खुर्ची खाली करो, अशा घोषणांनी पालिकेचे घाटकोपर येथील एन विभाग आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडला.
एलबीएस मार्ग आणि घाटकोपर अंधेरी जोड रस्ता रस्ता रुंदीकरणामध्ये महानगर पालिकेने बाधितांना विश्वासात न घेता नोटिसा पाठवून कारवाई केल्याचा आरोप बाधित लोकांनी केला आहे. यात एलबीएस रस्तारुंदीकरणाचा प्रश्न गेली 40 वर्ष प्रलंबित आहे. बाधितांनी वेळोवेळी कागदपत्रे पालिकेकडे जमा केले असून पात्र ठरवून पर्यायी जागेचा मोबदला वाढवून द्यावा ही मागणी करण्यात आली. 2011 मधील बांधकामे पात्र करण्यात यावी अशी आमची मागणी असल्याचे प्रकल्प बाधितानी सांगितले
आमचा रस्तारुंदीकरणाला विरोध नसून प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नसल्याच्या विरोधात आम्ही हा आवाज उठवला असल्याचे नाना सामंत यांचे म्हणणे आहे. यावेळी एन विभाग कार्यालय बाहेर सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.