ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन; गोळीबारात ५ जवान जखमी

पाकिस्तानने मंगळवारी १२ ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत.

author img

By

Published : Feb 27, 2019, 8:12 AM IST

राजौरी1

राजौरी (जम्मू काश्मीर) - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने मंगळवारी १२ ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून तीन दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. या कारवाईत ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोक प्रत्युत्तर दिले जात आहे.

मंगळवारी हवाई दलाच्या १२ विमानांनी या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भाग घेतला होता. यात सुमारे १ हजार किलोचे बॉम्ब महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर फेकण्यात आले. त्यानंतर हवाई दलाची सर्व विमाने सुखरुप भारतीय हद्दीत दाखल झाली.

पाकिस्तानमधील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे भागात हवाई दलाने ही कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले.

राजौरी (जम्मू काश्मीर) - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने मंगळवारी १२ ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून तीन दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. या कारवाईत ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोक प्रत्युत्तर दिले जात आहे.

मंगळवारी हवाई दलाच्या १२ विमानांनी या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भाग घेतला होता. यात सुमारे १ हजार किलोचे बॉम्ब महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर फेकण्यात आले. त्यानंतर हवाई दलाची सर्व विमाने सुखरुप भारतीय हद्दीत दाखल झाली.

पाकिस्तानमधील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे भागात हवाई दलाने ही कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले.

Intro:Body:

पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन; गोळीबारात ५ जवान जखमी

राजौरी (जम्मू काश्मीर) - भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानने मंगळवारी १२ ते १५ ठिकाणी नियंत्रण रेषेवर (एलओसी) शस्त्रसंधीचे उल्लघंन केले. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत.

पुलवामा हल्ल्याच्या बाराव्या दिवशी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ले करून तीन दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केले. या कारवाईत ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोक प्रत्युत्तर दिले जात आहे.

मंगळवारी हवाई दलाच्या १२ विमानांनी या सर्जिकल स्ट्राईकमध्ये भाग घेतला होता. यात सुमारे १ हजार किलोचे बॉम्ब महत्त्वाच्या दहशतवादी तळांवर फेकण्यात आले. त्यानंतर हवाई दलाची सर्व विमाने सुखरुप भारतीय हद्दीत दाखल झाली.

पाकिस्तानमधील बालाकोट तर पाकव्याप्त काश्मिरातील चकोटी आणि मुझफ्फराबाद येथे भागात हवाई दलाने ही कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांच्या साहाय्याने हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित दहशतवादी अड्डे पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले.

 




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.