महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

India Vs England : भारतीय संघानं 180 मिनिटांत केलं इंग्लंडला चितपट, कसोटीत 90 वर्षातील सर्वात मोठा पराभव

India Vs England 3rd Test Day 2 Match : राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियानं पहिल्या डावात 445 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा पहिला डाव 319 धावांवर आटोपला. भारतानं दुसऱ्या डावात चार विकेट गमावत 430 धावा केल्या. इंग्लंडला 557 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव 122 धावांवर आटोपला.

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 7:42 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

राजकोटIndia Vs England 3rd Test Day 2 Match : राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला तिसरा कसोटी सामना भारतानं चौथ्याच दिवशी जिंकलाय. विशेष म्हणजे या सामन्यात भारतानं इंग्रजांना चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघानं तब्बल 434 धावांच्या मोठ्या फरकानं इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचलाय. गेल्या 90 वर्षातील इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात मोठा पराभव आहे. यासह या सामन्यात भारतीय संघानं अनेक विक्रम रचले आहेत.

  • कसोटी क्रिकेटचा इतिहासात भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय : राजकोट कसोटीत भारतीय संघानं इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केलाय. भारतीय संघानं आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात 577 कसोटी सामने खेळले. या 577 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघानं धावांच्या बाबतीत मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरलाय.

भारतासाठी सर्वात मोठा कसोटी विजय :

  • 434 धावांनी विरुद्ध इंग्लंड राजकोट 2024
  • 372 धावांनी विरुद्ध न्यूझीलंड मुंबई 2021
  • 337 धावांनी विरुद्ध साऊथ आफ्रिका दिल्ली 2015
  • 321 धावांनी विरुद्ध न्यूझीलंड इंदौर 2016
  • 320 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोहाली 2008
  • 90 वर्षातील इंग्लंडचा सर्वात मोठा पराभव : भारतीय संघानं राजकोटमध्ये केलेला इंग्लंडचा पराभव हा धावांच्या बाबतीत मागील 90 वर्षाच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. 1934 साली इंग्लंड ऑस्ट्रेलियाविरुद्ध 562 धावांनी पराभूत झाले होते. त्यानंतरचा हा त्यांचा सर्वात मोठा पराभव आहे.

इंग्लंडचा सर्वात मोठा कसोटी पराभव :

  • 562 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल 1934
  • 434 धावांनी विरुद्ध भारत, राजकोट 2024
  • 425 धावांनी विरुद्ध वेस्ट इंडिज, मँचेस्टर 1976
  • 409 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स 1948
  • 405 धावांनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स 2015

जैस्वालची ऐतिहासिक खेळी : भारतीय संघानं आपला दुसरा डाव 430 धावांवर घोषित केला. यादरम्यान भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालनं इतिहास रचत कसोटीत सलग दुसरं द्वीशतक झळकावलं. या खेळीत त्यानं तब्बल 12 षटकार मारत 27 वर्षांपूर्वीच्या वसीम अकमरच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. तसंच या कसोटीद्वारे पदार्पण करणारा सरफराज खाननं मिळालेल्या संधीचं सोनं करत पहिल्याच कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतक झळकावलं. तसंच त्यानं महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली. या दोघांच्या आक्रमक फलंदाजीनंतर अष्टपैलू रवींद्र जडेजानानं पाच बळी घेत, इंग्लंडच्या फलंदाजीचा कंबरड मोडलं. यासह भारतानं पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारीपासून रांची इथ सुरू होणार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. जैस्वालचं 'यशस्वी' द्विशतक; जागतिक विक्रमाची बरोबरी करत मोडले अनेक विक्रम
  2. IND vs ENG 3rd Test : बेन डकेटनं केलं यशस्वी जैस्वालचं कौतुक, म्हणाला, "हा उगवता तारा"
  3. पंचांनी आऊट दिल्यानंतर 20 मिनिटांनी अजिंक्य रहाणे पुन्हा आला फलंदाजीला; आसाम-मुंबई रणजी सामन्यात नेमकं काय घडलं?

ABOUT THE AUTHOR

...view details