श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. 90 जागांवर निवडणुकीचे निकाल लागणार असताना मतमोजणीसाठी सर्व जिल्हा मुख्यालयांवर कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील 20 मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Live updates
- एनसी प्रमुख फारुख अब्दुल्ला श्रीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी समर्थकांना अभिवादन केले. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, जेकेएनसी-काँग्रेस आघाडीनं बहुमताचा आकडा पार केला आहे.
- जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सची आघाडीची आघाडी आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस (7) एनसी (39) आघाडी 46 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 2014 नंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यानं नागरिकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ही विधानसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडली आहे. 873 उमेदवारांचे भवितव्य काय असणार? हे आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. शनिवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी आघाडीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या तुलनेत भाजपाला मिळणाऱ्या जागांमध्ये किंचित सुधारणा होण्याचा अंदाज आहे. तर पीडीपीला सर्वात मोठा झटका बसणार आहे. 28 जागा जिंकणाऱ्या पीडीपीला यावेळी 10 पेक्षा कमी जागा मिळेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.
- राजौरीचे जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO) अभिषेक शर्मा यांनी सांगितले,"काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेशी संबंधित सर्व तयारींचा आढावा घेण्यात आला. सर्वांना भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मतदानाशी संबंधित अपडेट पाहायला मिळतील. मतमोजणी केंद्रावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे."
- दिल्लीतील भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले," विकासाला पाठिंबा देणारे सरकार हवे आहे, हे जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून दिसून येईल. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा विजयी होईल. हरियाणामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा आशावादी आहे."
मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल-जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील काँग्रेसचे उमेदवार इफ्तिखार अहमद म्हणाले," लोकशाहीच्या या उत्सवात लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. 10 वर्षांनंतर निवडणुका झाल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. राजौरीचे एसएसपी रणदीप कुमार म्हणाले की, "आम्ही कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर कोणाचीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ओळखपत्र तपासणीनंतर केवळ जारी केलेले ओळखपत्र असलेल्यांनाच परवानगी दिली जात आहे. पोलीस दल आणि सैन्यदल सतर्क आहेत. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडेल."
हेही वाचा-