ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन यांनी वाईट दिवसात केलेल्या संघर्षाचा रजनीकांतनं केला खुलासा

struggle of Big B : अमिताभ बच्चन यांच्यावर आर्थिक संकट ओढवल्यानंतर त्यांनी संकटावर कशी मात केली याचा खुलासा रजनीकांतनं केला आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Rajinikanth revealed the struggle of Big B
अमिताभ बच्चन आणि अमिताभ बच्चन ((IANS))

मुंबई - साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'वेट्टियाँन' हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तब्बल 33 वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. या दोन्ही सुपरस्टारचे चाहते 'वेट्टियाँन'ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. 10 ऑक्टोबरला 'वेट्टियाँन' प्रदर्शित होत आहे. यापूर्वी रजनीकांतनं आपल्या सहकारी सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. अमिताभ यांच्यावर गुदरलेल्या आर्थिक प्रसंगाची आठवण रजनीकांतनं सांगितली आहे.

रजनीकांत यांनी 'वेट्टियाँन' चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलासा केला. रजनीकांत म्हणाले की, करिअरच्या शिखरावर असताना अमिताभ यांना सर्व काही सोडून दूर ठिकाणी निवांतपणे स्थायिक व्हायचं होतं. याच काळात त्यांनी एबीसीएल ही कंपनी स्थापन केली आणि आणि दुर्दैवानं त्यांची ही चित्रपट निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे त्यांना त्यांचा जुहूतील बंगला तसेच त्यांची मुंबईतील मालमत्ता विकावी लागली. पण अमिताभ बच्चन यांच्यावर आलेल्या या संकटामुळे चित्रपटसृष्टीतील काही लोक खूश होते, पण त्यांना हे सुख फार काळ लाभलं नाही. अमिताभ बच्चन यांनी 18-18 तासात काम केलं आणि कर्जाची परतफेड केली.

2000 मध्ये यश चोप्रांनी अमिताभ बच्चन यांना 'मोहब्बतें' या चित्रपटात कास्ट केलं आणि येथे त्यांचे नशीब बदललं. रजनीकांतने सांगितले की, एके दिवशी अमिताभ मंकी कॅप घालून यश चोप्राच्या घरी गेले आणि त्यांनी यश यांच्याकडे काम मागितलं. यश यांनी बच्चन यांना चेक दिला पण त्यांनी तो घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की मला केवळ पैसे नकोत तर काम पाहिजे. अशा प्रकारे अमितजींना 'मोहब्बतें' हा चित्रपट मिळाला, त्यानंतर त्यांना 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करण्याची सुवर्ण संधी मिळाली.

रजनीकांत पुढे म्हणाले, वाईट दिवसात अमितजींनी सर्व प्रकारच्या जाहिराती केल्या, त्याकाळात तर मुंबईतील काही लोक त्यांच्यावर हसायला लागले होते. तीन वर्षे आजारी असतानाही अमितजींनी दिवसाचे १८-१८ तास काम केले, अशा प्रकारे त्यांनी कर्ज फेडले. जुने घर तर परत मिळवलेच, पण त्याच गल्लीत तीन नवीन घरे देखील खरेदी केली, म्हणूनच ते अमिताभ बच्चन आहेत आणि आजही ते वयाच्या ८२ व्या वर्षी दिवसाचे १० तास काम करतात.

मुंबई - साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'वेट्टियाँन' हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. तब्बल 33 वर्षांनंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आले आहेत. या दोन्ही सुपरस्टारचे चाहते 'वेट्टियाँन'ची आतुरतेनं प्रतीक्षा करत आहेत. 10 ऑक्टोबरला 'वेट्टियाँन' प्रदर्शित होत आहे. यापूर्वी रजनीकांतनं आपल्या सहकारी सुपरस्टारबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. अमिताभ यांच्यावर गुदरलेल्या आर्थिक प्रसंगाची आठवण रजनीकांतनं सांगितली आहे.

रजनीकांत यांनी 'वेट्टियाँन' चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्च कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्याबद्दल खुलासा केला. रजनीकांत म्हणाले की, करिअरच्या शिखरावर असताना अमिताभ यांना सर्व काही सोडून दूर ठिकाणी निवांतपणे स्थायिक व्हायचं होतं. याच काळात त्यांनी एबीसीएल ही कंपनी स्थापन केली आणि आणि दुर्दैवानं त्यांची ही चित्रपट निर्मिती संस्था दिवाळखोरीत निघाली. कर्जाच्या ओझ्याखाली दबल्यामुळे त्यांना त्यांचा जुहूतील बंगला तसेच त्यांची मुंबईतील मालमत्ता विकावी लागली. पण अमिताभ बच्चन यांच्यावर आलेल्या या संकटामुळे चित्रपटसृष्टीतील काही लोक खूश होते, पण त्यांना हे सुख फार काळ लाभलं नाही. अमिताभ बच्चन यांनी 18-18 तासात काम केलं आणि कर्जाची परतफेड केली.

2000 मध्ये यश चोप्रांनी अमिताभ बच्चन यांना 'मोहब्बतें' या चित्रपटात कास्ट केलं आणि येथे त्यांचे नशीब बदललं. रजनीकांतने सांगितले की, एके दिवशी अमिताभ मंकी कॅप घालून यश चोप्राच्या घरी गेले आणि त्यांनी यश यांच्याकडे काम मागितलं. यश यांनी बच्चन यांना चेक दिला पण त्यांनी तो घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की मला केवळ पैसे नकोत तर काम पाहिजे. अशा प्रकारे अमितजींना 'मोहब्बतें' हा चित्रपट मिळाला, त्यानंतर त्यांना 'कौन बनेगा करोडपती' होस्ट करण्याची सुवर्ण संधी मिळाली.

रजनीकांत पुढे म्हणाले, वाईट दिवसात अमितजींनी सर्व प्रकारच्या जाहिराती केल्या, त्याकाळात तर मुंबईतील काही लोक त्यांच्यावर हसायला लागले होते. तीन वर्षे आजारी असतानाही अमितजींनी दिवसाचे १८-१८ तास काम केले, अशा प्रकारे त्यांनी कर्ज फेडले. जुने घर तर परत मिळवलेच, पण त्याच गल्लीत तीन नवीन घरे देखील खरेदी केली, म्हणूनच ते अमिताभ बच्चन आहेत आणि आजही ते वयाच्या ८२ व्या वर्षी दिवसाचे १० तास काम करतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.