महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 12:40 PM IST

ETV Bharat / bharat

इंदिरा गांधींनी तडकाफडकी लावली आणीबाणी; बिहारमधील राजकारणी आणि पत्रकारांनी जागवल्या आठवणी - EMERGENCY

Memories of Emergency In Bihar आणीबाणी हा भारतीय लोकशाहीचा सर्वात दु:खद आणि काळा अध्याय मानला जातो. कारण त्या काळात केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच तुरुंगात डांबण्यात आलं नाही तर पत्रकार आणि सर्वसामान्यांनाही विविध प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या. आज 49 वर्षांनंतरही देश त्यांना विसरु शकलेला नाही. बिहारचे राजकारणी आणि पत्रकार सांगतात की, जेव्हा जेव्हा त्यांना आणीबाणीची आठवण येते, तेव्हा त्यांच्या मनात अनेक आठवणी दाटून येतात.

Emergency a Black Day
आणीबाणी भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय (ETV Bharat)

पाटणा Memories of Emergency In Bihar : 25 जून 1975 चा दिवस इतिहासाच्या पानात नोंदला गेला आहे. कारण रातोरात देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील 'काळा अध्याय' म्हणून ओळखला जातो. या घटनेला आज ५० वर्षे पूर्ण झालीत. तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांनी इंदिरा गांधींच्या म्हणण्यावरून घटनेच्या कलम ३५२ नुसार देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीच्या २१ दिवसांच्या काळात इंदिरा गांधींनी राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबलं आणि त्यांचा छळ केला. इंदिराजींच्या एका निर्णयानं भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात एकच खळबळ माजली होती. त्याचा परिणाम असा झाला की, लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली देशात 'संपूर्ण क्रांती' सुरू झाली. स्वातंत्र्याच्या ३० वर्षानंतरच प्रथमच बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं.

आणीबाणीवर बोलताना मान्यवर (ETV Bharat Reporter)

देशात आणीबाणी लागू: ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बागी म्हणाले की, राज्यघटनेत राष्ट्रपती राजवटीची तरतूद आहे, परंतु इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली तेव्हा त्यांनी घटनात्मक तरतुदीही बाजूला ठेवल्या. इंदिरा गांधी यांनी संविधानाच्या कलम 352 नुसार आणीबाणी जाहीर केली होती. भारताच्या इतिहासातील हा सर्वात वादग्रस्त निर्णय मानला जातो. आणीबाणीच्या काळात नागरी हक्क संपुष्टात आणले गेले. तसंच प्रेसवरही बंदी घालण्यात आली होती. विशेष 'मंत्रिमंडळाची बैठक न घेता इंदिरा गांधींनी मध्यरात्री आणीबाणी लागू केली आणि 12 वाजता राष्ट्रपतींची स्वाक्षरी करून घेतली'. मंत्रिमंडळातील सदस्यांना सुद्धा सकाळी सांगण्यात आलं होतं.

सदस्यत्व रद्द झाल्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली: १२ जून १९७४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक हेराफेरीसाठी दोषी ठरवलं आणि त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यासही बंदी घातली. हा निर्णय त्यांना झोंबला. त्यानंतर इंदिरा गांधींनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस केली होती.

राज नारायण यांनी याचिका दाखल केली होती: 10 मार्च रोजी इंदिरा गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी राज नारायण यांचा 1 लाख 10,000 मतांनी पराभव केला होता. या निकालावर राज नारायण यांचा विश्वाच बसला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावत इंदिरा गांधींवर चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप केला.

इंदिराजींवर कोणते आरोप होते : राज नारायण यांनी इंदिरा गांधींवर अनेक गंभीर आरोप केले होते. बहुतेक आरोप न्यायालयाने फेटाळून लावले. परंतु दोन आरोपांची न्यायालयानं गांभीर्यानं दखल घेतली. स्टेज आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी इंदिरा गांधींनी सरकारी यंत्रणा वापरल्याचा पहिला आरोप होता. सरकारी अधिकारी यशपाल कपूर यांना स्वत:चा निवडणूक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करणे हा दुसरा आरोप.

बिहारमधून आणीबाणीविरोधात आवाज उठवला :ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बागी म्हणतात की, आणीबाणीनंतर देशभरात आंदोलने झाली असली तरी, बिहारमध्ये उठलेल्या आवाजाने देशाला जोडण्याचं काम केलं. संपूर्ण क्रांतीचे नायक जयप्रकाश नारायण यांनी रामलीला मैदानावर आंदोलन केलं. तसचं राष्ट्रपती रामधारी सिंह दिनकर यांची 'सिंहासन खाली करा जेणेकरून जनता येईल' या कवितेचं पठण केलं. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांना चंदीगड येथून ताब्यात घेण्यात आले. 24 ऑक्टोबर 1975 रोजी त्यांची प्रकृती ढासळू लागल्याने 12 नोव्हेंबर रोजी त्यांची सुटका झाली. रुग्णालयात त्यांना किडनी निकामी झाल्याचं निदान झालं. त्यामुळे त्यांना आयुष्यभर डायलिसिसवर राहावं लागलं.

तुरुंगात विरोधकांवर अत्याचार : 18 जानेवारी 1977 रोजी इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि निवडणुका जाहीर केल्या. जेपींच्या मार्गदर्शनाखाली जनता पक्षाची स्थापना झाली. जनता पक्ष सत्तेवर आला आणि केंद्रात प्रथमच बिगर काँग्रेस सरकार स्थापन झालं. जनता पक्षाच्या नेत्यांनी जयप्रकाश नारायण यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून प्रस्तावित केलं पण त्यांनी नकार दिला.

भाजपा आमदार काय म्हणाले : भारतीय जनता पक्षाचे आमदार अरुण कुमार म्हणतात की, आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी त्यांच्या विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं. तुरुंगात गेलेल्यांमध्ये त्याचाही समावेश आहे. तुरुंगात त्याचे केस आणि दाढीही उपटण्यात आली होती असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा

  1. भाजपा २५ जूनला पाळणार 'आणीबाणी एक काळा दिवस’ ; सर्व जिल्ह्यात राबवणार अभियान - Emergency a Black Day
  2. राहुल गांधींनी NDA सरकारच्या पहिल्या 15 दिवसांचा मागितला 'हिशोब'; घोटाळ्यांची यादी देत सरकारवर खरमरीत टीका - Rahul Gandhi
  3. राज्याच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी आमदारांना लागेल लॉटरी; समाजातील सर्व घटकांना खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न - Mahayuti MLA Budget Demand

ABOUT THE AUTHOR

...view details