ETV Bharat / state

कॉम्प्युटर इंजिनियर युवकाने नोकरी सोडत केली 'रेशीम शेती'; आता वर्षाला लाखोंची कमाई - SILK FARMING IN BEED

बीड जिल्हा म्हटलं की, दुष्काळी भाग डोळ्यासमोर येतो. मात्र, याच बीड जिल्ह्यातील पाचेगावच्या एका कॉम्प्युटर इंजिनियरनं 'रेशीम शेती' करून दाखवली.

Silk Farming in Beed
रेशीम शेती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 15, 2025, 4:07 PM IST

बीड : कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्येच 'रेशीम शेती' हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो.

नोकरी सोडून केली रेशीम शेती : बीड जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीडकडं पाहिलं जातं. मात्र, बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगावच्या एका कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवकानं नोकरी सोडत थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायची म्हटल्यावर कोणतं पिक घ्यावं हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असतो. ज्या पिकांमधून कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळेल अशी शेती केली पाहिजे. त्यामुळं रेशीम शेतीचा व्यवसाय निवडल्याचं कॅम्पुटर इंजिनियर असलेले मुकुंद राठोड यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना मुकुंद राठोड (ETV Bharat Reporter)

रेशीम खरेदी केंद्रावर दिली भेट : "रेशीम शेतीसाठी अनेक ठिकाणी भेटी देत वेगवेगळी माहिती घेतली. लाॅकडाऊनच्या काळात नोकरी सुटल्यानंतर आता करायचं काय? हा मोठा प्रश्न होता. रेशीम शेती हा व्यवसाय निवडल्यावर अनेकांचे वेगवेगळे अनुभव ऐकले. त्याचबरोबर बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेशीम खरेदी केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी रेशीम शेतीची माहिती घेतली. कोणत्या रेशीम कोषाला जास्त मागणी आहे त्या रेशीमकिड्यांची पैदास केली. प्रतिवर्षी तीन ते चार लॉट घेऊन सहा ते सात लाख रुपये प्रति वर्षे उत्पादन घेतलं जातं". अशी माहिती मुकुंद राठोड यांनी दिली. त्याचबरोबर गावातील काही युवकांना रेशीम उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुकुंद राठोड मदत करत आहेत.

हेही वाचा -

बीड : कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागतो. अत्यंत कमी कालावधीत आणि कमी खर्चात उत्पादन घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात विविध उपक्रम राबवत असतो. त्यामध्येच 'रेशीम शेती' हा देखील एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखला जातो.

नोकरी सोडून केली रेशीम शेती : बीड जिल्ह्यात उद्योग, व्यवसाय नसल्यानं अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्यामुळं सुशिक्षित बेरोजगारांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीडकडं पाहिलं जातं. मात्र, बीडच्या गेवराई तालुक्यातील पाचेगावच्या एका कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या युवकानं नोकरी सोडत थेट शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायची म्हटल्यावर कोणतं पिक घ्यावं हा महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न असतो. ज्या पिकांमधून कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळेल अशी शेती केली पाहिजे. त्यामुळं रेशीम शेतीचा व्यवसाय निवडल्याचं कॅम्पुटर इंजिनियर असलेले मुकुंद राठोड यांनी सांगितलं.

प्रतिक्रिया देताना मुकुंद राठोड (ETV Bharat Reporter)

रेशीम खरेदी केंद्रावर दिली भेट : "रेशीम शेतीसाठी अनेक ठिकाणी भेटी देत वेगवेगळी माहिती घेतली. लाॅकडाऊनच्या काळात नोकरी सुटल्यानंतर आता करायचं काय? हा मोठा प्रश्न होता. रेशीम शेती हा व्यवसाय निवडल्यावर अनेकांचे वेगवेगळे अनुभव ऐकले. त्याचबरोबर बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील रेशीम खरेदी केंद्राला भेट दिली. त्या ठिकाणी रेशीम शेतीची माहिती घेतली. कोणत्या रेशीम कोषाला जास्त मागणी आहे त्या रेशीमकिड्यांची पैदास केली. प्रतिवर्षी तीन ते चार लॉट घेऊन सहा ते सात लाख रुपये प्रति वर्षे उत्पादन घेतलं जातं". अशी माहिती मुकुंद राठोड यांनी दिली. त्याचबरोबर गावातील काही युवकांना रेशीम उद्योग व्यवसायाची आवड निर्माण व्हावी यासाठी मुकुंद राठोड मदत करत आहेत.

हेही वाचा -

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.