ETV Bharat / politics

पुन्हा एकदा 'भारत जोडो'! यावेळी बॅलेट पेपरसाठी - NANA PATOLE MARKADWADI

माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी हे गाव सध्या चांगलच चर्चेत आहे. मंगळवारी (10 डिसेंबर) काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील मारकडवाडी गावाला भेट दिली.

Nana Patole
नाना पटोले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 6:57 PM IST

Updated : Dec 10, 2024, 7:16 PM IST

मारकडवाडी (सोलापूर) : ईव्हीएम मतदान प्रणालीवर सर्वत्र शंका उपस्थित केली जात असताना, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या निर्णयाबाबत उचललेलं पाऊल राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

मोठं जनआंदोलन उभं करू : "भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना, भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचं काम सुरू आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो, त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहे. म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपलं मत कोणाला गेलं हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित राहावा आणि बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं या मागणीसाठी लवकरच आम्ही भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठं जनआंदोलन उभं करणार आहे. त्याची सुरुवात मारकडवाडीपासून करू", असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Nana Patole
सभेत बोलताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)

नेते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहारी रुपनवर, माजी आमदार आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

76 लाख मतदान कसे वाढले? : गावकऱ्यांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकाल पाहून निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 58.33 टक्के मतदान झालं होतं, त्याच रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता 66.05 टक्के मतदान झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. राज्यात 76 लाख मतदान कसं वाढलं? कोणत्या मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मोठ्या रांगा होत्या, त्याचं व्हिडिओ चित्रिकरण सादर करा अशी मागणी, निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाही."

Nana Patole
ग्रामस्थांशी संवाद साधताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)

मारकडवाडीची लढाई राज्यभर : "लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीच्या योद्ध्यांनी सुरु केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मदतदान घेण्याची मागणी करत आहेत. मारकडवाडीतून सुरु झालेला हा लढा आता राज्यभर पसरु लागला आहे. सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी रहात आहेत. ही लढाई आता मारकडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरु आहे", असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करणार : मारकडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले आणि पोलीसांच्या मदतीनं हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. 144 कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले. आता गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करण्याचं आश्वासनही नाना पटोले यांनी गावकऱ्यांना दिलं.

हेही वाचा -

  1. “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये", चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
  2. "ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"- शरद पवार
  3. "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान

मारकडवाडी (सोलापूर) : ईव्हीएम मतदान प्रणालीवर सर्वत्र शंका उपस्थित केली जात असताना, माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याच्या निर्णयाबाबत उचललेलं पाऊल राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.

मोठं जनआंदोलन उभं करू : "भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना, भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचं काम सुरू आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो, त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहे. म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपलं मत कोणाला गेलं हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली. लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित राहावा आणि बॅलेट पेपरवरच मतदान व्हावं या मागणीसाठी लवकरच आम्ही भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठं जनआंदोलन उभं करणार आहे. त्याची सुरुवात मारकडवाडीपासून करू", असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

Nana Patole
सभेत बोलताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)

नेते, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहारी रुपनवर, माजी आमदार आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, प्रा. यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

76 लाख मतदान कसे वाढले? : गावकऱ्यांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "विधानसभा निवडणुकीतील आश्चर्यकारक निकाल पाहून निवडणूक प्रक्रियेवरच शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार 58.33 टक्के मतदान झालं होतं, त्याच रात्री 11.30 वाजेपर्यंत 65.2 टक्के तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता 66.05 टक्के मतदान झाल्याचं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. राज्यात 76 लाख मतदान कसं वाढलं? कोणत्या मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मोठ्या रांगा होत्या, त्याचं व्हिडिओ चित्रिकरण सादर करा अशी मागणी, निवडणूक आयोगाला पत्र पाठवून केली आहे. पण अद्याप त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाही."

Nana Patole
ग्रामस्थांशी संवाद साधताना नाना पटोले (ETV Bharat Reporter)

मारकडवाडीची लढाई राज्यभर : "लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीच्या योद्ध्यांनी सुरु केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मदतदान घेण्याची मागणी करत आहेत. मारकडवाडीतून सुरु झालेला हा लढा आता राज्यभर पसरु लागला आहे. सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यासह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलने उभी रहात आहेत. ही लढाई आता मारकडवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे. मारकडवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरु आहे", असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करणार : मारकडवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले आणि पोलीसांच्या मदतीनं हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. 144 कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले. आता गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करण्याचं आश्वासनही नाना पटोले यांनी गावकऱ्यांना दिलं.

हेही वाचा -

  1. “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये", चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल
  2. "ईव्हीएम हटाव चळवळ सुरू ठेवून न्यायालयीन लढा देणं महत्त्वाचं"- शरद पवार
  3. "मारकडवाडी नव्या भारताच्या इतिहासातील आधुनिक दांडी मार्च"; जितेंद्र आव्हाडांचं विधान
Last Updated : Dec 10, 2024, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.