ETV Bharat / state

केंद्रीय अर्थसंकल्पातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा भ्रमनिरास - UNION BUDGET 2025

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचं विविध स्तरातून स्वागत होत आहे. परंतु, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे.

UNION BUDGET 2025
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2025, 7:35 PM IST

Updated : Feb 1, 2025, 10:12 PM IST

नाशिक : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वागत होत आहे. परंतु, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाबाबात निराशा व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार म्हणाले, "शेतकऱ्यांना पाच लाखांचा कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात कोणत्याही सरकारनं कांद्यावर निर्यात मूल्य लावलं नव्हतं. मोदी सरकारनं कांद्यावर २० टक्के निर्यात मूल्य लावलं. कांद्यावरील निर्यात मूल्य यंदाच्या अर्थसंकल्पात रद्द होईल, तसंच कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, ती यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण झालेली नाही. तसंच या भागात असलेल्या साखर, मका, बाजरी आणि इथेनॉलसाठी आर्थिक पुरवठा करण्याची गरज होती. ती ही या अर्थसंकल्पात पूर्ण झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना 'एका बाजूला खुशी तर, दुसऱ्या बाजूला गम' अशी परिस्थिती या अर्थसंकल्पात दिसून येत आहे".

ईटीव्ही भारतशी बोलताना दीपक पगार (ETV Bharat Reporter)

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय :

  • भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यासोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली.
  • शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे.
  • डाळींमध्ये आत्मानिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षाच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षी मसूर आणि तूर डाळीचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
  • सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये केली आहे. शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिलं जाणार आहे. तसंच मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

    हेही वाचा :
  1. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, नोकरदार वर्गामध्ये आनंदाचं वातावरण; बजेटवर तज्ज्ञांचं मत काय?
  2. "अर्थसंकल्पातून आमच्या पदरी निराशाच, अर्थसंकल्पाचे आम्ही..." अर्थसंकल्पावर सर्वसामान्य म्हणतात...
  3. आयकर फाईल करण्याची ४ वर्षांनी वाढवली मुदत, १२ लाखांच्या उत्पन्नापर्यंत कर नाही

नाशिक : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचं स्वागत होत आहे. परंतु, नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या अर्थसंकल्पाबाबात निराशा व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार म्हणाले, "शेतकऱ्यांना पाच लाखांचा कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, गेल्या सत्तर वर्षात कोणत्याही सरकारनं कांद्यावर निर्यात मूल्य लावलं नव्हतं. मोदी सरकारनं कांद्यावर २० टक्के निर्यात मूल्य लावलं. कांद्यावरील निर्यात मूल्य यंदाच्या अर्थसंकल्पात रद्द होईल, तसंच कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा आम्हाला होती. मात्र, ती यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्ण झालेली नाही. तसंच या भागात असलेल्या साखर, मका, बाजरी आणि इथेनॉलसाठी आर्थिक पुरवठा करण्याची गरज होती. ती ही या अर्थसंकल्पात पूर्ण झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना 'एका बाजूला खुशी तर, दुसऱ्या बाजूला गम' अशी परिस्थिती या अर्थसंकल्पात दिसून येत आहे".

ईटीव्ही भारतशी बोलताना दीपक पगार (ETV Bharat Reporter)

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय :

  • भाजीपाला आणि फळांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी राज्यासोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली.
  • शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी आसाममध्ये युरियाचा नवा प्लांट सुरू होणार आहे.
  • डाळींमध्ये आत्मानिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षाच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे. पुढील सहा वर्षी मसूर आणि तूर डाळीचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य योजना जाहीर केली आहे. सरकार ही योजना राज्यांसोबत चालवणार आहे. या योजनेच्या माध्यमातून १.७ कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. याचा देशातील १०० जिल्ह्यांना फायदा होणार आहे.
  • सरकारनं किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये केली आहे. शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिलं जाणार आहे. तसंच मच्छीमार आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारनं व्यवसायासाठी पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

    हेही वाचा :
  1. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, नोकरदार वर्गामध्ये आनंदाचं वातावरण; बजेटवर तज्ज्ञांचं मत काय?
  2. "अर्थसंकल्पातून आमच्या पदरी निराशाच, अर्थसंकल्पाचे आम्ही..." अर्थसंकल्पावर सर्वसामान्य म्हणतात...
  3. आयकर फाईल करण्याची ४ वर्षांनी वाढवली मुदत, १२ लाखांच्या उत्पन्नापर्यंत कर नाही
Last Updated : Feb 1, 2025, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.