ETV Bharat / politics

"विरोधकांना समाज नाही तर निवडणुका महत्वाच्या...", देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाच्या बैठकीवरून विरोधकांवर हल्लाबोल - Maratha OBC Reservation

Maratha Reservation News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केलाय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 10, 2024, 9:54 AM IST

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis (Source - ETV Bharat)

मुंबई Devendra Fadnavis on Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यामध्ये जुंपली आहे. आरक्षणावरून राज्यात वातावारण तापले असताना राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरन निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्र शांतता राहून प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू होता. विरोधकांना केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही." "विरोधक या बैठकीला येण्याऐवजी विजय वड्डेटीवार यांच्याकडे बसून बैठक करत आहेत," असं ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित असलेले प्रकाश आंबेडकर यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी, अशी सूचना केली. "या सूचनेवर मुख्यमंत्री योग्य प्रकारे निर्णय घेतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांनी चर्चेपासून काढला पळ : राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान चालू आहे. राज्यातील राजकीय वातावरण दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळं घुसळून निघालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मात्र विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देणात आलं होतं. सोमवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, "विरोधकांनी शेवटच्या क्षणी बैठकीतून आणि चर्चेतून पळ काढला. सरकार चर्चेसाठी बैठक आयोजित करत आहे. विरोधक या बैठकीला येत नाहीत. आंदोलकांनी याकडं लक्ष द्यावं," असं शंभुराज देसाई म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका : आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडला आहे. मात्र अशा परिस्थितीत ही राजकारण साधण्याची भूमिका शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे‌ हे दिसून आलं. खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज याबाबत भूमिका मांडण्याची गरज होती. तसेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनंदेखील या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी महाराष्ट्र पेटता कसा राहील, ही भूमिका घेतल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली." सरकार मराठा समाजासोबत आहे. पण ओबीसींवर अन्याय होणार नाही, हेदेखील सरकार पाहत आहे."

कोणालाही धक्का न लावता जरांगेंचा प्रश्न सोडवणार : "मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. त्याबाबत 11 जणांची टीम हैदराबादला पाठवली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस उद्या तेलंगणा सरकारशी बोलतील, अशी माहिती प्रवीण दरेकरांनी दिली. कोणालाही धक्का न लावता जरांगे यांचा प्रश्न सोडवत आहोत, असं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं. समाजात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहोत. सगेसोयरेच्या बाजूनं किती आणि विरोधात किती हरकती आहेत, हे पाहावं लागत आहे. हे बारकावे पाहावे लागतात," असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

  1. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी रस्सीखेच : फडणवीसांची चालणार जादू?: नाना पटोलेंचा विजयाचा दावा - Vidhan Parishad Elections
  2. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा; विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला 'हा' निर्णय - ECI on NCP SCP
  3. फुकटचे निर्णय हिताचे नसतात; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला - Sharad Pawar On Farmers

मुंबई Devendra Fadnavis on Reservation : मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी आणि महायुती सरकार यामध्ये जुंपली आहे. आरक्षणावरून राज्यात वातावारण तापले असताना राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली. मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीनं बहिष्कार टाकला. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरन निशाणा साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, " महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. महाराष्ट्र शांतता राहून प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू होता. विरोधकांना केवळ निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही." "विरोधक या बैठकीला येण्याऐवजी विजय वड्डेटीवार यांच्याकडे बसून बैठक करत आहेत," असं ते म्हणाले. या बैठकीत उपस्थित असलेले प्रकाश आंबेडकर यांनी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरक्षणासंदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी, अशी सूचना केली. "या सूचनेवर मुख्यमंत्री योग्य प्रकारे निर्णय घेतील," असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांनी चर्चेपासून काढला पळ : राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान चालू आहे. राज्यातील राजकीय वातावरण दोन्ही समाजाच्या आंदोलनामुळं घुसळून निघालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. मात्र विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना निमंत्रण देणात आलं होतं. सोमवारी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीची माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, "विरोधकांनी शेवटच्या क्षणी बैठकीतून आणि चर्चेतून पळ काढला. सरकार चर्चेसाठी बैठक आयोजित करत आहे. विरोधक या बैठकीला येत नाहीत. आंदोलकांनी याकडं लक्ष द्यावं," असं शंभुराज देसाई म्हणाले.

शरद पवार, उद्धव ठाकरेंवर टीका : आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, "महाराष्ट्रात जातीय सलोखा बिघडला आहे. मात्र अशा परिस्थितीत ही राजकारण साधण्याची भूमिका शरद पवार गटाची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आहे‌ हे दिसून आलं. खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज याबाबत भूमिका मांडण्याची गरज होती. तसेच उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनंदेखील या प्रश्नावर त्यांची भूमिका मांडणं आवश्यक होतं. मात्र त्यांनी महाराष्ट्र पेटता कसा राहील, ही भूमिका घेतल्याची टीका प्रवीण दरेकरांनी केली." सरकार मराठा समाजासोबत आहे. पण ओबीसींवर अन्याय होणार नाही, हेदेखील सरकार पाहत आहे."

कोणालाही धक्का न लावता जरांगेंचा प्रश्न सोडवणार : "मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी केली होती. त्याबाबत 11 जणांची टीम हैदराबादला पाठवली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस उद्या तेलंगणा सरकारशी बोलतील, अशी माहिती प्रवीण दरेकरांनी दिली. कोणालाही धक्का न लावता जरांगे यांचा प्रश्न सोडवत आहोत, असं प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलं. समाजात तेढ निर्माण होणार नाही, यासाठी प्रयत्न करत आहोत. सगेसोयरेच्या बाजूनं किती आणि विरोधात किती हरकती आहेत, हे पाहावं लागत आहे. हे बारकावे पाहावे लागतात," असे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

  1. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी रस्सीखेच : फडणवीसांची चालणार जादू?: नाना पटोलेंचा विजयाचा दावा - Vidhan Parishad Elections
  2. केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना मोठा दिलासा; विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला 'हा' निर्णय - ECI on NCP SCP
  3. फुकटचे निर्णय हिताचे नसतात; शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला ‘हा’ मोलाचा सल्ला - Sharad Pawar On Farmers
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.