ETV Bharat / bharat

ईशान्य भारताच्या विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल

Rahul Gandhi On Assam CM : मंदिरात प्रवेश न दिल्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आसाम सरकारवर आरोप केले होते. आज भारत जोडो यात्रा आसाममधील खानापुरा या भागात पोहोचली असून राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

author img

By ANI

Published : Jan 23, 2024, 1:59 PM IST

Updated : Jan 23, 2024, 3:22 PM IST

Rahul Gandhi On Assam Cm
संपादित छायाचित्र

गुवाहाटी Rahul Gandhi On Assam CM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या आसाममध्ये आहे. भारत जोडो यात्रेत मंदिरात प्रवेश न दिल्यानं राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर मंगळवारी निशाना साधला आहे. "ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना भीती वाटावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळंच विद्यार्थ्यांना मला भेटू दिले जात नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.

देशाच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आसाममध्ये राजकीय विरोध होत आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी "आम्हाला सगळीकडं थांबवलं जात आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना जे ऐकायचं आहे, ते ऐकू दिलं पाहिजे. मात्र आसाममधील कोणत्याही शाळा, महाविद्यालयांमध्ये तसं होताना दिसत नाही. आम्हाला तुमची भाषा बोलता येत नाही, असं सांगितलं जात आहे. तुमचा इतिहास असू शकत नाही, असंही सांगितलं जात आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न : "ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या भारताचा विचार करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कोणत्याही भाषेत वाचन किंवा लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही हव्या त्या धर्मावर विश्वास ठेवण्यापासूनही कोणी तुम्हाला मज्जाव करू शकत नाही. विद्यार्थ्यांना विचार करण्यापासून रोखलं जात आहे. त्यामुळं भारताला तडे जातील, भारत टिकणार नाही," असाही दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला.

घाबरण्याची गरज नाही : "कोणत्याही विद्यार्थ्यानं घाबरण्याची गरज नाही. विद्यार्थी या देशाचं भविष्य आहेत." असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी आसाममधील खानापुरा भागातून मार्गक्रमण करत आहे. आज खानापुरा भागात पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटींग केली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

हेही वाचा :

  1. शिवसेना आमदार अपात्र निकाल पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
  2. श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

गुवाहाटी Rahul Gandhi On Assam CM : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या आसाममध्ये आहे. भारत जोडो यात्रेत मंदिरात प्रवेश न दिल्यानं राहुल गांधी यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर मंगळवारी निशाना साधला आहे. "ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना भीती वाटावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळंच विद्यार्थ्यांना मला भेटू दिले जात नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोपही राहुल गांधींनी यावेळी केला.

देशाच्या गृहमंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांना फोन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आसाममध्ये राजकीय विरोध होत आहे. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यावर राहुल गांधी यांनी "आम्हाला सगळीकडं थांबवलं जात आहे. देशाच्या गृहमंत्र्यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन राहुल गांधींनी विद्यार्थ्यांना भेटू नये, असं सांगितलं," असा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना जे ऐकायचं आहे, ते ऐकू दिलं पाहिजे. मात्र आसाममधील कोणत्याही शाळा, महाविद्यालयांमध्ये तसं होताना दिसत नाही. आम्हाला तुमची भाषा बोलता येत नाही, असं सांगितलं जात आहे. तुमचा इतिहास असू शकत नाही, असंही सांगितलं जात आहे," असा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न : "ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांना हव्या असलेल्या भारताचा विचार करण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. कोणत्याही भाषेत वाचन किंवा लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही. तुम्ही हव्या त्या धर्मावर विश्वास ठेवण्यापासूनही कोणी तुम्हाला मज्जाव करू शकत नाही. विद्यार्थ्यांना विचार करण्यापासून रोखलं जात आहे. त्यामुळं भारताला तडे जातील, भारत टिकणार नाही," असाही दावा राहुल गांधी यांनी यावेळी केला.

घाबरण्याची गरज नाही : "कोणत्याही विद्यार्थ्यानं घाबरण्याची गरज नाही. विद्यार्थी या देशाचं भविष्य आहेत." असं राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मंगळवारी आसाममधील खानापुरा भागातून मार्गक्रमण करत आहे. आज खानापुरा भागात पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटींग केली आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत आज पत्रकार परिषद घेणार आहेत.

हेही वाचा :

  1. शिवसेना आमदार अपात्र निकाल पुन्हा न्यायालयाच्या कचाट्यात; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
  2. श्रीरामाचा तंबूतला 500 वर्षाचा वनवास संपला, भव्यदिव्य मंदिरात विराजमान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Last Updated : Jan 23, 2024, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.