ETV Bharat / bharat

नैसर्गिक शेतीचं संरक्षण न केल्यास भविष्यात अन्नधान्यावरुन होईल युद्ध ; पद्मश्री सुभाष पाळेकरांचा इशारा - Subhash Palekar Warns

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 12:46 PM IST

Subhash Palekar Warns : झिरो बजेट शेतीचा प्रयोग आणि शाश्वत शेतीसाठी पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी मोठी जनजागृती केली आहे. मंगळवारी सुभाष पाळेकर यांनी हैदराबादेतील एका परिषदेत नैसर्गिक शेतीचं जनत न केल्यास भविष्यात अन्नधान्यावरुन युद्ध होईल, असा इशारा दिला आहे.

Subhash Palekar Warns
मार्गदर्शन करताना सुभाष पाळेकर (ETV Bharat)

हैदराबाद Subhash Palekar Warns : भविष्यात नैसर्गिक शेतीचं संरक्षण न केल्यास अन्नधान्यावरुन युद्ध होईल, असा इशारा पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दिला. मंगळवारी फिल्मनगर कल्चरल सेंटरमध्ये आयोजित परिषदेत पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवर अन्न सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या भवितव्याबद्दल पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हा इशारा दिला. नैसर्गिक शेतीचं तातडीनं संरक्षण गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पद्मश्री सुभाष पाळेकर हे त्यांच्या शाश्वत शेतीसाठी करण्यात आलेल्या झिरो बजेट शेतीच्या प्रयोगासाठी सुप्रसिद्ध आहेत.

आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हास : पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शाश्वत शेतीसाठी झिरो बजेट शेतीचा प्रयोग केला आहे. या प्रयोगातून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडं वळवलं आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हासच्या गंभीर परिणामांवर यावेळी आपलं मत व्यक्त केलं. "आधुनिक ट्रेंडमुळे कृषी उत्पन्नात घट होत आहे. नैसर्गिक संसाधनांच्या अविचारी नाशामुळे हवामानाच्या बदलात लक्षणीय वाढ होत आहे. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि विनाशकारी पुरांचा फटका शेतीला बसतो. त्यामुळे शेतीतून निघणाऱ्या उत्पादनाला आणखी धोका निर्माण होत आहे."

'सुभाष पाळेकर कृषी जन आंदोलन' : पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी कृषी जन आंदोलन सुरु केलं आहे. फिल्मनगर कल्चरल सेंटर इथं सुभाष पाळेकर यांनी त्यांच्या आदोलनावर भाष्य केलं. नैसर्गिक खतानं ह्युमस तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रासह, पिकाची लवचिकता आणि उत्पादकता वाढवण्यात फायदा होतो. डॉ सुभाष पाळेकर यांच्या मतानुसार, या बुरशीच्या एक किलो रोपांच्या मुळांना सहा लिटर पाणी पुरवू शकते. त्याची यंत्रणा हवेतून 90 टक्के पाण्याचा वापर करू शकते. हा दृष्टीकोन केवळ पाण्याची बचत करत नसून जमिनीची सुपीकता आणि वनस्पतींची प्रतिकारशक्ती देखील वाढवत आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. रासायनिक तसेच सेंद्रीय शेतीमुळे सजीवसृष्टी नष्ट होईल - डॉ. सुभाष पाळेकर
  2. अर्थसंकल्पीय बजेटची अंमलबजावणी होईल तेव्हाच समाधानी - डॉ. सुभाष पाळेकर

हैदराबाद Subhash Palekar Warns : भविष्यात नैसर्गिक शेतीचं संरक्षण न केल्यास अन्नधान्यावरुन युद्ध होईल, असा इशारा पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दिला. मंगळवारी फिल्मनगर कल्चरल सेंटरमध्ये आयोजित परिषदेत पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. जागतिक पातळीवर अन्न सुरक्षेचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या भवितव्याबद्दल पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी हा इशारा दिला. नैसर्गिक शेतीचं तातडीनं संरक्षण गरजेचं आहे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. पद्मश्री सुभाष पाळेकर हे त्यांच्या शाश्वत शेतीसाठी करण्यात आलेल्या झिरो बजेट शेतीच्या प्रयोगासाठी सुप्रसिद्ध आहेत.

आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हास : पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी शाश्वत शेतीसाठी झिरो बजेट शेतीचा प्रयोग केला आहे. या प्रयोगातून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडं वळवलं आहे. पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी आधुनिक कृषी पद्धती आणि पर्यावरणाचा ऱ्हासच्या गंभीर परिणामांवर यावेळी आपलं मत व्यक्त केलं. "आधुनिक ट्रेंडमुळे कृषी उत्पन्नात घट होत आहे. नैसर्गिक संसाधनांच्या अविचारी नाशामुळे हवामानाच्या बदलात लक्षणीय वाढ होत आहे. हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस आणि विनाशकारी पुरांचा फटका शेतीला बसतो. त्यामुळे शेतीतून निघणाऱ्या उत्पादनाला आणखी धोका निर्माण होत आहे."

'सुभाष पाळेकर कृषी जन आंदोलन' : पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी कृषी जन आंदोलन सुरु केलं आहे. फिल्मनगर कल्चरल सेंटर इथं सुभाष पाळेकर यांनी त्यांच्या आदोलनावर भाष्य केलं. नैसर्गिक खतानं ह्युमस तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रासह, पिकाची लवचिकता आणि उत्पादकता वाढवण्यात फायदा होतो. डॉ सुभाष पाळेकर यांच्या मतानुसार, या बुरशीच्या एक किलो रोपांच्या मुळांना सहा लिटर पाणी पुरवू शकते. त्याची यंत्रणा हवेतून 90 टक्के पाण्याचा वापर करू शकते. हा दृष्टीकोन केवळ पाण्याची बचत करत नसून जमिनीची सुपीकता आणि वनस्पतींची प्रतिकारशक्ती देखील वाढवत आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. रासायनिक तसेच सेंद्रीय शेतीमुळे सजीवसृष्टी नष्ट होईल - डॉ. सुभाष पाळेकर
  2. अर्थसंकल्पीय बजेटची अंमलबजावणी होईल तेव्हाच समाधानी - डॉ. सुभाष पाळेकर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.