ETV Bharat / bharat

"शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदार..." राहुल गांधींची महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर टीका - MAKE IN INDIA

देशाचे भविष्य तरुण ठरवणार असले तरी बेरोजगारीवर अद्याप उपाय सापडलेला नाही. यूपीए सरकार किंवा एनडीए सरकार असो त्यावर कोणालाही तोडगा काढता आलेला नाही.

Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2025, 3:10 PM IST

Updated : Feb 3, 2025, 4:09 PM IST

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचे कौतुक केले असले तरी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र डागलंय. राहुल गांधी लोकसभेत म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणात काहीही नवीन नव्हते. मी खरगेंशी भाषणासंदर्भात चर्चा केली, पण त्यात काही खास नव्हते. या देशाचे भविष्य तरुण ठरवणार असले तरी बेरोजगारीवर अद्याप उपाय सापडलेला नाही. यूपीए सरकार किंवा एनडीए सरकार असो त्यावर कोणालाही तोडगा काढता आलेला नाही.

शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदार : विशेष म्हणजे लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकींवरही बोट ठेवलंय. "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत जवळपास 70 लाख नवीन मतदारांची भर पडलीय. खरं तर ते हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्येइतके आहे. शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी झालीय. या सगळ्यात काही तरी गोंधळ आहे," असंही राहुल गांधी म्हणालेत.

'मेक इन इंडिया'चा विचार चांगला : राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा 'मेक इन इंडिया'चा विचार चांगला होता, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी असे म्हणत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण पंतप्रधानांच्या प्रयत्नांना कोणतेही यश मिळाले नाही. आम्ही उत्पादन चीनच्या हाती सोपवलेले आहे. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आलंय. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मोबाईल फोन दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हा फोन फक्त भारतातच असेम्बल केला जातोय. त्याचे सर्व पार्ट चीनमधून येथे आणले जाताहेत, त्यानंतर ते फोन बनवण्यासाठी येथे सगळं एकत्र केले जाते.

चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे - राहुल गांधी : राहुल गांधी म्हणाले की, उत्पादन क्षेत्रात वाढ नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. देशात विषमता वाढत आहे. रोजगाराबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही. एआय अर्थहीन आहे. डेटाशिवाय एआयचा अर्थ काय? चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे आहे. बॅटरी, ईव्ही या सर्वांबरोबरच तंत्रज्ञानातही चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. आपण चिनी टी-शर्टही घालतो तरीही आपणच चीनला कराचा भरणा करतो आहोत. मी या देशातील सर्व तरुणांना सांगू इच्छितो की, एक क्रांती होतेय. शेवटची क्रांती झाली ती संगणक क्रांती होती. तेव्हा आमच्या सरकारने ठरवले होते की, आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करू. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, संगणकांचा भारतावर कोणताही प्रभाव नाही, असंही राहुल गांधींनी अधोरेखित केलंय.

हेही वाचाः

महाकुंभ दुर्घटनेवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी, संसदेत गदारोळ

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया कार्यक्रमाचे कौतुक केले असले तरी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भाजपा सरकारवर टीकास्त्र डागलंय. राहुल गांधी लोकसभेत म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणात काहीही नवीन नव्हते. मी खरगेंशी भाषणासंदर्भात चर्चा केली, पण त्यात काही खास नव्हते. या देशाचे भविष्य तरुण ठरवणार असले तरी बेरोजगारीवर अद्याप उपाय सापडलेला नाही. यूपीए सरकार किंवा एनडीए सरकार असो त्यावर कोणालाही तोडगा काढता आलेला नाही.

शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदार : विशेष म्हणजे लोकसभेतील भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निवडणुकींवरही बोट ठेवलंय. "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्राच्या मतदार यादीत जवळपास 70 लाख नवीन मतदारांची भर पडलीय. खरं तर ते हिमाचल प्रदेश राज्याच्या लोकसंख्येइतके आहे. शिर्डीतील एकाच इमारतीत 7 हजारांहून अधिक मतदारांची नोंदणी झालीय. या सगळ्यात काही तरी गोंधळ आहे," असंही राहुल गांधी म्हणालेत.

'मेक इन इंडिया'चा विचार चांगला : राहुल गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींचा 'मेक इन इंडिया'चा विचार चांगला होता, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी असे म्हणत नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण पंतप्रधानांच्या प्रयत्नांना कोणतेही यश मिळाले नाही. आम्ही उत्पादन चीनच्या हाती सोपवलेले आहे. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आलंय. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मोबाईल फोन दाखवत राहुल गांधी म्हणाले की, हा फोन फक्त भारतातच असेम्बल केला जातोय. त्याचे सर्व पार्ट चीनमधून येथे आणले जाताहेत, त्यानंतर ते फोन बनवण्यासाठी येथे सगळं एकत्र केले जाते.

चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे - राहुल गांधी : राहुल गांधी म्हणाले की, उत्पादन क्षेत्रात वाढ नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. देशात विषमता वाढत आहे. रोजगाराबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही. एआय अर्थहीन आहे. डेटाशिवाय एआयचा अर्थ काय? चीन आपल्यापेक्षा 10 वर्षे पुढे आहे. बॅटरी, ईव्ही या सर्वांबरोबरच तंत्रज्ञानातही चीन आपल्यापेक्षा खूप पुढे आहे. आपण चिनी टी-शर्टही घालतो तरीही आपणच चीनला कराचा भरणा करतो आहोत. मी या देशातील सर्व तरुणांना सांगू इच्छितो की, एक क्रांती होतेय. शेवटची क्रांती झाली ती संगणक क्रांती होती. तेव्हा आमच्या सरकारने ठरवले होते की, आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करू. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की, संगणकांचा भारतावर कोणताही प्रभाव नाही, असंही राहुल गांधींनी अधोरेखित केलंय.

हेही वाचाः

महाकुंभ दुर्घटनेवर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी, संसदेत गदारोळ

Last Updated : Feb 3, 2025, 4:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.