क्रांती दिनानिमित्ताने जालन्यात मोदी सरकारविरोधात काँग्रेसची मशाल रॅली
जालना - क्रांती दिनानिमित्त जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीत जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी 'मोदी सरकार चले जाओ' च्या घोषणा दिल्या. मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलल्याचा निषेधार्थ ही रॅली काढण्यात आल्याची माहिती आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली.