सीमावादावर राज ठाकरेंना शंका! म्हणाले, हे मुद्दे कोणीतरी मुद्दाम पेरतय
कोल्हापूर सध्या सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एक शंका उपस्थित केली आहे. अचानकच एखादा मुद्दा कसा काय वरती येतो समजत नाही. हे जाणीवपूर्वक कोणीतरी करत आहे का, याचा शोध घेण्याची गरज आहे. सध्या सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय आपला निर्णय देईलच मात्र हे मुद्दे अचानक का समोर येतात? याच्यामागे नेमकं कोण आहे? किंव्हा महत्वाचे विषय झाकून राहावेत आणि माध्यमे केवळ तोच विषय दाखवत राहावेत यासाठी हा मुद्दा उपस्थित केला जात आहे का अशी शंका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ते कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST