ETV Bharat / state

वर्धा जिल्ह्यात सेरो सर्वेक्षणास सुरुवात; महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार

author img

By

Published : Aug 12, 2020, 7:02 AM IST

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार, जिल्ह्यात सेरो चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मदतीने ही चाचणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.

सिरो चाचणी
सिरो चाचणी

वर्धा - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार, जिल्ह्यात सेरो चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मदतीने ही चाचणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी म्हणजे, कोरोना चाचणी नसून यामध्ये यापूर्वी कोरोना झाला की नाही, हे माहिती करण्यासाठी रक्तातील अ‌ॅन्टिबॉडिज तपासल्या जाणार आहेत.

2 हजार 400 व्यक्तीचे रक्ताचे नमुने जिल्ह्यातील सर्वच भागातून घेतले जाणार आहे. हा अभ्यास करताना, जिल्ह्यातील काही भागातील लोकांची निवड केली जाते. सर्वसाधारण नागरिक, कंटेंन्मेंट झोनमधील नागरिक, तसेच अती जोखमीचे, अशा तीन गटात लोकांची निवड केली जाते. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस, भाजीविक्रेते, औद्योगिक कामगार यांच्यासह पत्रकारांचे सुद्धा नमुने घेतले जाणार आहेत.

रक्तातील अ‌ॅन्टिबॉडिज तपासल्या जाणार -

महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकाऱ्याने रक्ताचे नमुने गोळा केले जाते. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास हे तपासण्यासाठी अ‌ॅन्टिबॉडिज टेस्ट केली जाते. या तपासणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्तपेशी तयार झाल्या किंवा नाही हे तपासले जाते. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि त्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्त पेशी तयार झाल्या असतील, तर ते सेरो टेस्टमधून दिसून येते.

तपासणीसाठी नागरिकांची तीन गटात निवड -

ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असतील त्या परिसरातील ठराविक लोकांचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून शहरात मागील दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयाचे चमू शहरातील निवडक भागात रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम करत आहे. यामध्ये साधारण 70 लोकांचे नमुने घेण्यात आले असल्याची महिती वैद्यकीय अधिक्षक डॉ मोहन सुटे यांनी दिली. यासह जिल्ह्यातील इतर भागातीलही रक्ताचें नमुने घेतले जात आहे. भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, यांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे.

रक्ताच्या चाचणीसह काही प्रश्न सुद्धा विचारले जातात -

या काळात घरात कोणाला कोरोनाचा बाधा झाली का, घरातील कुटुंबाची संख्या, कंटेंन्मेंट झोनमध्ये यापूर्वी ते राहिले का, जिल्हाबाहेर किंवा बाहेर जिल्ह्यातील पाहुणे घरात आले का, यासह काही प्रश्न विचारून माहिती होय किंवा नाही मध्ये भरून तपासणी केली जात आहे. या सगळा डाटा गोळा केल्यानंतर यावर महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डॉक्टर आणि त्याचे पथक एक निष्कर्ष काढणार आहे.

वर्धा - भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) सूचनेनुसार, जिल्ह्यात सेरो चाचणीस सुरुवात करण्यात आली आहे. सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मदतीने ही चाचणी जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे. ही चाचणी म्हणजे, कोरोना चाचणी नसून यामध्ये यापूर्वी कोरोना झाला की नाही, हे माहिती करण्यासाठी रक्तातील अ‌ॅन्टिबॉडिज तपासल्या जाणार आहेत.

2 हजार 400 व्यक्तीचे रक्ताचे नमुने जिल्ह्यातील सर्वच भागातून घेतले जाणार आहे. हा अभ्यास करताना, जिल्ह्यातील काही भागातील लोकांची निवड केली जाते. सर्वसाधारण नागरिक, कंटेंन्मेंट झोनमधील नागरिक, तसेच अती जोखमीचे, अशा तीन गटात लोकांची निवड केली जाते. यामध्ये आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस, भाजीविक्रेते, औद्योगिक कामगार यांच्यासह पत्रकारांचे सुद्धा नमुने घेतले जाणार आहेत.

रक्तातील अ‌ॅन्टिबॉडिज तपासल्या जाणार -

महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या सहकाऱ्याने रक्ताचे नमुने गोळा केले जाते. एखाद्या व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास हे तपासण्यासाठी अ‌ॅन्टिबॉडिज टेस्ट केली जाते. या तपासणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्तपेशी तयार झाल्या किंवा नाही हे तपासले जाते. जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि त्या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रक्त पेशी तयार झाल्या असतील, तर ते सेरो टेस्टमधून दिसून येते.

तपासणीसाठी नागरिकांची तीन गटात निवड -

ज्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असतील त्या परिसरातील ठराविक लोकांचे नमुने गोळा करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील आर्वीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून शहरात मागील दोन दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालयाचे चमू शहरातील निवडक भागात रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम करत आहे. यामध्ये साधारण 70 लोकांचे नमुने घेण्यात आले असल्याची महिती वैद्यकीय अधिक्षक डॉ मोहन सुटे यांनी दिली. यासह जिल्ह्यातील इतर भागातीलही रक्ताचें नमुने घेतले जात आहे. भाजीविक्रेते, किराणा दुकानदार, यांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार आहे.

रक्ताच्या चाचणीसह काही प्रश्न सुद्धा विचारले जातात -

या काळात घरात कोणाला कोरोनाचा बाधा झाली का, घरातील कुटुंबाची संख्या, कंटेंन्मेंट झोनमध्ये यापूर्वी ते राहिले का, जिल्हाबाहेर किंवा बाहेर जिल्ह्यातील पाहुणे घरात आले का, यासह काही प्रश्न विचारून माहिती होय किंवा नाही मध्ये भरून तपासणी केली जात आहे. या सगळा डाटा गोळा केल्यानंतर यावर महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचे डॉक्टर आणि त्याचे पथक एक निष्कर्ष काढणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.