ETV Bharat / state

महापरीक्षा पोर्टल वाद.. पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षेला स्थगिती, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खासगी केंद्रवर घेऊ नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या गोंधळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सुचवले.

author img

By

Published : Dec 18, 2019, 7:41 PM IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर - शासकीय नोकऱ्यांच्या विविध पद भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे काम केले जात होते. मात्र, या पोर्टलमध्ये गैरप्रकार होत असल्याचा जोरदार आरोप झाल्यानंतर महापोर्टलला स्थगिती देण्यात आली आहे. तर यावर त्रयस्त संस्थेकडून याची दोनदा चौकशी झाली आहे, तिसऱ्यांदा सुरू आहे. लवकरच अहवाल आला की सादर केला जाईल. तसेच पशुसंवर्धन भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, असे अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

हेही वाचा - डिसेंबरमध्ये चांगले लोक जन्माला येतात, प्रतिभाताईंच्या सत्कारावेळी पवारांचे वक्तव्य

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खासगी केंद्रवर घेऊ नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या गोंधळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सुचवले. यावर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना महापरीक्षा पोर्टल तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करत बसण्यापेक्षा कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - महापोर्टल घोटाळा 'व्यापम'पेक्षाही मोठा - जितेंद्र आव्हाड

पशुसंवर्धन विभागाच्या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. कारण, 4 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, एकावेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, एवढी या पोर्टलची क्षमता नाही. त्यामुळे या परिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नागपूर - शासकीय नोकऱ्यांच्या विविध पद भरतीसाठी महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाइन परीक्षा घेण्याचे काम केले जात होते. मात्र, या पोर्टलमध्ये गैरप्रकार होत असल्याचा जोरदार आरोप झाल्यानंतर महापोर्टलला स्थगिती देण्यात आली आहे. तर यावर त्रयस्त संस्थेकडून याची दोनदा चौकशी झाली आहे, तिसऱ्यांदा सुरू आहे. लवकरच अहवाल आला की सादर केला जाईल. तसेच पशुसंवर्धन भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे, असे अधिवेशनात विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.

हेही वाचा - डिसेंबरमध्ये चांगले लोक जन्माला येतात, प्रतिभाताईंच्या सत्कारावेळी पवारांचे वक्तव्य

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खासगी केंद्रवर घेऊ नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले आहे. यापूर्वी झालेल्या गोंधळाची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सुचवले. यावर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना महापरीक्षा पोर्टल तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करत बसण्यापेक्षा कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा - महापोर्टल घोटाळा 'व्यापम'पेक्षाही मोठा - जितेंद्र आव्हाड

पशुसंवर्धन विभागाच्या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. कारण, 4 लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, एकावेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील, एवढी या पोर्टलची क्षमता नाही. त्यामुळे या परिक्षेला स्थगिती देण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Intro:विधानपरिषद
mh_ngp_cm_on_mahapariksha_portal_7205321

महाआयटीकडून होणाऱ्या पशुसंवर्धन परीक्षेला स्थगिती- मुख्यमंत्री


नागपूर - मागील काळात राज्य सरकारच्या विविध पद भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्याचे काम महापरिक्षा पोर्टलद्वारे केले जाते. यात अनेक गैरप्रकार होत असल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांचे 65 मोर्चे निघाले आहे. या पोर्टलचा फटका प्रामाणिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना होत आहे. यामुळे यावर परिषदेत आलेले प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले. उत्तरात त्रयस्त संस्थेकडून दोनदा चौकशी झाली आहे, तिसऱ्यांदा सुरू सुद्धा आहे. लवकरच अहवाल आला की सादर केला जाईल. तरी शंका प्रश्न असल्यास यावे स्वागत आहे. यासश पशुसंवर्धन भरती प्रक्रियेला स्थगिती दिली आहे असें मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सदनात म्हणाले.


यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी प्रश्न मांडून याकडे लक्ष वेधले. या परीक्षा खाजगी केंद्रवर घेऊन नये, त्यात मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे पुढे आले. यापूर्वी झालेलता गोंधळाची सुद्धा चौकशी झाकी पाहिजे असे सुचवले. यावर काँग्रेसचे सतेज पाटील यांनी ही लक्षवेधी सूचना मांडताना " महापरिक्षा पोर्टल"तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असून त्या दुरुस्त करत बसण्यापेक्षा कायमस्वरूपी रद्द करावे. कारण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाच्या विश्वास राहिलेला नाही. मुख्यमंत्री उद्धवजी यांनी सांगितलं की जालन्यात एकदा चूक होऊन गैरहजार विद्यार्थी पास झाल्याचे दाखवले. पण खऱ्या अर्थाने यापेक्षा अनेक ठिकाणी घोळ झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले मात्र नवीन तंत्रज्ञान असल्यामुळे ही परीक्षा प्रक्रियेत अडचणी आहेत. नवीन तंत्रज्ञान आले की पचवणे जड जाते आहे याचा अनुभव विरोधीपक्ष नेते घेत आहे. यामुळे हे तंत्रज्ञान आहे यात उणिवा आहे. पशुसंवर्धन विभागाचा भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. कारण चार लाख विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पोर्टलची क्षमता एकावेळी परीक्षा देऊ शकेल एवढी नाही. यामुळे आदेश दिले आहे की क्षमता वाढे पर्यंत या प्रक्रियेतुन भरती होऊ नये.पण कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. तरी वाटले की अयोग्य आहे तर ते ठरवण्याचा अधिकार सभापतींचा आहे. ते आपण करू.
Body:पराग ढोबळे, नागपूर.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.