ETV Bharat / state

'परखड असणाऱ्या डॉ. शीतल आमटेचा हा कठोर निर्णय धक्कादायकच'

डॉ. शीतल आमटे करजगी यांनी घेतलेले कठोर पाऊल अनेकाना धक्का देणारे ठरले. स्पष्ट परखड मत व्यक्त करणाऱ्या शीतल यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने घेतलेला निर्णय नक्कीच धक्कादायकच असल्याचे मत वर्ध्याचे पीपल्स फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी व्यक्त केले.

author img

By

Published : Nov 30, 2020, 7:53 PM IST

dr. shital amte
डॉ. शीतल आमटे

वर्धा - आनंदवन हे समाजकार्यात असणारे मोठे नाव आहे. यात बाबा आमटे यांच्या नातीने आज आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शीतल आमटे करजगी यांनी घेतलेले कठोर पाऊल अनेकाना धक्का देणारे ठरले. स्पष्ट परखड मत व्यक्त करणाऱ्या शीतल यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने घेतलेला निर्णय नक्कीच धक्कादायकच असल्याचे मत वर्ध्याचे पीपल्स फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना पीपल्स फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी

डॉ. शीतल आमटेना मागील वीस वर्षापासून पाहात आहे. शीतल यांच्याशी पहिली भेट ही सोमनाथ शिबीर म्हणजे, बाबा आमटे यांच्या श्रम संस्कार शिबिरात असताना झाली होती. या शिबिरात महाराष्ट्रभरातून अनेकांनी समाजकार्याचे धडे घेतले आहे. याच शिबिरातून आम्ही घडलो, डॉ. शीतल घडल्या. त्यांचे एखाद्या बाबीवर बोलताना परखड मत असायचे. काम करताना गांभीर्याने विषय समजून घेत पाऊल टाकनारा त्यांचा स्वभाव होता. अशा व्यक्तीने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे गोस्वामी यांनी सांगितले.

समस्यांचे निराकरण झाले असते..

विषय वादाचा असल्याचे पुढे येत आहे. यात कौटुंबिक विषयात बोलणे योग्य वाटत नाही. माझ्यासारख्या अनेकांसाठी हे तीर्थक्षेत्र आहे. या कुटुंबाशी अनेकदा संपर्क आला आहे. किंबहुना पंढरीच आहे. पण, यात तिसरी पिढीतील शीतल हिने अनेक वर्षे चांगले काम केले. पण, इतक्या मोठ्या कुटुंबातील व्यक्तिमत्वाने असा निर्णय घेणे, हे दुःखद आहे, असे गोस्वामी म्हणाले.

तर, शीतल यांच्या जाण्याने गोपुरी येथील खादी मंडळाचे सचिव डॉ. अतुल शर्मा हे भावूक झाले. शर्मा यांचे आमटे कुटुंबीयांशी कौटुंबिक घरोबा होता. शर्मा यांच्या पत्नी सुशमा शर्मा यांनीही ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले.

हेही वाचा - शेतकऱ्यांवर अन्यायाची भूमिका घेणारे कायमस्वरूपी संपले - पालकमंत्री सुनील केदार

वर्धा - आनंदवन हे समाजकार्यात असणारे मोठे नाव आहे. यात बाबा आमटे यांच्या नातीने आज आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. डॉ. शीतल आमटे करजगी यांनी घेतलेले कठोर पाऊल अनेकाना धक्का देणारे ठरले. स्पष्ट परखड मत व्यक्त करणाऱ्या शीतल यांच्यासारख्या व्यक्तीमत्वाने घेतलेला निर्णय नक्कीच धक्कादायकच असल्याचे मत वर्ध्याचे पीपल्स फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना पीपल्स फॉर अ‌ॅनिमलचे आशिष गोस्वामी

डॉ. शीतल आमटेना मागील वीस वर्षापासून पाहात आहे. शीतल यांच्याशी पहिली भेट ही सोमनाथ शिबीर म्हणजे, बाबा आमटे यांच्या श्रम संस्कार शिबिरात असताना झाली होती. या शिबिरात महाराष्ट्रभरातून अनेकांनी समाजकार्याचे धडे घेतले आहे. याच शिबिरातून आम्ही घडलो, डॉ. शीतल घडल्या. त्यांचे एखाद्या बाबीवर बोलताना परखड मत असायचे. काम करताना गांभीर्याने विषय समजून घेत पाऊल टाकनारा त्यांचा स्वभाव होता. अशा व्यक्तीने आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला यावर अजूनही विश्वास बसत नाही, असे गोस्वामी यांनी सांगितले.

समस्यांचे निराकरण झाले असते..

विषय वादाचा असल्याचे पुढे येत आहे. यात कौटुंबिक विषयात बोलणे योग्य वाटत नाही. माझ्यासारख्या अनेकांसाठी हे तीर्थक्षेत्र आहे. या कुटुंबाशी अनेकदा संपर्क आला आहे. किंबहुना पंढरीच आहे. पण, यात तिसरी पिढीतील शीतल हिने अनेक वर्षे चांगले काम केले. पण, इतक्या मोठ्या कुटुंबातील व्यक्तिमत्वाने असा निर्णय घेणे, हे दुःखद आहे, असे गोस्वामी म्हणाले.

तर, शीतल यांच्या जाण्याने गोपुरी येथील खादी मंडळाचे सचिव डॉ. अतुल शर्मा हे भावूक झाले. शर्मा यांचे आमटे कुटुंबीयांशी कौटुंबिक घरोबा होता. शर्मा यांच्या पत्नी सुशमा शर्मा यांनीही ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले.

हेही वाचा - शेतकऱ्यांवर अन्यायाची भूमिका घेणारे कायमस्वरूपी संपले - पालकमंत्री सुनील केदार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.