ठाणे : लम्पी आजारामुळे दोन वर्षांनंतर होणाऱ्या या यात्रेवर (Mhasa Fair At Thane) सावट होते. ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांच्या मागणीनंतर स्थानिक आमदारांनी राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या म्हसा यात्रेला ६ जानेवारी सुरुवात होऊन हि जत्रा भरणार असल्याने जनावरांचा बाजारात राज्यभरातून लाखो शेतकरी खरेदी विकीसाठी येत असतात. दरवर्षी पौष पौर्णिमेला या जत्रेची (Animal Fair Murbad) सुरुवात होते. (Buying and selling of animals) दरवर्षी राज्यभरातून २० ते २२ लाख भाविक या जत्रेला भेट देतात. म्हशा गावातील पुरातन असलेल्या खांबलिंगेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारं आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. (turnover of crores in sale of animals) यामुळे मंदिरात दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. (Latest news from Thane)
बैलबाजार ठरतेय जत्रेचे वैशिष्ट्य : जत्रेतला बैलबाजार हे या जत्रेचं प्रमुख वैशिष्ट्य असून येथे २५ हजारांपासून ते अगदी २ लाख रुपयांपर्यंतचे विविध प्रजातींचे बैल विक्रीसाठी आणले जातात. शिवाय बांबूच्या टोपल्या, झाडाच्या खोडापासून तयार केलेला उखळ, कोयते, कुदळ, विळे असं शेतीला उपयोगी पडणारं साहित्यही जत्रेत मिळतं. तर आकाश पाळणे, विविध खेळ यांच्यासह इथला घोंगडी बाजारही प्रसिद्ध आहे. म्हशाच्या जत्रेत मिळणारे हातोळी खाजा, गुलाबजामुन हे गोड पदार्थही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. १५ दिवस चालणाऱ्या या जत्रेला मुंबई, नगर, नाशिक , ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील लाखो भाविक आवर्जून भेट देतात.
महसूल विभागाच्या आदेशामुळे अडचन : शेतकऱ्यांसह ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेल्या जत्रा गेल्या दोन वर्षात निर्बंधांमध्ये पार पडल्या. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मानली जाणारी म्हसा येथील खांबलिंगेश्वराची यात्राही दोन वर्षे बंद होती. त्यामुळे या यात्रेत सहभागी होणारे व्यापारी, ग्रामस्थ आणि विक्रेते यंदा या यात्रेकडे डोळे लावून बसले होते. मात्र काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनावरांमधील लम्पी आजाराच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या म्हसा यात्रेत जनावरांचा बाजार भरणार नसल्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी वर्ग, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. म्हसा यात्रेत भरणारा जनावरांचा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र दोन वर्षांनंतरही हा बाजार होत नसल्याने सर्वांमध्ये नाराजी पसरली होती.
जत्रेची जय्यत तयारी : जिल्ह्यात लम्पीचा प्रभाव नाही. जनावरांचा धोका कमी झाला आहे त्यामुळे असे असतानाही जनावरांचा बाजार बंद ठेवणे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी योग्य नाही, अशी भूमिका किसन कथोरे यांनी हिवाळी आदिवेशातही मांडली होती. तसेच आमदार कथोरे यांनी निवेदन सादर करताच मंत्री विखे पाटील यांनी त्यावरच जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. याबाबतची परवानगी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर भरणारी म्हसा यात्रा यंदा जनावरांच्या बाजारसह मोठ्या प्रमeणात साजरी होणार आहे. यासाठी ग्रामीण पोलिसांचे पथकेही नेमण्यात आली असून त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून या जत्रेवर लक्ष ठेवणार असल्याची तयारी देखील केली आहे.