ETV Bharat / state

नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार, युवकांचा लक्षणीय सहभाग

author img

By

Published : Dec 22, 2019, 9:44 PM IST

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC च्या  विरोधात देशासह राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी शांततेत मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. आज ठाण्यात अनेक संघटनांनी एकत्र येत या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढला.

people protest against CAA & NRC in Thane
नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार

ठाणे - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC च्या विरोधात देशासह राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी शांततेत मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. आज ठाण्यात अनेक संघटनांनी एकत्र येत या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढला. यामध्ये युवी पिढीचा लक्षणीय सहभाग असल्याचे पाहायला मिळाले.

नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार

या मोर्चाला हजूरी येथून सुरुवात झाली व त्याची सांगता तीन हात नाका येथे झाली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते या मोर्चात सामील झाले होते. मोर्चात शाहीर संभाजी भगत यांनीही सहभाग घेतला होता. आजची युवापिढी संपूर्णपणे भरकटलेली असल्याचे आपल्याला वाटले होते. परंतू, आजच्या मोर्चात सामील झालेल्या तरुणाईला बघून अभिमान वाटल्याचे मत संभाजी भगत यांनी व्यक्त केले. आपली नाळ या मातीशी समाजाशी आणि देशाशी जोडली असल्याने देशाला तोडणाऱ्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. हा देश बाबासाहेबांच्या घटनेनुसार चालत असून सत्ताधारी समाजामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करावा यासाठी आपण या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे भगत यांनी सांगितले.

ठाणे - नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC च्या विरोधात देशासह राज्यात आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी शांततेत मोर्चे निघत आहेत तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. आज ठाण्यात अनेक संघटनांनी एकत्र येत या विधेयकाच्या विरोधात मोर्चा काढला. यामध्ये युवी पिढीचा लक्षणीय सहभाग असल्याचे पाहायला मिळाले.

नागरिकत्व कायद्याविरोधात ठाणेकरांचा एल्गार

या मोर्चाला हजूरी येथून सुरुवात झाली व त्याची सांगता तीन हात नाका येथे झाली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते या मोर्चात सामील झाले होते. मोर्चात शाहीर संभाजी भगत यांनीही सहभाग घेतला होता. आजची युवापिढी संपूर्णपणे भरकटलेली असल्याचे आपल्याला वाटले होते. परंतू, आजच्या मोर्चात सामील झालेल्या तरुणाईला बघून अभिमान वाटल्याचे मत संभाजी भगत यांनी व्यक्त केले. आपली नाळ या मातीशी समाजाशी आणि देशाशी जोडली असल्याने देशाला तोडणाऱ्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. हा देश बाबासाहेबांच्या घटनेनुसार चालत असून सत्ताधारी समाजामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना विरोध करावा यासाठी आपण या मोर्चाला पाठिंबा दिल्याचे भगत यांनी सांगितले.

Intro:NRC आणि CAB च्या विरोधात ठाणेकरांचा मोर्चा.. मोर्चात युवा पिढीची संख्या लक्षणीयBody:
राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात मोर्चे आणि आंदोलने केली जातं आहेत. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले परंतु बहुतांशी आंदोलने ही शांततेच्या मार्गाने काढली जात आहेत. आज ठाण्यात देखील अशाच एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले ज्यात शेकडो ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. ठाण्यातील अनेक संघटनांनी एकत्रितपणे काढलेल्या या मोर्च्यात मोठ्या प्रमाणात युवा पिढी दिसत होती. सदर मोर्च्याला हजूरी येथून सुरुवात झाली व त्याची सांगता तीन हात नाका येथे झाली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते या मोर्चात सामील झाले होते. मोर्च्यात सामील झालेल्या शाहीर संभाजी भगत यांनी आपले मनोगत प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केले. आजची युवापिढी संपूर्णपणे भरकटलेली असल्याचे आपल्याला वाटले होते परंतु आजच्या मोर्च्यात सामील झालेल्या तरुणाई ला बघून अभिमान वाटल्याचे ते म्हणाले. आपली नाळ या मातीशी समाजाशी आणि देशाशी जोडली असल्याने देशाला तोडणाऱ्या जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. हा देश बाबासाहेबांच्या घटनेनुसार चालत असून सत्ताधारी समाजामध्ये वितुष्टता निर्माण करण्याचे काम करत आहे त्यामुळे त्यांना विरोध करावा यासाठी आपण या मोर्चाला पाठिंबा दिल्याचं ते म्हणाले.
Byte संभाजी भगत सामाजिक कार्यकर्ते लोकशाहिरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.