ETV Bharat / business

एआय शिक्षणासाठी मोठी घोषणा, एआय सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा, ५०० कोटींची तरतुद - BUDGET 2025

केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये ५०० कोटी रुपयांच्या एआय सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलीय.

AI
एआय (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 1, 2025, 3:13 PM IST

Updated : Feb 1, 2025, 3:19 PM IST

हैदराबाद : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मध्ये एक नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) स्थापन करण्याची घोषणा केली. हा उपक्रम २०२५-२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये डिजिटल परिवर्तन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात एआय-चालित नवोपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी एआयमधील नवीन सीओई एआय संशोधनाला चालना देणे आणि शिक्षण क्षेत्रात त्याचा वापर वाढवणं सरकारचं उदिष्ट्ये आहे.

एआय केंद्रांचा विस्तार
शिक्षणासाठी एआयमधील नवीन सीओई ही गेल्या अर्थसंकल्पात सरकारनं जाहीर केलेल्या कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरांसाठी एआयमधील तीन उत्कृष्टता केंद्रांचा विस्तार आहे. हे एआय शैक्षणिक उद्देशांसाठी विशेषतः डिझाइन केलेले एआय मॉडेल तयार करण्यासाठी शीर्ष शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि खाजगी कंपन्यांशी सहयोग करेल. या मॉडेल्समध्ये वैयक्तिकृत शिक्षण, स्वयंचलित मूल्यांकन आणि एआय-संचालित ट्युटोरिंग सिस्टम असतील.

अर्थसंकल्पात एआयवर भर
सेक्युरोनिक्सचे भारत आणि सार्कचे कंट्री डायरेक्टर दीपेश कौरा यांनी सरकारच्या "एआय विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोना" चं कौतुक केलंय. तसंच सरकारनं सायबर सुरक्षेवर भर देण्याचं आवाहन केलंय. "या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एआयवर भर देणं, हे एक दूरगामी विचाराचं पाऊल आहे. आपण सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा अवलंब वाढवत असताना, आपल्या डिजिटल प्रगतीचं रक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देणं देखील अत्यावश्यक आहे," असं कौरा म्हणाले.

क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानावर लक्ष
सरकार तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यानं सुसज्ज करण्यासाठी पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे देखील स्थापन करेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. यात अभ्यासक्रम डिझाइन, प्रशिक्षकांचं प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणन फ्रेमवर्कचा समावेश असेल. अर्थमंत्र्यांनी स्टार्टअप्सला उत्प्रेरित करण्यासाठी डीप टेक निधीचा शोध घेण्याची योजना देखील जाहीर केली. उल्लेखनीय म्हणजे, डीप टेक ही एआय, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, प्रगत मटेरियल सायन्स, फोटोनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी गुंतवणूक आहे. या नवोपक्रमांमध्ये नवीन उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे.

हे वाचलंत का :

  1. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट
  2. महाराष्ट्रातून अर्थसंकल्पाला काय मिळालं? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"सर्वाधिक..."
  3. निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर काय स्वस्त होणार, काय महाग? वाचा, सविस्तर

हैदराबाद : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी ५०० कोटी रुपयांच्या तरतुदीसह आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) मध्ये एक नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) स्थापन करण्याची घोषणा केली. हा उपक्रम २०२५-२०२६ च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग आहे, ज्यामध्ये डिजिटल परिवर्तन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक क्षेत्रात एआय-चालित नवोपक्रमावर विशेष भर देण्यात आला आहे. शिक्षणासाठी एआयमधील नवीन सीओई एआय संशोधनाला चालना देणे आणि शिक्षण क्षेत्रात त्याचा वापर वाढवणं सरकारचं उदिष्ट्ये आहे.

एआय केंद्रांचा विस्तार
शिक्षणासाठी एआयमधील नवीन सीओई ही गेल्या अर्थसंकल्पात सरकारनं जाहीर केलेल्या कृषी, आरोग्य आणि शाश्वत शहरांसाठी एआयमधील तीन उत्कृष्टता केंद्रांचा विस्तार आहे. हे एआय शैक्षणिक उद्देशांसाठी विशेषतः डिझाइन केलेले एआय मॉडेल तयार करण्यासाठी शीर्ष शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था आणि खाजगी कंपन्यांशी सहयोग करेल. या मॉडेल्समध्ये वैयक्तिकृत शिक्षण, स्वयंचलित मूल्यांकन आणि एआय-संचालित ट्युटोरिंग सिस्टम असतील.

अर्थसंकल्पात एआयवर भर
सेक्युरोनिक्सचे भारत आणि सार्कचे कंट्री डायरेक्टर दीपेश कौरा यांनी सरकारच्या "एआय विकासासाठी धोरणात्मक दृष्टिकोना" चं कौतुक केलंय. तसंच सरकारनं सायबर सुरक्षेवर भर देण्याचं आवाहन केलंय. "या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात एआयवर भर देणं, हे एक दूरगामी विचाराचं पाऊल आहे. आपण सर्व क्षेत्रांमध्ये एआयचा अवलंब वाढवत असताना, आपल्या डिजिटल प्रगतीचं रक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षेला प्राधान्य देणं देखील अत्यावश्यक आहे," असं कौरा म्हणाले.

क्वांटम कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानावर लक्ष
सरकार तरुणांना उद्योगाशी संबंधित कौशल्यानं सुसज्ज करण्यासाठी पाच राष्ट्रीय कौशल्य केंद्रे देखील स्थापन करेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. यात अभ्यासक्रम डिझाइन, प्रशिक्षकांचं प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणन फ्रेमवर्कचा समावेश असेल. अर्थमंत्र्यांनी स्टार्टअप्सला उत्प्रेरित करण्यासाठी डीप टेक निधीचा शोध घेण्याची योजना देखील जाहीर केली. उल्लेखनीय म्हणजे, डीप टेक ही एआय, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, प्रगत मटेरियल सायन्स, फोटोनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक आणि क्वांटम कॉम्प्युटिंग सारख्या प्रगत तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी गुंतवणूक आहे. या नवोपक्रमांमध्ये नवीन उद्योग निर्माण करण्याची क्षमता आहे.

हे वाचलंत का :

  1. 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही, अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना मोठं गिफ्ट
  2. महाराष्ट्रातून अर्थसंकल्पाला काय मिळालं? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"सर्वाधिक..."
  3. निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर काय स्वस्त होणार, काय महाग? वाचा, सविस्तर
Last Updated : Feb 1, 2025, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.