ETV Bharat / sports

38th National Games: खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राचा डबल धामाका, महिला-पुरुषांच्या संघानी जिंकलं सुवर्णपदक - 38TH NATIONAL GAMES

हल्द्वानी येथे झालेल्या खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या महिला-पुरुषांच्या संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे.

38th National Games
महिलांच्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राची हॅटट्रिक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Feb 1, 2025, 3:13 PM IST

Updated : Feb 1, 2025, 4:45 PM IST

हल्द्वानी 38th National Games : उत्तराखंडमध्ये सध्या 38व्या राष्ट्रीय खेळांचं आयोजन केलं जात आहे. आज राष्ट्रीय खेळांचा पाचवा दिवस आहे. त्याच क्रमानं, आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये महिला खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महिलांच्या खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या महिला संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे, तर ओडिशानं रौप्यपदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले होते. त्याचप्रमाणे, पुरुष गटातही महाराष्ट्रानं अंतिम सामन्यात ओडिशाचा 32-26 गुणांनी पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र पुरुष संघानं दिल्लीला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

महाराष्ट्राकडून ओडिशाचा पराभव : हल्द्वानी येथील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या महिला खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र आणि ओडिशाच्या महिला संघांनी उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरी गाठली. आज शनिवारी दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघानं ओडिशाचा 31-28 असा पराभव केला. महाराष्ट्र संघानं खेळ संपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट 9 सेकंदांनी दोन गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट्राची खेळाडू अश्विनी सिंधरनं सर्वाधिक गुण मिळवले.

ओडिशाचं रौप्य पदकावर समाधान : अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे सरचिटणीस महेंद्र त्यागी म्हणाले की, अंतिम सामन्यात ओडिशा आणि महाराष्ट्राच्या संघांनी चांगला खेळ केला. महाराष्ट्राच्या महिला संघानं गेल्या दोन राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं आता तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच त्यांनी सांगितले की, ओडिशा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळल्यानंतर उपविजेता ठरला आहे.

दिल्लीचा पराभव करत फायनलमध्ये : शुक्रवारी महिला गटातील पहिल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रानं दिल्लीचा एक डाव आणि 8 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात ओडिशानं कर्नाटकचा 36-23 अशा फरकानं पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रानं पश्चिम बंगालचा 32-22 अशा फरकानं पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय खेळांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्रानं सुवर्णपदक जिंकलं होतं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओडिशानं केरळचा 32-26 अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा :

  1. ट्रेनच्या प्रवासभाड्यात मिळतंय IND vs ENG मुंबईत होणाऱ्या T20I मॅचचं तिकिटं, कसं बुक करायचं? वाचा सोपी ट्रीक
  2. Champions Trophy साठी सर्व आठ संघ जाहीर; 'हा' देश पहिल्यांदाच खेळणार

हल्द्वानी 38th National Games : उत्तराखंडमध्ये सध्या 38व्या राष्ट्रीय खेळांचं आयोजन केलं जात आहे. आज राष्ट्रीय खेळांचा पाचवा दिवस आहे. त्याच क्रमानं, आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये महिला खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या महिलांच्या खो-खो स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या महिला संघानं सुवर्णपदक जिंकलं आहे, तर ओडिशानं रौप्यपदक जिंकलं आहे. विशेष म्हणजे हा अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं प्रेक्षक आले होते. त्याचप्रमाणे, पुरुष गटातही महाराष्ट्रानं अंतिम सामन्यात ओडिशाचा 32-26 गुणांनी पराभव करुन सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र पुरुष संघानं दिल्लीला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

महाराष्ट्राकडून ओडिशाचा पराभव : हल्द्वानी येथील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या महिला खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र आणि ओडिशाच्या महिला संघांनी उपांत्य फेरी जिंकून अंतिम फेरी गाठली. आज शनिवारी दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघानं ओडिशाचा 31-28 असा पराभव केला. महाराष्ट्र संघानं खेळ संपण्यापूर्वी फक्त 1 मिनिट 9 सेकंदांनी दोन गुणांनी विजय मिळवला. महाराष्ट्राची खेळाडू अश्विनी सिंधरनं सर्वाधिक गुण मिळवले.

ओडिशाचं रौप्य पदकावर समाधान : अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे सरचिटणीस महेंद्र त्यागी म्हणाले की, अंतिम सामन्यात ओडिशा आणि महाराष्ट्राच्या संघांनी चांगला खेळ केला. महाराष्ट्राच्या महिला संघानं गेल्या दोन राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदकं जिंकली आहेत. 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघानं आता तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे. तसंच त्यांनी सांगितले की, ओडिशा संघ सलग तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळल्यानंतर उपविजेता ठरला आहे.

दिल्लीचा पराभव करत फायनलमध्ये : शुक्रवारी महिला गटातील पहिल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रानं दिल्लीचा एक डाव आणि 8 गुणांनी पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या सामन्यात ओडिशानं कर्नाटकचा 36-23 अशा फरकानं पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य फेरीत महाराष्ट्रानं पश्चिम बंगालचा 32-22 अशा फरकानं पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय खेळांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्रानं सुवर्णपदक जिंकलं होतं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात ओडिशानं केरळचा 32-26 अशा फरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा :

  1. ट्रेनच्या प्रवासभाड्यात मिळतंय IND vs ENG मुंबईत होणाऱ्या T20I मॅचचं तिकिटं, कसं बुक करायचं? वाचा सोपी ट्रीक
  2. Champions Trophy साठी सर्व आठ संघ जाहीर; 'हा' देश पहिल्यांदाच खेळणार
Last Updated : Feb 1, 2025, 4:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.