ETV Bharat / state

लॉकडाऊन इफेक्ट : कष्टकरी बांधवांच्या 'वेदनेला अंत नाही, त्याचीच कुणाला खंतही नाही'

रोजगार हमी योजनेवर काम करणारे काही परप्रांतीय मजूर हे टाळेबंदीमुळे त्रस्त झाले होते. यातील अनेक जण उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यातील आहेत. त्यांना परवानगी न मिळाल्याने ते चालतच आपल्या गावाकडे निघाले असून त्यांच्याकडे खाण्यापिण्याचे कोणतेही साहित्य नाही.

author img

By

Published : May 7, 2020, 8:00 PM IST

कामगारांना मदत करताना
कामगारांना मदत करताना

ठाणे - कोरोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीची किंमत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड असणाऱ्या कष्टकरी बांधवाना मोजावी लागत आहे. आजही हजारो कामगार रस्त्याच्या कडेने वेदनने व्हिव्हळत निघाले आहेत. आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील आहोत पण आभाळ फाटलंय ठिगळं लावायची तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ते दृश्य पाहून 'वेदनेला अंत नाही त्याचीच कुणाला खंतही नाही' अशी परिस्थिती कष्टकरी बांधवांवर कोरोनामुळे येऊन ठेपल्याची व्यथा श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी आपबितीतून मांडली आहे.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने भुकेल्या कष्टकऱ्यांसाठी माणुकीची थाळी सुरु केली आहे. काल रात्रीच्या सुमारास माणुकीची थाळी संपल्यावर पवार यांचे काही सहकारी कार्यालयामध्ये झोपण्यासाठी गेले. तर रात्रीचे साडे अकरा वाजता जयेश आपल्या घरी अकलोली येथे जायला निघाला असता भिवंडी-वाडा रस्त्यावरील सैतानी पुलाजवळ 150 ते 165 मजूर आणि एक महिला तिच्या कडेवर लहान बाळ घेऊन आंबडीकडे येताना त्याने पाहिले. या मजुरांना काहीतरी खायला देता येईल का? हा विचार करून जयेश पुन्हा कार्यालयात आला. मात्र, दुर्दैवाने जेवण संपले होते. शिवाय दोन्ही गॅसचे सिलेंडर संपलेले होते. त्यामुळे उपलब्ध असलेले फरसाण, बिस्किट्स, पाणी आणि डॉ. विनय पाटील यांनी दिलेली रेडी टू कुक खिचडी पॅकेट्स घेऊन प्रमोद पवार, जयेश, साई आणि नावनाथ त्या मजुरांकडे निघाले. तोपर्यंत ते मजूर सावरोली गावापर्यंत पोहोचले होते.

यामध्ये एक महिला आणि त्यांची 3 वर्षाची चिमुरडी देखील पायी प्रवासात आईच्या कडेवर बसून पार गळून गेलेली होती. त्यावेळी त्यांनाजवळ असलेले साहित्य व पाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. त्यांना रस्त्यालगत असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी साधारण एक किलोमीटर पुढे झोपण्याची व्यवस्था केली. यातील चिमुकलीचे कुटुंब उत्तर प्रदेशमधील जोनपूर, काही जण गोरखपूर व महाराज गंज तसेच मध्यप्रदेश मधील असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले.

पवार यांनी त्या मजुरांना विचारले, की एवढ्या लांब कसे जाणार तुम्ही या चिमुरडीला घेऊन तर त्यांचे चेहरे निरुत्तर होते. कोणतेही ठोस उत्तर, घरी पोहोचण्याची खात्री नसताना हे मजूर घराकडे शेकडो किलोमीटरचे अंतर कापत निघाले होते. या कष्टकरी मजूरांनी हे शेकडो मैलाचे अंतर कापून स्वतःला सर्वात लांब समजणाऱ्या रस्त्याचाही जणू गर्वहरण केल्याचे दिसून आल्याचे पवार यांनी सांगितले. तर पुढे खायची व्यवस्था काय? असे विचारले असता या खिचडीमध्ये भागवू आम्ही, मात्र पवार यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा ऑफिसमधून काही धान्याची किट घेऊन त्यांना तेल, मीठ, मसाला, कांदे, पोहे असे सगळे साहित्य घेऊन पुन्हा त्या ठिकाणी पोहचले. सर्व साहित्य देऊन पवार सहकाऱ्यांसोबत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरी पोहचले.

मात्र, त्या निष्पाप चिमुकलीचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नाहीये, काय चुकले होते त्यांचे? पोटाची खळगी भरायला आपले गाव सोडून इकडे येणारे मजूर आज सैरभैर चालत सुटले आहेत, असे प्रमोद पवार यांनी आपल्या आपबितीतून सांगितले. तर आज त्या चिमुरडीचा चेहरा पाहून खरच वाटले 'वेदनेला अंत नाही, त्याचीच कुणाला खंतही नाही', अशी परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाल्याची व्यथा प्रमोद पवार यांनी सरते शेवटी मांडली आहे.

हेही वाचा - कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असले तरी एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद करणे अशक्य..!

ठाणे - कोरोनामुळे सुरु असलेल्या टाळेबंदीची किंमत रोजगार हमी योजनेचे जॉबकार्ड असणाऱ्या कष्टकरी बांधवाना मोजावी लागत आहे. आजही हजारो कामगार रस्त्याच्या कडेने वेदनने व्हिव्हळत निघाले आहेत. आम्ही आमच्या परीने प्रयत्नशील आहोत पण आभाळ फाटलंय ठिगळं लावायची तरी कुठे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. ते दृश्य पाहून 'वेदनेला अंत नाही त्याचीच कुणाला खंतही नाही' अशी परिस्थिती कष्टकरी बांधवांवर कोरोनामुळे येऊन ठेपल्याची व्यथा श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी आपबितीतून मांडली आहे.

भिवंडी तालुक्यातील अंबाडी येथे श्रमजीवी संघटनेचे युवक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने भुकेल्या कष्टकऱ्यांसाठी माणुकीची थाळी सुरु केली आहे. काल रात्रीच्या सुमारास माणुकीची थाळी संपल्यावर पवार यांचे काही सहकारी कार्यालयामध्ये झोपण्यासाठी गेले. तर रात्रीचे साडे अकरा वाजता जयेश आपल्या घरी अकलोली येथे जायला निघाला असता भिवंडी-वाडा रस्त्यावरील सैतानी पुलाजवळ 150 ते 165 मजूर आणि एक महिला तिच्या कडेवर लहान बाळ घेऊन आंबडीकडे येताना त्याने पाहिले. या मजुरांना काहीतरी खायला देता येईल का? हा विचार करून जयेश पुन्हा कार्यालयात आला. मात्र, दुर्दैवाने जेवण संपले होते. शिवाय दोन्ही गॅसचे सिलेंडर संपलेले होते. त्यामुळे उपलब्ध असलेले फरसाण, बिस्किट्स, पाणी आणि डॉ. विनय पाटील यांनी दिलेली रेडी टू कुक खिचडी पॅकेट्स घेऊन प्रमोद पवार, जयेश, साई आणि नावनाथ त्या मजुरांकडे निघाले. तोपर्यंत ते मजूर सावरोली गावापर्यंत पोहोचले होते.

यामध्ये एक महिला आणि त्यांची 3 वर्षाची चिमुरडी देखील पायी प्रवासात आईच्या कडेवर बसून पार गळून गेलेली होती. त्यावेळी त्यांनाजवळ असलेले साहित्य व पाणी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. त्यांना रस्त्यालगत असलेल्या एका सुरक्षित ठिकाणी साधारण एक किलोमीटर पुढे झोपण्याची व्यवस्था केली. यातील चिमुकलीचे कुटुंब उत्तर प्रदेशमधील जोनपूर, काही जण गोरखपूर व महाराज गंज तसेच मध्यप्रदेश मधील असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले.

पवार यांनी त्या मजुरांना विचारले, की एवढ्या लांब कसे जाणार तुम्ही या चिमुरडीला घेऊन तर त्यांचे चेहरे निरुत्तर होते. कोणतेही ठोस उत्तर, घरी पोहोचण्याची खात्री नसताना हे मजूर घराकडे शेकडो किलोमीटरचे अंतर कापत निघाले होते. या कष्टकरी मजूरांनी हे शेकडो मैलाचे अंतर कापून स्वतःला सर्वात लांब समजणाऱ्या रस्त्याचाही जणू गर्वहरण केल्याचे दिसून आल्याचे पवार यांनी सांगितले. तर पुढे खायची व्यवस्था काय? असे विचारले असता या खिचडीमध्ये भागवू आम्ही, मात्र पवार यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा ऑफिसमधून काही धान्याची किट घेऊन त्यांना तेल, मीठ, मसाला, कांदे, पोहे असे सगळे साहित्य घेऊन पुन्हा त्या ठिकाणी पोहचले. सर्व साहित्य देऊन पवार सहकाऱ्यांसोबत पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घरी पोहचले.

मात्र, त्या निष्पाप चिमुकलीचा चेहरा डोळ्यासमोरुन जात नाहीये, काय चुकले होते त्यांचे? पोटाची खळगी भरायला आपले गाव सोडून इकडे येणारे मजूर आज सैरभैर चालत सुटले आहेत, असे प्रमोद पवार यांनी आपल्या आपबितीतून सांगितले. तर आज त्या चिमुरडीचा चेहरा पाहून खरच वाटले 'वेदनेला अंत नाही, त्याचीच कुणाला खंतही नाही', अशी परिस्थिती कोरोनामुळे निर्माण झाल्याची व्यथा प्रमोद पवार यांनी सरते शेवटी मांडली आहे.

हेही वाचा - कोरोनाग्रस्त रुग्ण वाढत असले तरी एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद करणे अशक्य..!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.