ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीचे पाणी सर्वात महाग; एका नळ जोडणीसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी - कल्याण-डोंबिवली पाणीपुरवठा विभाग

महापालिका हद्दीतील भोपर गावात मागील दीड महिन्यापासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून नवीन नळ जोडणीसाठी प्रयत्न केला. तेव्हा एका प्लंबरने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नाव घेऊन एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.

नळ जोडणीसाठी पन्नास हजारांची मागणी
नळ जोडणीसाठी पन्नास हजारांची मागणी
author img

By

Published : Jan 23, 2020, 9:30 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नळ जोडणीसाठी ५० हजार रुपये मागणीची ऑडिओ क्लिप नागरिकांनी व्हायरल केली आहे. या नळ जोडणी भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.

एका नळ जोडणीसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी


महापालिका हद्दीतील भोपर गावात मागील दीड महिन्यापासून नळाला पाणी येत नाही. नागरिकांनी स्वखर्चाने दीड किलोमीटरवरून पाण्याची पाईप लाईन टाकली आहे. मात्र, या पाईपलाईनमधूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून नवीन नळ जोडणीसाठी प्रयत्न केला. तेव्हा एका प्लंबरने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नाव घेऊन एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा - '...तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल'

या प्रकाराने भोपरच्या नागरिकांमध्ये संतापाची वातावरण आहे. गुरुवारी भोपरच्या नागरिकांनी महापौर विनिता राणे यांची भेट घेतली. एका नळ जोडणीला ५० हजार रुपये मागितल्याची ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

महापौर राणेंनीही ५० हजार रुपयांची मागणी करणारा प्लंबर काय सोन्याचा पाईप लावून देणार होता का ? असा प्रति प्रश्न भोपरच्या नागरिकांना केला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाठक आणि वैद्य यांना महापौर दालनात बोलवून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोवण्यास सांगून महापौर निघून गेल्या. त्यामुळे नागरीकारांचा पारा अधिक चढला.

भोपरच्या ग्रामस्थांनी ती ऑडिओ क्लिप अधिकाऱ्यांनाही ऐकवली. या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी आमचा संबध नसल्याचे सांगत ग्रामस्थांची बोळवण केली. पालिकेच्यावतीने ज्या पाईपलाईनने आसपासच्या गावांना पाणी पुरवठा होतो त्याच पाईप लाईनने भोपर गावाला देखील पाणी पुरवठा केला जातो. आसपासच्या गावांना सुरळीत पाणी पुरवठा केला जात असताना भोपरवासीयांवर अन्याय का, असा प्रश्न ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. ३१ जानेवारीपर्यंत पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास आमच्या पद्धतीने पाणी प्रश्न मार्गी लावू, असा इशारा नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आत्तापर्यंत ३९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर तर प्रत्येक महासभेत व स्थायी समितीच्या सभांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. मात्र, त्यावर ठोस कारवाई पालिका प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसून आले आहे.

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. नळ जोडणीसाठी ५० हजार रुपये मागणीची ऑडिओ क्लिप नागरिकांनी व्हायरल केली आहे. या नळ जोडणी भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.

एका नळ जोडणीसाठी पन्नास हजार रुपयांची मागणी


महापालिका हद्दीतील भोपर गावात मागील दीड महिन्यापासून नळाला पाणी येत नाही. नागरिकांनी स्वखर्चाने दीड किलोमीटरवरून पाण्याची पाईप लाईन टाकली आहे. मात्र, या पाईपलाईनमधूनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून नवीन नळ जोडणीसाठी प्रयत्न केला. तेव्हा एका प्लंबरने पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नाव घेऊन एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा - '...तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल'

या प्रकाराने भोपरच्या नागरिकांमध्ये संतापाची वातावरण आहे. गुरुवारी भोपरच्या नागरिकांनी महापौर विनिता राणे यांची भेट घेतली. एका नळ जोडणीला ५० हजार रुपये मागितल्याची ऑडिओ क्लिप त्यांना ऐकवून संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

महापौर राणेंनीही ५० हजार रुपयांची मागणी करणारा प्लंबर काय सोन्याचा पाईप लावून देणार होता का ? असा प्रति प्रश्न भोपरच्या नागरिकांना केला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाठक आणि वैद्य यांना महापौर दालनात बोलवून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोवण्यास सांगून महापौर निघून गेल्या. त्यामुळे नागरीकारांचा पारा अधिक चढला.

भोपरच्या ग्रामस्थांनी ती ऑडिओ क्लिप अधिकाऱ्यांनाही ऐकवली. या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाशी आमचा संबध नसल्याचे सांगत ग्रामस्थांची बोळवण केली. पालिकेच्यावतीने ज्या पाईपलाईनने आसपासच्या गावांना पाणी पुरवठा होतो त्याच पाईप लाईनने भोपर गावाला देखील पाणी पुरवठा केला जातो. आसपासच्या गावांना सुरळीत पाणी पुरवठा केला जात असताना भोपरवासीयांवर अन्याय का, असा प्रश्न ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. ३१ जानेवारीपर्यंत पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास आमच्या पद्धतीने पाणी प्रश्न मार्गी लावू, असा इशारा नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील आत्तापर्यंत ३९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. पाणी पुरवठा विभागाच्या कारभारावर तर प्रत्येक महासभेत व स्थायी समितीच्या सभांमध्ये सर्वपक्षीय नगरसेवक भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. मात्र, त्यावर ठोस कारवाई पालिका प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसून आले आहे.

Intro:kit 319Body:बापरे ! एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपये; केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील प्रकार

ठाणे : कल्याण - डोंबिवली महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने एका नळ जोडणीसाठी चक्क ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
विशेष म्हणजे एका नळ जोडणीसाठी ५० हजार रुपये घेणारी महाराष्ट्रातील एकमेव महापालिका असल्याचा आरोप पाणी टंचाईने ग्रस्त नागरिकांनी केला आहे. तर नळ जोडणीसाठी ५० हजार रुपये मागणीची ऑडिओ क्लिपच या नागरिकांनी व्हायरल केल्याने या नळ जोडणी भ्रष्ट्राचारात सहभागी असलेल्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहे.
महापालिका हद्दीतील डोंबिवलीनजीक भोपर गावात गेल्या दीड महिन्यापासून नळाला पाणीच येत नसल्याने नागरिकांनी पदरखर्चाने दीड किलोमीटर वरून पाण्याची पाईप लाईन टाकली आहे. मात्र याही पाईपलाईन मधून नळाला पाणीच येत नसल्याने या भागातील नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क करून नवीन नळ जोडणीसाठी प्रयत्न केला असता, एका नळ जोडणीला ५० हजार रुपयांची मागणी एका प्लंबरने अधिकाऱ्यांचे नाव घेऊन केल्याने भोपरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आज भोपरच्या नागरिकांनी महापौर विनिता राणे यांची भेट घेऊन ५० हजार रुपये एका नळ जोडणीला मागितल्याची ऑडिओ क्लिप दाखवून अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. तर महापौर राणेंनीही ५० हजार रुपये मागणी करणाऱ्या कर्मचारी , अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत ५० हजार रुपयांची मागणी करणारा प्लंबर का ? सोन्याचा पाईप लावून देणार होता का ? असा प्रति प्रश्न भोपरच्या नागरिकांना केला. त्यामुळे नागरीकारांचा पारा अधिक चढला होता. त्यांनतर पाणीपुरवठा विभागातील अधिकारी पाठक आणि वैदय यांना महापौर दालनात बोलवून या नागरिकांचा पाण्याच्या प्रश्न सोविण्यास सांगून महापौर निघून गेल्या.
दरम्यान, ग्रामस्थांनी ती ऑडिओ क्लिप अधिकाऱ्यांनाही ऐकवली, मात्र अधिकाऱ्यांनी याप्रकरणाशी आमचा संबध नसल्याचे सांगत ग्रामस्थांची बोळवण केली. विशेष म्हणजे पालिकेच्या वतीने ज्या पाईप लाईन ने आसपासच्या गावांना पाणी पूरवठा होतो त्याच पाईप लाईनने भोपर गावाला देखील पाणी पुरवठा केला जातो. आसपासच्या गावांना सुरळीत पुरेसा पाणी पुरवठा केला जात असताना भोपर वासीयांवर अन्याय का असा सवाल ग्रामस्थांनी अधिकाऱ्यासमोर उपस्थित केला. तर पाणी समस्येबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार केल्या निवेदने दिली, मात्र प्रशासनाकडुन पाणी समस्येची सोडवणूक न करता अडवणूक करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी करीत पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच ३१ जानेवारी पर्यंत पाणी प्रश्न मार्गी न लावल्यास आमच्या पद्धतीने पाणी प्रश्न मार्गी लावू असा इशारा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, कल्याण - डोंबिवली महापालिकेतील बहुतांश विभागात भ्रष्ट्राचाराला थारा देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच प्रशासनाने पदभार दिल्याने आतापर्यत ३९ अधिकारी ,कर्मचारी लाचलुचपत विभागाने पकडले आहेत. त्यातच पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर तर प्रत्येक महासभेत व स्थायी समितीच्या सभांमध्ये सर्व पक्षीय नगरसेवक भ्रष्ट्राचाराचे आरोप करीत असतात. मात्र त्यावर ठोस कारवाई पालिका प्रशासनाकडून होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळेच या विभागातील अधिकारी - कर्मचारी राजरोजपणे मनमानी कारभार करून करदात्या नागरिकांना वेठीस धरताना दिसत आहे. तर पाणीपुरवठा विभागाकडे मुबलक पाण्याचा साठा असूनही काही भागात पाणीटंचाई असल्याचे पाहवयास मिळत आहे. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईची झळ हिवाळ्यातच सोसावी लागत असल्याने त्रस्त नागरिकांवर महापालिकेवर मोर्चे, धरणे, आंदोलनाची वेळ येऊन ठेपली आहे
बाईट - मोहन माळी , भोपरचे रहिवाशी
सर, 1 बाईट बाईट, ३ व्हीज, 1ऑडिओ क्लिप , २ पिटूसी मोजोवर अपलोड
Conclusion:kdmc
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.