ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने, सिंधुदुर्गात परिस्थिती सामान्य

author img

By

Published : Jun 3, 2020, 12:24 PM IST

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती सामान्य आहे. पण किनारी भागात जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. तर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

Cyclone Nisarga intensified in Maharashtra : Sindhudurg district situation is normal
निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने, सिंधुदुर्गात परिस्थिती सामान्य

सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती सामान्य आहे. पण किनारी भागात जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. तर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मालवण तारकर्ली येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर काम करणारे आपत्कालीन ग्रुपनाही तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा देताना प्रतिनिधी....

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून मुंबईकडे कूच करत आहे. हे वादळ आज अलिबागला धडकून दुपारी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, हे वादळ मुंबईच्या दिशेने सरकत असल्याने सिंधुदुर्ग येथील विशेषतः किनारी भागातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवर आलेले फयान वादळाने मोठे नुकसान केले होते. यात अनेक मच्छिमार बेपत्ता झाल्याच्या घटनाही घडला होत्या. यामुळे या वादळाच्या शक्यतेने मच्छिमार समुद्रात गेलेले नाहीत.

हेही वाचा - मालवण तळाशील समुद्र किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा सापडला मृतावस्थेत

हेही वाचा - चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सिंधुदुर्गात यंत्रणा सज्ज; 'एनडीआरएफ'चे पथक तैनात

सिंधुदुर्ग - निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिस्थिती सामान्य आहे. पण किनारी भागात जोरदार वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. तर जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मालवण तारकर्ली येथे एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिक पातळीवर काम करणारे आपत्कालीन ग्रुपनाही तयारीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा देताना प्रतिनिधी....

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले 'निसर्ग' चक्रीवादळ कोकण किनारपट्टीहून मुंबईकडे कूच करत आहे. हे वादळ आज अलिबागला धडकून दुपारी मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने रेड अलर्ट देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. या वादळाचा फटका अलिबाग, रत्नागिरी, पालघरसह मुंबईलाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, हे वादळ मुंबईच्या दिशेने सरकत असल्याने सिंधुदुर्ग येथील विशेषतः किनारी भागातील भीतीचे वातावरण कमी झाले आहे. काही वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीवर आलेले फयान वादळाने मोठे नुकसान केले होते. यात अनेक मच्छिमार बेपत्ता झाल्याच्या घटनाही घडला होत्या. यामुळे या वादळाच्या शक्यतेने मच्छिमार समुद्रात गेलेले नाहीत.

हेही वाचा - मालवण तळाशील समुद्र किनाऱ्यावर महाकाय व्हेल मासा सापडला मृतावस्थेत

हेही वाचा - चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सिंधुदुर्गात यंत्रणा सज्ज; 'एनडीआरएफ'चे पथक तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.