सातारा - रामजन्मभूमी अयोध्या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर 'सातारा शहराला सामाजिक ऐक्याची परंपरा आहे. निकालानंतर कोणत्याही व्यक्तीने, समाजाने तसेच सोशल मिडीयावर व्यक्त न होता,शहराची शांतता अबाधीत ठेवावी, असे आव्हान पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.
हेही वाचा... मुंबईत ४०,००० पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सोशल मीडियावर करडी नजर
फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटरसारख्या सोशल मिडीयावर अयोध्या निकालासंबंधी पोस्ट करु नये. अशाप्रकारे कोणतेही कृत्य झाल्यास त्यातून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. अयोध्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अफवांवर विश्वास ठेवू नये. या कालावधीमध्ये कोणतीही माहिती मिळाल्यास ती सोशल मिडीयावर व्हायरल न करता तत्काळ शहर पोलिसांना तसेच कंट्रोल रुमला कळवावे. सातारकरांनी सामाजिक ऐक्याची परंपरा जपल्याचा इतिहास आहे. हीच पंरपरा यापुढेही जपावी व सातारकरांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते यांनी केले आहे.