ETV Bharat / state

द्राक्ष बागायतदारांच्या व्यथा; सातबारा तरी कोरा करा, नाहीतर कर्ज माफी द्या

author img

By

Published : Nov 18, 2019, 8:19 AM IST

जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे येथील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान  झाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी. तसेच पीक विम्याची रक्कम मिळावी अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

द्राक्ष बागायतदारांची नुकसानभरपाईची मागणी

सातारा - जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

द्राक्ष बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी

दुष्काळी तालुके म्हणून राज्यात ओळख असलेल्या या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, अशी येथील परिस्थिती आहे. या परिस्थितीतही येथील काही शेतकरी द्राक्ष व डाळींबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करीत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी शेतकरी पाणी विकत घेवून या बागांचे संगोपन करीत आहेत. यंदा तर दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसला. त्यामुळे या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून टँकरने पाणी विकत आणून त्यांचे संगोपन केले आहे.

हेही वाचा - कराड पंचायत समितीमधील मानापमान नाट्य थांबेना; यशवंतरावांचा अवमान होण्याचा धोका

मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या फळबागा मात्र गत काही दिवसांपासूर्वी झालेल्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. या पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी. तसेच पीक विम्याची रक्कम मिळावी अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - 'जिद्दीने खेळल्यास विजय निश्चित',साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन

सातारा - जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

द्राक्ष बागायतदारांची नुकसान भरपाईची मागणी

दुष्काळी तालुके म्हणून राज्यात ओळख असलेल्या या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, अशी येथील परिस्थिती आहे. या परिस्थितीतही येथील काही शेतकरी द्राक्ष व डाळींबाच्या बागांना मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करीत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी शेतकरी पाणी विकत घेवून या बागांचे संगोपन करीत आहेत. यंदा तर दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसला. त्यामुळे या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून टँकरने पाणी विकत आणून त्यांचे संगोपन केले आहे.

हेही वाचा - कराड पंचायत समितीमधील मानापमान नाट्य थांबेना; यशवंतरावांचा अवमान होण्याचा धोका

मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या फळबागा मात्र गत काही दिवसांपासूर्वी झालेल्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. या पावसामुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी. तसेच पीक विम्याची रक्कम मिळावी अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा - 'जिद्दीने खेळल्यास विजय निश्चित',साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचे प्रतिपादन

Intro:सातारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव, या भागातील शेतकर्यांच्या फळबागा पुर्णपणे उध्दवस्त झाल्याने या परिसरातील शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे.

Body:दुष्काळी तालुके म्हणुन राज्यात ओळख असलेले हे तालुके पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी पाण्याचे टँकर सुरु करावे लागतात अशी येथील परिस्थिती आहे, या परिस्थित ही येथील काही शेतकरी द्राक्ष व डाळींबाचे मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करीत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी पाणी विकत घेवुन ते या बागांचे संगोपन करीत आहेत. यंदा तर गंभीर पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसल्याने या बागा जगवण्यासाठी या शेतकर्यांनी परजिल्ह्यातुन टँकरने पाणी विकत आणुन त्यांचे संगोपन केले आहे, मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या फळबागा मात्र गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे पुर्णपणे उध्दवस्त झाल्या असुन त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावुन नेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे, कोट्यावधी रुपयांचे नुकसान या पावसामुळे झाले असल्याने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी व पिक विम्याची रक्कम मिळावी अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकर्यांकडुन केली जात आहे.

बाईट
1.शहाजी देशमुख, खटाव साताराConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.