ETV Bharat / state

ओला दुष्काळ जाहीर करा; शिवसैनिकांचा विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

author img

By

Published : Nov 25, 2019, 10:01 PM IST

राज्यपालांच्या आदेशानुसार देण्यात येणारी हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई ही अतिशय तुटपुंजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पावसाच्या उघडीपीच्या काळात शेतकर्‍यांनी शेतातील खरब झालेली पिके काढून टाकली. त्यामुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पीक पाहणीच्या आधारे पंचनामे न करता 7/12 वरील पीकांच्या नोंदीवरून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शिवसैनिकांनी केली आहे.

शिवसैनिकांचा विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

सोलापूर - अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टर 25 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज (25 नोव्हेंबर) दुपारी शिवसेनेच्या वतीने विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

शिवसैनिकांचा विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

राज्यपालांच्या आदेशानुसार देण्यात येणारी हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई ही अतिशय तुटपुंजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पावसाच्या उघडीपीच्या काळात शेतकर्‍यांनी शेतातील खरब झालेली पिके काढून टाकली. त्यामुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पीक पाहणीच्या आधारे पंचनामे न करता 7/12 वरील पीकांच्या नोंदीवरून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शिवसैनिकांनी केली आहे. त्यासोबतच पीकविमा कंपन्यांनी पंचनाम्यानुसार 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 25 हजारांची मदत द्या; शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलींद कदम यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.

सोलापूर - अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रति हेक्टर 25 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या प्रमुख मागणीसाठी आज (25 नोव्हेंबर) दुपारी शिवसेनेच्या वतीने विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता.

शिवसैनिकांचा विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

राज्यपालांच्या आदेशानुसार देण्यात येणारी हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई ही अतिशय तुटपुंजी असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. पावसाच्या उघडीपीच्या काळात शेतकर्‍यांनी शेतातील खरब झालेली पिके काढून टाकली. त्यामुळे त्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. पीक पाहणीच्या आधारे पंचनामे न करता 7/12 वरील पीकांच्या नोंदीवरून नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी या शिवसैनिकांनी केली आहे. त्यासोबतच पीकविमा कंपन्यांनी पंचनाम्यानुसार 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 25 हजारांची मदत द्या; शिवसेनेचा जळगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलींद कदम यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Intro:ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी
शिवसैनिकांचा विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

प्रताप मेटकरी /विटा
      ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यपाल यांच्या आदेशानुसार हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र ती अत्यंत तुटपुंजी असून त्याऐवजी
हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जावी, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलींद कदम यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत विटा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चानंतर तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
      Body:व्हीओ

आज सोमवारी सकाळी लेंगरे रस्ता येथील शिवसेना भवनपासून धडक मोर्चास सुरवात झाली. जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी चौकमार्गे हा मोर्चा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत दाखल झाला. यावेळी तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
               
Conclusion:संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍याचा हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. मोडून पडलेल्या शेतकर्‍याला पुन्हा उभा करण्यासाठी सरकारी पातळीवरुन त्वरित कार्यवाही होणे अपेक्षित आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रमुख मागण्यांचे निवेदन देत आहोत. अवकाळीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करावा, राज्यपाल यांच्या आदेशानुसार हेक्टरी 8 हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे. मात्र ती अत्यंत तुटपुंजी असून त्याऐवजी हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जावी, पावसाच्या उघडीपीच्या काळात शेतकर्‍यांनी शेतातील पिके काढून टाकली. त्यामुळे त्यांच्या नुकसानाचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे पिकांवरुन पंचनामे न करता 7/12 वरील पिकांच्या नोंदीवरून त्यांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, पावसामुळे उध्वस्त झालेली जमीन पुन्हा उपजाऊ करण्यासाठी ती कामे मनरेगातून करण्यात यावीत, पिकविमा कंपन्यांनी पंचनाम्यानुसार शेतकर्‍याला 100 टक्के नुकसान भरपाईचे पिकविमा रयकम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावी व तसे आदेश व्हावेत, रब्बी हंगाम पीक पेरणीसाठी शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, बँकाकडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली पूर्णपणे थांबवावी, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे शेतकरी पुढील पाच वर्षे सावरु शकणार नाही. त्यामुळे त्यांची शेतीचे वीज बिले, मुलांची शैक्षणिक फी माफ करावी, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा, या प्रमुख मागण्यांचा तातडीने विचार होवून कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.
        यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश निकम, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. मिलींद कदम, तालुकाप्रमुख दादा भगत, शहरप्रमुख राजू जाधव, नगरसेवक अमर शितोळे, उपतालुुकाप्रमुख सचिन अडसुळ, बाजार समितीचे संचालक सुनिल मेटकरी, भारत पवार, प्रकाश बागल, युवा सेनेचे तालुकाप्रमुख आकाश माने, रामचंद्र भिंगारदेवे, समीर कदम, अनिल हराळे, रणजीत कदम, धनाजी कदम, किरणदाजी पाटील, विजय सपकाळ, किसन मेटकरी, आय्याज मुल्ला, अक्षय पाटील, अतुल कदम, स्वप्नील चोथे, विक्रम पंडीत, दीपक कदम, मिथून लिगाडे, आनंदा माळी, राहुल शितोळे, राजू राठोड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.