ETV Bharat / state

राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार येईल - जयंतराव पाटील

सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. साखराळे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन त्यांनी मतदान केले.

author img

By

Published : Oct 21, 2019, 12:36 PM IST

जयंतराव पाटील

सांगली- राज्यात काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार येईल असा, विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. जयंतराव पाटील यांनी आज इस्लामपूर येथील साखराळे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बोलत होते.

जयंतराव पाटील

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. साखराळे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन त्यांनी मतदान केले. तर याठिकाणी मतदानाच्या सुरवातीला 45 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यावरुन वेळ वाढवून देण्याची पाटील यांनी मागणी केली होती. मात्र निवडणूक प्रशासनाने याला नकार दिला. तर यावर नाराजी व्यक्त करत राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे सरकार येईल, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

सांगली- राज्यात काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार येईल असा, विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. जयंतराव पाटील यांनी आज इस्लामपूर येथील साखराळे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते बोलत होते.

जयंतराव पाटील

हेही वाचा- विरोधी पक्ष दिसतच नाही, निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे वर्चस्व - पियूष गोयल

सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. साखराळे येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब जाऊन त्यांनी मतदान केले. तर याठिकाणी मतदानाच्या सुरवातीला 45 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडले होते. यावरुन वेळ वाढवून देण्याची पाटील यांनी मागणी केली होती. मात्र निवडणूक प्रशासनाने याला नकार दिला. तर यावर नाराजी व्यक्त करत राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे सरकार येईल, असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:Filename - mh_sng_04_jayant_patil_on_voting_vis_01_7203751 - mh_sng_04_jayant_patil_on_voting_byt_04_7203751


स्लग - राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार येईल,सह कुटुंब जयंतराव पाटील यांनी बाजवला मतदानाचा हक्क..

अँकर - राज्यात काँग्रेस आघाडीला या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे,त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पुरोगामी विचारांचे सरकार येईल असा ,विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. जयंतराव पाटील यांनी आज इस्लामपूर येथील साखराळे सह कुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यावेळी ते बोलत होते. Body:सांगलीच्या इस्लामपूर मतदार संघातुन राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.साखराळे येथील मतदान केंद्रावर सह कुटुंब जाऊन त्यांनी मतदान केले आहे.तर याठिकाणी मतदानाच्या सुरवातीला 45 मिनिटे ईव्हीएम मशीन बंद पडले होते,यावरून वेळ वाढवून देण्याची पाटील यांनी मागणी केली होती,मात्र निवडणूक प्रशासनाने याला नकार दिला .तर यावर नाराजी व्यक्त करत राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे,यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पुरोगामी विचारांचे सरकार येईल ,असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

बाईट - जयंतराव पाटील - प्रदेशाध्यक्ष ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.