ETV Bharat / state

रत्नागिरीत दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय

author img

By

Published : Jan 29, 2020, 8:01 PM IST

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित करण्यात आली होती.

Shashvat Paryatan Parishad
शाश्‍वत पर्यटन परिषद


रत्नागिरी - एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने यातून पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले.

शाश्‍वत पर्यटन परिषद

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित करण्यात आली होती.

या वेळी हिरवळ संस्थेचे प्रमुख, जलनायक किशोर धारिया, मीनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, अ‍ॅड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, उल्का विश्‍वासराव, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.

दिवसभरातील कार्यशाळांमध्ये आनंदाचे शेत फुणगूस-राहुल कुळकर्णी, रस्टिक हॉलिडेज तुरळ-शिल्पा करकरे, डोंगरमाथा चिपळूण मंगेश गोवेकर, शेरलीन मोंटा पाचल, अविनाश पाटील, कोकण नेस्ट निवेंडी यज्ञेश भिडे, कोकण गाभा लांजा शिरीष झारापकर, पितांबरी फार्मस, राजापूर हेमंत देवधर यांनी आपापल्या प्रकल्पांची माहिती सादर केली.

कृषी पर्यटन, होम स्टे प्रकल्पधारक, पर्यटन सहकारी संस्था, ट्रॅव्हल्स एजंट यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. त्यासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. कोकणात पर्यटन वाढीसाठी काही पावले उचलण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी कोकणात पर्यटनविषयक कामगिरी करणार्‍या प्रातिनिधीक निसर्गयात्री संस्था, आर्किटेक्ट मकरंद केसरकर, सी फॅन्स बीच रिसॉर्ट, सुधीर रिसबूड यांनी परिषद यशस्वी होण्याकरिता योगदान दिले.


रत्नागिरी - एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने यातून पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले.

शाश्‍वत पर्यटन परिषद

रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित करण्यात आली होती.

या वेळी हिरवळ संस्थेचे प्रमुख, जलनायक किशोर धारिया, मीनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, अ‍ॅड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, उल्का विश्‍वासराव, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.

दिवसभरातील कार्यशाळांमध्ये आनंदाचे शेत फुणगूस-राहुल कुळकर्णी, रस्टिक हॉलिडेज तुरळ-शिल्पा करकरे, डोंगरमाथा चिपळूण मंगेश गोवेकर, शेरलीन मोंटा पाचल, अविनाश पाटील, कोकण नेस्ट निवेंडी यज्ञेश भिडे, कोकण गाभा लांजा शिरीष झारापकर, पितांबरी फार्मस, राजापूर हेमंत देवधर यांनी आपापल्या प्रकल्पांची माहिती सादर केली.

कृषी पर्यटन, होम स्टे प्रकल्पधारक, पर्यटन सहकारी संस्था, ट्रॅव्हल्स एजंट यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. त्यासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. कोकणात पर्यटन वाढीसाठी काही पावले उचलण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी कोकणात पर्यटनविषयक कामगिरी करणार्‍या प्रातिनिधीक निसर्गयात्री संस्था, आर्किटेक्ट मकरंद केसरकर, सी फॅन्स बीच रिसॉर्ट, सुधीर रिसबूड यांनी परिषद यशस्वी होण्याकरिता योगदान दिले.

Intro:रत्नागिरीत दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय

रत्नागिरी, प्रतिनिधी

एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास व त्यातून रोजगाराच्या दृष्टीने यातून पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी केले.
रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटनावेळी ते आज बोलत होते. अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित करण्यात आली होती.
या वेळी हिरवळ संस्थेचे प्रमुख, जलनायक किशोर धारिया, मीनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, अ‍ॅड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, उल्का विश्‍वासराव, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते.
दिवसभरातील कार्यशाळांमध्ये आनंदाचे शेत फुणगूस-राहुल कुळकर्णी, रस्टिक हॉलिडेज तुरळ-शिल्पा करकरे, डोंगरमाथा चिपळूण मंगेश गोवेकर, शेरलीन मोंटा पाचल, अविनाश पाटील, कोकण नेस्ट निवेंडी यज्ञेश भिडे, कोकण गाभा लांजा शिरीष झारापकर, पितांबरी फार्मस, राजापूर हेमंत देवधर यांनी आपापल्या प्रकल्पांची माहिती सादर केली.
कृषी पर्यटन, होम स्टे प्रकल्पधारक, पर्यटन सहकारी संस्था, ट्रॅव्हल्स एजंट यांनी आपल्या अडचणी सांगितल्या. त्यासंदर्भात सांगोपांग चर्चा झाली. कोकणात पर्यटन वाढीसाठी काही पावले उचलण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. याप्रसंगी कोकणात पर्यटनविषयक कामगिरी करणार्‍या प्रातिनिधीक निसर्गयात्री संस्था, आर्किटेक्ट मकरंद केसरकर, सी फॅन्स बीच रिसॉर्ट, सुधीर रिसबूड यांनी परिषद यशस्वी होण्याकरिता बहुमूल्य योगदान दिले.
Body:रत्नागिरीत दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय Conclusion:रत्नागिरीत दुसर्‍या शाश्‍वत पर्यटन परिषदेत पर्यटन वाढीसाठी विचारविनिमय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.