ETV Bharat / state

तिवरे धरण दुर्घटना : १९ मृतदेह सापडले, अद्यापही शोधमोहीम सुरूच - found

जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. यापैकी १९ जणांचे मृतदेह हाती आले आहे. सध्याही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) शोधमोहीम सुरूच आहे.

तिवरे धरण दुर्घटना
author img

By

Published : Jul 5, 2019, 11:11 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. यापैकी १९ जणांचे मृतदेह हाती आले आहे. सध्याही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) शोधमोहीम सुरूच आहे.

ratnagiri
तिवरे धरण दुर्घटना: १९ मृतदेह हाती

एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ratnagiri
शोधमोहीम सुरू

तिवरे धरणाचे बांधकाम २००४ साली पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात धरण खचल्याचे पत्र मिळाले होते. त्यानंतर माती आणून त्याठिकाणी उतारात पडलेला खड्डा बुजवण्यात आला होता. गेल्या १ तारखेला धरण फक्त २५ ते ३० टक्केच भरले होते. मात्र, २ तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे १९० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याची पातळी अचानक ९ मीटरने वाढली. त्यामुळे सांडवा भरून वाहू लागला. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यामध्ये फरक पडला आणि त्यामुळे हे धरण फुटले आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यातील चिपळून तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याच्या दुर्घटनेत २३ जण वाहून गेले होते. यापैकी १९ जणांचे मृतदेह हाती आले आहे. सध्याही राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) शोधमोहीम सुरूच आहे.

ratnagiri
तिवरे धरण दुर्घटना: १९ मृतदेह हाती

एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक तसेच काही स्वयंसेवी संस्थाचे कार्यकर्ते बेपत्ता नागरिकांचा शोध घेत आहेत. शेवटचा मृतदेह सापडेपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवणार असल्याची माहिती एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ratnagiri
शोधमोहीम सुरू

तिवरे धरणाचे बांधकाम २००४ साली पूर्ण झाले होते. त्यानंतर गेल्या फेब्रुवारी महिन्यात धरण खचल्याचे पत्र मिळाले होते. त्यानंतर माती आणून त्याठिकाणी उतारात पडलेला खड्डा बुजवण्यात आला होता. गेल्या १ तारखेला धरण फक्त २५ ते ३० टक्केच भरले होते. मात्र, २ तारखेला कोयना परिसरातील नौजा येथे १९० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे पाण्याची पातळी अचानक ९ मीटरने वाढली. त्यामुळे सांडवा भरून वाहू लागला. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ओली माती आणि कोरडी माती यांच्यामध्ये जो काही समन्वय साधला जातो त्यामध्ये फरक पडला आणि त्यामुळे हे धरण फुटले आहे.

Intro:Body:

Dummy


Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.