ETV Bharat / state

रायगडमध्ये CAA आणि NRC विरोधात 'संयुक्त समाज म्हसळा तालुका' तर्फे 'एकता रॅली'चे आयोजन

म्हसळा तालुक्यातील 19 गावांतील विविध समाजाच्या लोकांनी एकत्र येत सीएए आणि एनआरसी विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौचली अली यांनी, देशाचे संविधान बदलण्याचा जर प्रयत्न केला तर रक्तपात होईल, असा इशारा दिला आहे.

author img

By

Published : Jan 3, 2020, 10:06 PM IST

rally for Opposition to CAA and NRC law in Mhasala city
म्हसाळा शहरात संयुक्त समाज म्हसळा तालुका यांच्यातर्फे 'एकता रॅली'चे आयोजन

रायगड - सीएए व एनआरसी लागू केल्यामुळे केंद्र सरकारने मुस्लिम, बौद्ध व ओबीसी समाजाच्या नागरिकांना डिवचण्याचे काम केले आहे. या सरकारने देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर, देशात रक्ताच्या नद्या वाहतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अली कौचली यांनी केले आहे. म्हसळा तालुक्यातील 19 गावांतील विविध समाजाच्या लोकांनी एकत्र येत सीएए आणि एनआरसी विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत कौचली अली बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौचली अली यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... #CAA: २६ वर्ष वाट बघितली तरी कायदा रद्द होणार नाही; अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला

म्हसळा शहरात तालुक्यातील संयुक्त समाजातर्फे केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक कानिफ भोसले यांनी देखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करून सीएए व एनआरसी हे कायदे बहुजन समाजविरोधी असल्याचे म्हटले. संयुक्त समाजातर्फे अंजुमान शाळा ते तहसील कार्यालय म्हसळापर्यंत हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी शांतीपूर्वक मोर्चा काढला. तसेच या कायद्याला आपला विरोध असल्याचे पत्र तहसिलदार यांना देऊन मोर्चाची समाप्ती केली.

हेही वाचा... 'मुस्लीम समुदायाला भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरु'

रायगड - सीएए व एनआरसी लागू केल्यामुळे केंद्र सरकारने मुस्लिम, बौद्ध व ओबीसी समाजाच्या नागरिकांना डिवचण्याचे काम केले आहे. या सरकारने देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर, देशात रक्ताच्या नद्या वाहतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अली कौचली यांनी केले आहे. म्हसळा तालुक्यातील 19 गावांतील विविध समाजाच्या लोकांनी एकत्र येत सीएए आणि एनआरसी विरोधात शांतीपूर्वक मोर्चा काढला. यावेळी आयोजित सभेत कौचली अली बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कौचली अली यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... #CAA: २६ वर्ष वाट बघितली तरी कायदा रद्द होणार नाही; अनुराग ठाकूर यांचा ओवैसींना टोला

म्हसळा शहरात तालुक्यातील संयुक्त समाजातर्फे केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक कानिफ भोसले यांनी देखील केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करून सीएए व एनआरसी हे कायदे बहुजन समाजविरोधी असल्याचे म्हटले. संयुक्त समाजातर्फे अंजुमान शाळा ते तहसील कार्यालय म्हसळापर्यंत हजारोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या नागरिकांनी शांतीपूर्वक मोर्चा काढला. तसेच या कायद्याला आपला विरोध असल्याचे पत्र तहसिलदार यांना देऊन मोर्चाची समाप्ती केली.

हेही वाचा... 'मुस्लीम समुदायाला भडकविण्याचे काम विरोधकांकडून सुरु'

Intro:सी.ए.ए व एन.आर.सी लागू केल्यामुळे केंद्र सरकारने मुस्लिम,बौद्ध व ओबीसीच्या नागरिकांना डिवचण्याचे कामे केले असून,या सरकारने संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास देशात रक्ताच्या नद्या वाहतील असे वक्तव्य राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अली कौचली यांनी सी.ए.ए व एन.आर.सी विरोधात आयोजीत करण्यात आलेल्या सभेत केले.
Body:म्हसळा शहरात तालुक्यातील सयुक्त समजातर्फे शुक्रवारी दुपारी केंद्र सरकारने लागू केलेल्या सी.ए.ए व एन.आर.सी या नवीन कायदया विरोधात सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पुढे बोलताना कौचाली यांनी माजी उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका करीत,पाकिस्तानने ज्या वेळेस भारतीय विमान हायजॅक केला त्या वेळेस पाकिस्तानातील भारतात असणारे दहशतवादी अडवाणी यांनी सोडले असून त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये अशी टीकाही केली.यावेळी या सभेत हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.यापुढे वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापक कानिफ भोसले यांनी देखील केंद्रातील नरेंद मोदी सरकारवर टीका करून सी.ए.ए. व एन.आर.सी हा बहुजन समाज विरोधी असल्याचे सांगत या कायद्याचा विरोध केला.
Conclusion:या नंतर सयुक्त समाजातर्फे अंजुमान शाळा ते तहसील कार्यालय म्हसळा पर्यन्त हजारोच्या संख्येत उपस्थित असणार्‍या नागरिकानी सी.ए.ए व एन.आर.सी विरोधात शांति पूर्वक मोर्चा काढून सी.ए.ए व एन.आर.सी कायद्याला आपल्या विरोध असल्याचा पत्र तहसिलदार यांना देऊन मोर्च्याची समाप्ती केली.

चौकट- सी.ए.ए व एन.आर.सी विरोधातिल सभेत खा.सुनील तटकरे यांच्यावर टीका-

म्हसळा शहरात सी.ए.ए व एन.आर.सी विरोधात घेण्यात आलेल्या सभेत भारत मुक्ति मोर्च्याचे मिलिंद साळवी यांनी खा.सुनील तटकरे यांच्यावर टीका करून ते या कायद्याला विरोध का करीत नाहीत असा सवाल विचारताच पटांगणात टाळ्यांचा गळ्गळाट सुरू झाला.व आयोजकांनी तत्काल त्यांना राजकीय भाषण करण्यापासून रोखले.

चौकट-सी.ए.ए व एन.आर.सी विरोधात मोर्च्या तालुका हिंदू समाजाचा सहभाग नाही-
म्हसळा शहरात घेण्यात आलेल्या सी.ए.ए व एन.आर.सी विरोधी मोर्च्यामध्ये तालुका हिंदू समाजाने आपला सहभाघ दर्शवला नसून,तालुक्यात सयुक्त समाजाची स्थापना कधी झाली असा प्रश्न हिंदू समाजाने उपस्थित केला आहे.



बाईट - अली कौचाली, जेष्ठ नेते, राष्टवादी कॉग्रेस
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.