ETV Bharat / state

सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार... शरद पवार

author img

By

Published : Oct 29, 2019, 8:21 AM IST

येत्या सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालय काय निर्णय काय देईल माहीत नाही, पण समजा मंदिराच्या बाजूने निर्णय झाला, तर हिंदू समाजात आनंद होईल, मात्र मुस्लीम समाजात अस्वस्थता येईल...

शरद पवार मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात संबोधीत करताना

पुणे - येत्या सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालय काय निर्णय काय देईल माहीत नाही, पण समजा मंदिराच्या बाजूने निर्णय झाला, तर हिंदू समाजात आनंद होईल, मात्र मुस्लीम समाजात अस्वस्थता पसरेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. बारामती येथील मर्चंट असोसिएशनच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व कर्जतचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते.

शरद पवार मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात संबोधित करताना

हेही वाचा... 'साहेबांचं कार्य लई मोठ्ठं.. साऱ्या महाराष्ट्राच्या मनातला रणझुंजार नेता'

आज सुदैवाने देशातील मुस्लीम समाजाने सामंजस्यपणा दाखवला आणि न्यायालयाचा निर्णय मंदिराच्या बाजूने आला, तर त्याचे आम्ही स्वागत करू, अशी पवारांनी जाहीर भूमिका घेतली आहे. परंतु, अयोध्येतील जागेप्रकरणी एका बाजूला मंदिर, एका बाजूला मशीद बांधण्याचा न्यायालयाने निर्णय दिला, तर पुन्हा यासंदर्भात काही चर्चा होईल, असे मला वाटत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट

देशातील मंदी आणि अर्थव्यवस्थेबाबत केले भाष्य

सध्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून देशातील उद्योग-व्यापार संकटात आहेत. सरकारमधील लोकांना उद्योगधंद्यामध्ये जो परिणाम झालेला दिसतो, त्याबाबत विचारले तर ते पुलवामा वैगेरे सांगतील. नंतर पुढे हे परिणाम नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे, तर 370, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की 370, व्यापारावर उद्योगधंद्यावर परिणाम काय झाला की 370, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न असू देत तरी 370 अशी उत्तरे सरकारकडून दिले जाईल, असे पवारांनी बोलत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

पुणे - येत्या सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालय काय निर्णय काय देईल माहीत नाही, पण समजा मंदिराच्या बाजूने निर्णय झाला, तर हिंदू समाजात आनंद होईल, मात्र मुस्लीम समाजात अस्वस्थता पसरेल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. बारामती येथील मर्चंट असोसिएशनच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व कर्जतचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते.

शरद पवार मर्चंट असोसिएशनच्या कार्यक्रमात संबोधित करताना

हेही वाचा... 'साहेबांचं कार्य लई मोठ्ठं.. साऱ्या महाराष्ट्राच्या मनातला रणझुंजार नेता'

आज सुदैवाने देशातील मुस्लीम समाजाने सामंजस्यपणा दाखवला आणि न्यायालयाचा निर्णय मंदिराच्या बाजूने आला, तर त्याचे आम्ही स्वागत करू, अशी पवारांनी जाहीर भूमिका घेतली आहे. परंतु, अयोध्येतील जागेप्रकरणी एका बाजूला मंदिर, एका बाजूला मशीद बांधण्याचा न्यायालयाने निर्णय दिला, तर पुन्हा यासंदर्भात काही चर्चा होईल, असे मला वाटत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा... 'मानलेलं जरी असलं, तरी रक्ताच्या नात्याहून कमी नसतं; धनंजय मुंडेंची फेसबूक पोस्ट

देशातील मंदी आणि अर्थव्यवस्थेबाबत केले भाष्य

सध्या देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून देशातील उद्योग-व्यापार संकटात आहेत. सरकारमधील लोकांना उद्योगधंद्यामध्ये जो परिणाम झालेला दिसतो, त्याबाबत विचारले तर ते पुलवामा वैगेरे सांगतील. नंतर पुढे हे परिणाम नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे, तर 370, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की 370, व्यापारावर उद्योगधंद्यावर परिणाम काय झाला की 370, अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न असू देत तरी 370 अशी उत्तरे सरकारकडून दिले जाईल, असे पवारांनी बोलत सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

Intro:Body:
बारामती...

सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार... शरद पवार

उद्याच्या सहा डिसेंबरला देशात एक मोठी गोष्ट घडणार आहे .राम मंदिराबाबत न्यायालय निर्णय देणार आहे. न्यायालय निर्णय काय देईल माहित नाही. समजा मंदिराच्या बाजूने निर्णय झाला ,तर निश्चितच हिंदू समाजात आनंद होईल. पण मुस्लीम समाजात अस्वस्थता येईल. आज सुदैवाने देशातील मुस्लिम समाजाने सामंजस्य पणा दाखवत न्यायालयाचा निर्णय मंदिराच्या बाजूने आला . तर त्याचे आम्ही स्वागत करू. असे जाहीरपणे भूमिका घेतली आहे .परंतु अयोध्येतील जागे प्रकरणी एका बाजूला मंदिर एका बाजूला मशीद बांधण्याचा न्यायालयाने निर्णय दिला , तर पुन्हा यासंदर्भात काही चर्चा होईल असे मला वाटत नाही. असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.


बारामती येथील मर्चंट असोसिएशनच्या रौप्य महोत्सव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व कर्जतचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार उपस्थित होते.

देशाची अर्थव्यवस्था ढासळली असून देशातील उद्योग व्यापार संकटात असल्याबाबतचे भाष्य यावेळी पवारांनी केले

पुढे ते म्हणाले की, सरकारमधील लोकांना उद्योग धंद्याच्या मध्ये जो परिणाम झालेला दिसतो ते कशामुळे झालेला आहे. तर ते सांगतील पुलवामा मग पुढे हे परिणाम नष्ट करण्यासाठी काय केले पाहिजे तर ते सांगतील 370. , कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की 370. व्यापारावर उद्योगधंद्यावर परिणाम काय झाला की 370 .अर्थव्यवस्थेचा प्रश्‍न असू देत तरी 370. कलम 370 रद्द केले हे सर्व ठीक आहे. परंतु त्याचा संबंध आजच्या घडीला कशाला असा सवाल शरद पवार यांनी केला.

सरकारच्या प्रतिकूल धोरणामुळे व्यापार उद्योगांवर विपरीत परिणाम होत आहे. यासंबंधी आधीचे भाष्य करण्याची भूमिका या देशातील लोक घेत नाहीत. मात्र राज्यकर्त्यांनी यासंबंधी निर्णय घेतले पाहिजेत. हे त्यांना कळले नाही. सरकारने व्यापार उद्योगासंबंधी अनुकूल भूमिका घेतली नाही, तर यासंबंधी संसदेत आवाज उठविण्या संबंधी चर्चा चालू असून, त्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेऊ असे, पवार म्हणाले..

Conclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.