ETV Bharat / state

'नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा'

author img

By

Published : Feb 7, 2020, 11:53 PM IST

इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू असल्याचे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा, असेही चव्हाण म्हणाले.

Prutviraj chavan comment on narendra modi
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत बोलताना देशाच्या फाळणीसाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले होते. नेहरूंनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी फाळणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा असेही चव्हाण म्हणाले.

पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. केंद्र सरकार गोंधळलेले आहे. हाताबाहेर गेलेल्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी सरकारला काही करता आले नसल्याचे चव्हाण म्हणाले. नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशभरात सुरू असलेले आंदोलन पाहता असे काही होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. या दुहेरी कचाट्यात सध्या देश सापडलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यापूर्वी एक लोकशाही देश म्हणून, अग्रणी देश म्हणून आपण मार्गक्रमण करत होतो. पण आता आंतरराष्ट्रीय नियतकालिके आपल्यावर टीका करीत आहेत. या सर्वाला मोदी जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

हेही वाचा - 'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी'

हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

सरकार आता गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा, असे चव्हाण म्हणाले.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत बोलताना देशाच्या फाळणीसाठी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले होते. नेहरूंनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी फाळणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली आहे. इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजप सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा असेही चव्हाण म्हणाले.

पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. केंद्र सरकार गोंधळलेले आहे. हाताबाहेर गेलेल्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी सरकारला काही करता आले नसल्याचे चव्हाण म्हणाले. नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशभरात सुरू असलेले आंदोलन पाहता असे काही होईल, याची सरकारला कल्पना नव्हती. या दुहेरी कचाट्यात सध्या देश सापडलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यापूर्वी एक लोकशाही देश म्हणून, अग्रणी देश म्हणून आपण मार्गक्रमण करत होतो. पण आता आंतरराष्ट्रीय नियतकालिके आपल्यावर टीका करीत आहेत. या सर्वाला मोदी जबाबदार आहेत. म्हणून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

हेही वाचा - 'सुटाबुटातल्या सरकारमुळे देशाची अवस्था अतिदक्षता विभागातल्या रुग्णासारखी'

हेही वाचा - रांजणगावमध्ये कार्यक्रमात मराठी अभिनेत्रीसोबत अश्लील वर्तन, मुंबईत गुन्हा दाखल

सरकार आता गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा, असे चव्हाण म्हणाले.

Intro:Pune:-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी संसदेत बोलताना देशाच्या फाळणीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार ठरवले होते. नेहरूंनी पंतप्रधानपद मिळवण्यासाठी फाळणी केल्याचा आरोप त्यांनी केला होता..त्याविषयी विचारले असता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकार गोंधळलेले आहे. हातबाहेर गेलेल्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी सरकारला काही करता आले नाही. नागरिकत्व कायद्यावरून सध्या देशभरात सुरू असलेले आंदोलन पाहता असं काही होईल याची सरकारला कल्पना नव्हती.. या दुहेरी कचाट्यात सध्या देश सापडलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे..यापूर्वी एक लोकशाही देश म्हणून, अग्रणी देश म्हणून आपण मार्गक्रमण करत होतो पण आता आंतरराष्ट्रीय नियतकालिके आपल्यावर टीका करीत आहेत. या सर्वाला मोदी जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे..त्यामुळे सरकार आता गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. त्यामुळे इतिहासाचा संदर्भ न घेता कुठल्याही गोष्टीचा विपर्यास करण्याचं काम भाजप सरकारकडून सुरु आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आधी इतिहास वाचावा आणि मग लोकांना उपदेश करावा..Body:पुणे काँग्रेस कमिटीचे वतीने आयोजित एनआरसी, सीएए विरोध आणि केंद्रीय अर्थसंकल्प कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होतेConclusion:।।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.