ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यातील वाढत्या पावसामुळे बटाटा पीक संकटात; उत्पादनावर होणार परिणाम

उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामाचे मुख्य पिक असलेला बटाटा सध्याच्या संततधार पाऊस व वातावरणातील बदलामुळे संकटात सापडला आहे. शासनाकडून मदत मिळावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

author img

By

Published : Aug 7, 2019, 5:22 PM IST

नुकसान झालेले बटाट्याचे पीक

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामाचे मुख्य पीक असलेला बटाटा सध्याच्या संततधार पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे संकटात सापडले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या पावसामुळे बटाटा पीक संकटात

सातगाव पठारावर खरीप हंगामात ७५० एकर बटाटा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे उगवून आलेला बटाटा पिवळा पडायला सुरुवात झाली आहे. बटाटा उगाल्यानंतर बटाट्याच्या रोपांना सुर्यकिरणांची गरज असते. मात्र, सध्या ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण मिळत नसल्याने बटाट्यांच्या रोपांवर रोगराई पसरत असून तणाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून उत्पन्नावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दुष्काळी संकटातून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या भांडवली खर्चाची गुंतवणूक करत बटाट्याची लागवड केली आहे. मात्र, सध्याचे पावसाचे प्रमाण व वातावरणातील बदल यामुळे खरीप हंगामातील बटाटा संकटात आला आहे.

पुणे - उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामाचे मुख्य पीक असलेला बटाटा सध्याच्या संततधार पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे संकटात सापडले आहे. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाढत्या पावसामुळे बटाटा पीक संकटात

सातगाव पठारावर खरीप हंगामात ७५० एकर बटाटा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे उगवून आलेला बटाटा पिवळा पडायला सुरुवात झाली आहे. बटाटा उगाल्यानंतर बटाट्याच्या रोपांना सुर्यकिरणांची गरज असते. मात्र, सध्या ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण मिळत नसल्याने बटाट्यांच्या रोपांवर रोगराई पसरत असून तणाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून उत्पन्नावरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दुष्काळी संकटातून सावरत शेतकऱ्यांनी मोठ्या भांडवली खर्चाची गुंतवणूक करत बटाट्याची लागवड केली आहे. मात्र, सध्याचे पावसाचे प्रमाण व वातावरणातील बदल यामुळे खरीप हंगामातील बटाटा संकटात आला आहे.

Intro:Anc__उत्तर पुणे जिल्ह्यातील सातगाव पठार भागात खरीप हंगामाचे मुख्य पिक असलेला बटाटा सध्याच्या संततदार पाऊस व वातावरणातील बदलामुळे संकटात सापडला असुन शेतकरी चिंत्तेचे वातावरण आहे..


सातगाव पठारावर खरीप हंगामात ७५० एकर बटाटा पिकाची लागवड करण्यात आली आहे मात्र गेल्या पंधरा वीस दिवसांपासुन या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे त्यामुळे उगवुन आलेला बटाटा पिवळा पडायला सुरुवात झाली आहे बटाटा उगाल्यानंतर बटाट्याच्या रोपांना सुर्यकिरणांची गरज असते मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे सुर्यकिरण मिळत नसल्याने बटाट्यांच्या रोपांवर रोगराई पसरत असुन तणाचे प्रमाण वाढायला लागले असल्याने बटाट्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असुन उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची चिन्ह शेतकरी व्यक्त करत आहे

दरम्यान दुष्काळी संकटातुन सावरत शेतक-यांनी मोठ्या भांडवली खर्चाची गुंतवणूक करत बटाट्याची लागवड केली मात्र सध्याचे पाऊसाचे प्रमाण व वातावरणातील यामुळे खरीप हंगामातील बटाटा संकटात आला आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.