ETV Bharat / state

Wadeshwar Katta: कसबा पोट निवडणूक जाहीर झाल्यानंतर, पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांचा वाडेश्वर कट्टा येथे स्नेह मेळावा

author img

By

Published : Feb 1, 2023, 4:24 PM IST

Updated : Feb 1, 2023, 5:18 PM IST

कसबा विधानसभाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आज पुण्यातल्या डेक्कन येथील वाडेश्वर कट्ट्या येथे सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप सर्व पक्षाचे इच्छुक उमेदवार सुद्धा या कट्ट्याजवळ आले होते. यावेळी त्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या.

Wadeshwar Katta
सर्वपक्षीय नेत्यांचा वाडेश्वर कट्टा येथे स्नेह मेळावा
पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांचा वाडेश्वर कट्टा येथे स्नेह मेळावा

पुणे: पुण्याचा राजकीय संस्कृती ठरलेल्या आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजे वाडेश्र्वर कट्टा. पुण्यात कुठलीही निवडणूक जाहीर झाली की अगोदर वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्ष नेत्यांचा स्नेह मेळावा होत असतो. तसेच आपली कटुता ही निवडणुकीमध्ये जास्त टोकाला जाऊ नये, याची काळजी घेण्याचे काम पुण्यात करण्यात येते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले शैलेश टिळक, धीरज घाटे, हेमंत रासने या उमेदवारांची हजेरी होती. तर शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे, विशाल धनवडे, संजय मोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अंकुश काकडे, काँग्रेसकडून रवींद्र धगेकर, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय वाडेश्वर कट्ट्यामध्ये सहभाग होते.

मतभेद राजकीय: पुढच्या काही दिवसांमध्ये या सगळ्यांच्या जाहीर सभा होतील. यामध्ये एकमेकांवर टीका केली जाईल. आरोप प्रत्यारोप केले जातील. विकासाविषयी बोलले जाईल परंतु यामध्ये कुठलीही कटुता येऊ नये त्यासाठी अगोदरच एकत्र जेवण करणे, एकत्र नाश्ता करणे आणि आपल्यातील मतभेद हे राजकीय आहेत वैयक्तिक नाहीत हा संदेश देण्याचा प्रयत्न यातून दरवर्षी करण्यात येतो. याचे मुख्य आयोजन राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे करत असतात या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असते. पुण्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक जण आपले मत कसबा विधानसभा मतदारसंघाविषयी मांडले आहेत. प्रत्येकाने मी विजयी होईल पक्षाने संधी दिली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. परंतु महाविकास आघाडी किंवा माहिती म्हणून जे काही निर्णय वरिष्ठ स्तरावरून येतील ते आम्हाला मान्य असल्याचे त्यावेळी या उमेदवाराने सांगितलेला आहे.


तिकीट दिले तर चांगलेच: भाजपाचे मुख्य दावेदार असलेले शैलेश टिळक यांनी आपली भूमिका मांडताना कुटुंबातील व्यक्तीला साधारणपणे तिकीट दिल्यानंतर विरोध होणार नाही. परंतु मुक्ताताई टिळक यांचे राहिलेले काम पूर्ण करता यावे यासाठी कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिले तर ते चांगलेच आहे अशी भावना यावेळी त्यांनी मांडली आहे. तर भाजपाचे जे इतर दावेदार आहेत त्यामध्ये नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने यांनी सुद्धा आपली इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आपल्याला संधी द्यावी आणि त्यामुळे आम्हीही उमेदवारी मागितलेली आहे अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहेत.



निवडणूक लढवण्याची इच्छा : महाविकास आघाडी असताना सुद्धा विशाल धनवडे यांनीही तिकीट मागितले आहे. शिवसेनेत पडलेली फुट आणि त्यानंतर शिवसेनेला एक ही संधी आहे सिद्ध करण्याची आणि त्यासाठी आम्ही हे निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. आमच्या पेठाचे ग्रामपंचायती करण्याचे काम भाजपकडून केले आहे. ते आम्हाला दुरुस्त करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. काँग्रेसकडून मुख्य दावेदार असलेले रवींद्र लगीकर यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.



तरुणांना संधी दिली पाहिजे: या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश नाना काकडे यांनी मात्र माझी इच्छा नाही पण पक्षांना दिली तर मी लढेल पण माझी इच्छा आहे. तरुणांना संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक ही खेळीमेळी चांगल्या वातावरणात लढावी यासाठी हा सर्वपक्षीय वाडेश्वर कट्टा आम्ही आयोजित करत असतो. यावर्षीही केलेला यावेळेसही केलेला आहे. त्यामुळे आता निवडणुकांची तयारी करणार आहोत अशी भूमिका सर्वजण मांडली आहेत.



हेही वाचा: Supriya Sule News गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे

पुण्यात सर्वपक्षीय नेत्यांचा वाडेश्वर कट्टा येथे स्नेह मेळावा

पुणे: पुण्याचा राजकीय संस्कृती ठरलेल्या आकर्षणाचा कार्यक्रम म्हणजे वाडेश्र्वर कट्टा. पुण्यात कुठलीही निवडणूक जाहीर झाली की अगोदर वाडेश्वर कट्ट्यावर सर्व पक्ष नेत्यांचा स्नेह मेळावा होत असतो. तसेच आपली कटुता ही निवडणुकीमध्ये जास्त टोकाला जाऊ नये, याची काळजी घेण्याचे काम पुण्यात करण्यात येते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असलेले शैलेश टिळक, धीरज घाटे, हेमंत रासने या उमेदवारांची हजेरी होती. तर शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे, विशाल धनवडे, संजय मोरे हे देखील यावेळी उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अंकुश काकडे, काँग्रेसकडून रवींद्र धगेकर, कमल व्यवहारे, बाळासाहेब दाभेकर हे सर्वपक्षीय वाडेश्वर कट्ट्यामध्ये सहभाग होते.

मतभेद राजकीय: पुढच्या काही दिवसांमध्ये या सगळ्यांच्या जाहीर सभा होतील. यामध्ये एकमेकांवर टीका केली जाईल. आरोप प्रत्यारोप केले जातील. विकासाविषयी बोलले जाईल परंतु यामध्ये कुठलीही कटुता येऊ नये त्यासाठी अगोदरच एकत्र जेवण करणे, एकत्र नाश्ता करणे आणि आपल्यातील मतभेद हे राजकीय आहेत वैयक्तिक नाहीत हा संदेश देण्याचा प्रयत्न यातून दरवर्षी करण्यात येतो. याचे मुख्य आयोजन राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे करत असतात या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती असते. पुण्यामध्ये या ठिकाणी प्रत्येक जण आपले मत कसबा विधानसभा मतदारसंघाविषयी मांडले आहेत. प्रत्येकाने मी विजयी होईल पक्षाने संधी दिली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. परंतु महाविकास आघाडी किंवा माहिती म्हणून जे काही निर्णय वरिष्ठ स्तरावरून येतील ते आम्हाला मान्य असल्याचे त्यावेळी या उमेदवाराने सांगितलेला आहे.


तिकीट दिले तर चांगलेच: भाजपाचे मुख्य दावेदार असलेले शैलेश टिळक यांनी आपली भूमिका मांडताना कुटुंबातील व्यक्तीला साधारणपणे तिकीट दिल्यानंतर विरोध होणार नाही. परंतु मुक्ताताई टिळक यांचे राहिलेले काम पूर्ण करता यावे यासाठी कुटुंबातील व्यक्तींना तिकीट दिले तर ते चांगलेच आहे अशी भावना यावेळी त्यांनी मांडली आहे. तर भाजपाचे जे इतर दावेदार आहेत त्यामध्ये नगरसेवक धीरज घाटे, हेमंत रासने यांनी सुद्धा आपली इच्छा व्यक्त केली आहे. पक्षाने आपल्याला संधी द्यावी आणि त्यामुळे आम्हीही उमेदवारी मागितलेली आहे अशा भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केले आहेत.



निवडणूक लढवण्याची इच्छा : महाविकास आघाडी असताना सुद्धा विशाल धनवडे यांनीही तिकीट मागितले आहे. शिवसेनेत पडलेली फुट आणि त्यानंतर शिवसेनेला एक ही संधी आहे सिद्ध करण्याची आणि त्यासाठी आम्ही हे निवडणूक लढवण्याची इच्छा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. आमच्या पेठाचे ग्रामपंचायती करण्याचे काम भाजपकडून केले आहे. ते आम्हाला दुरुस्त करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. काँग्रेसकडून मुख्य दावेदार असलेले रवींद्र लगीकर यांनी महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.



तरुणांना संधी दिली पाहिजे: या वाडेश्वर कट्ट्याचे आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश नाना काकडे यांनी मात्र माझी इच्छा नाही पण पक्षांना दिली तर मी लढेल पण माझी इच्छा आहे. तरुणांना संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे निवडणूक ही खेळीमेळी चांगल्या वातावरणात लढावी यासाठी हा सर्वपक्षीय वाडेश्वर कट्टा आम्ही आयोजित करत असतो. यावर्षीही केलेला यावेळेसही केलेला आहे. त्यामुळे आता निवडणुकांची तयारी करणार आहोत अशी भूमिका सर्वजण मांडली आहेत.



हेही वाचा: Supriya Sule News गृहमंत्र्यांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा सुप्रिया सुळे

Last Updated : Feb 1, 2023, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.