ETV Bharat / state

परभणीच्या धर्मापुरीत बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

author img

By

Published : Dec 25, 2019, 2:25 AM IST

धर्मापुरी येथे मंगळवारी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन कवी  प्रा. इंद्रजित भालेराव व बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले.

balkumar sahitya
संमेलनाला बालकांची उपस्थिती

परभणी - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे अंतर्गत परभणी शाखेच्या वतीने तालुक्यातील धर्मापुरी येथे मंगळवारी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन कवी प्रा. इंद्रजित भालेराव व बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सानेगुरुजी साहित्य नगरी येथील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर हे संमेलन पार पडले. व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, प्रा. केशव बा. वसेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम, शिवसांब सोनटक्के, प्रा.किरण सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा.दीनानाथ फुलवाडकर, स्वागताध्यक्ष शीतल सोनटक्के, डॉ.आनंद देशपांडे, नितीन फुटाणे यांची उपस्थिती होती.

धर्मापुरीत बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

यावेळी एकनाथ आव्हाड म्हणाले की, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी पुस्तकांंशी मैत्री करावी. आव्हाड यांनी संमेलना प्रसंगी काही बाल कविता देखील सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाची स्मरणिका तसेच शितल सोनटक्के लिखित 'त्यांच जग तिचं जग' व एकनाथ आव्हाड लिखित 'मिसाईल मॅन' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बालक व शिक्षकांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी चित्रकार प्रज्वल ठाकर, आकांक्षा गरड व शिंदे या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

'श्यामची आई' पालकांसाठीच !

संमेलनाचे उद्घाटक कवी इंद्रजित भालेराव बोलताना म्हणाले की, लहान मुलांसाठी लिहिणे सोपे नाही. साने गुरुजींनी लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठीसुद्धा लेखन केले. 'श्यामची आई' हे पुस्तक आपण मुलांसाठी आवश्यक आहे, असे म्हणतो. परंतु, खऱ्या अर्थाने श्यामची आई पुस्तक पालकांसाठीच आवश्यक आहे. बालसाहित्याला जुनी परंपरा असून पहिले बालसाहित्य म्हणजे आईचे अंगाई गीत असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे अंतर्गत परभणी शाखेच्या वतीने तालुक्यातील धर्मापुरी येथे मंगळवारी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन कवी प्रा. इंद्रजित भालेराव व बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सानेगुरुजी साहित्य नगरी येथील बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर हे संमेलन पार पडले. व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, प्रा. केशव बा. वसेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम, शिवसांब सोनटक्के, प्रा.किरण सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा.दीनानाथ फुलवाडकर, स्वागताध्यक्ष शीतल सोनटक्के, डॉ.आनंद देशपांडे, नितीन फुटाणे यांची उपस्थिती होती.

धर्मापुरीत बालकुमार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन

यावेळी एकनाथ आव्हाड म्हणाले की, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात. मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांनी पुस्तकांंशी मैत्री करावी. आव्हाड यांनी संमेलना प्रसंगी काही बाल कविता देखील सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाची स्मरणिका तसेच शितल सोनटक्के लिखित 'त्यांच जग तिचं जग' व एकनाथ आव्हाड लिखित 'मिसाईल मॅन' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. संमेलनासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बालक व शिक्षकांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी चित्रकार प्रज्वल ठाकर, आकांक्षा गरड व शिंदे या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते.

'श्यामची आई' पालकांसाठीच !

संमेलनाचे उद्घाटक कवी इंद्रजित भालेराव बोलताना म्हणाले की, लहान मुलांसाठी लिहिणे सोपे नाही. साने गुरुजींनी लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठीसुद्धा लेखन केले. 'श्यामची आई' हे पुस्तक आपण मुलांसाठी आवश्यक आहे, असे म्हणतो. परंतु, खऱ्या अर्थाने श्यामची आई पुस्तक पालकांसाठीच आवश्यक आहे. बालसाहित्याला जुनी परंपरा असून पहिले बालसाहित्य म्हणजे आईचे अंगाई गीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:
परभणी - अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे अंतर्गत परभणी शाखेच्या वतीने तालुक्यातील धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या परिसरात उभारण्यात आलेल्या सानेगुरुजी साहित्य नगरी येथे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे व्यासपीठावर मंगळवारी विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष तथा प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या उपस्थितीत झाले.Body:

संमेलनाच्या व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारणी कार्यवाह मुकुंद तेलीचेरी, प्रा. केशव बा. वसेकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रशांत गौतम, शिवसांब सोनटक्के, प्रा.किरण सोनटक्के, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, प्रा.दीनानाथ फुलवाडकर, स्वागताध्यक्ष शीतल सोनटक्के, डॉ.आनंद देशपांडे, नितीन फुटाणे
यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, लहान मुलांना खूप प्रश्न पडतात, त्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देणे गरजेचे आहे. खरे तर मोठ्यांनी मुलांच्या प्रश्नाचे उत्तर पाठवून द्यायला हवं. तसेच मला साहित्यासाठी बाहेर अंगापेक्षा अंतरंग खूप महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पुस्तकांशी मैत्री करा, नातं निर्माण करा, असं सांगत बालकविता सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितांना मोठा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात विभागीय बालकुमार साहित्य संमेलनाची स्मरणिका तसेच शितल सोनटक्के लिखित 'त्यांच जग तिचं जग' व एकनाथ आव्हाड लिखित 'मिसाईल मॅन' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमासाठी रंगीत सभामंडप उभारण्यात आला असून रांगोळीने परिसर सुंदर बनवला होता. त्यावेळी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील बालक व शिक्षकांनी परिसर फुलून गेला होता. पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते, तर चित्रकार प्रज्वल ठाकर, आकांक्षा गरड व शिंदे या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शनही भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परभणी शाखेच्या अध्यक्षा शीतल सोनटक्के यांनी केले, पाहुण्यांचा परिचय पल्लवी सूर्यवंशी सूत्रसंचालन त्र्यंबक वडसकर, विशाल मुरकुंदे, वैष्णवी बरबडे तर माणिक पुरी यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सर्व सदस्य व ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या संमेलनात सहभागी होण्यासाठी शिक्षक पालकांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

'श्यामची आई' पालकांसाठीच !
संमेलनाचे उद्घाटक कवि इंद्रजित भालेराव बोलताना म्हणाले की, लहान मुलांसाठी लिहिणं सोपं नाही, साने गुरुजींनी लहान मुलांसाठी व मोठ्यांसाठी सुद्धा लेखन केले. 'श्यामची आई' हे पुस्तक आपण मुलांसाठी आवश्यक आहे, असं म्हणतो. परंतु खऱ्या अर्थाने श्यामची आई पुस्तक पालकांसाठीच आवश्यक आहे, असे ते म्हणाले. बालसाहित्याला जुनी परंपरा असून पहिले बालसाहित्य म्हणजे आईचे अंगाईगीत आहे, असे म्हणून त्यांनी साहित्य परंपरा सांगितली. त्यांनी अनेक बालगीत व कविता सादर केल्या.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis1 & 2, byte :- कवी इंद्रजित भालेराव
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.