पालघर - दहिहंडी उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहाने आणि उस्फुर्तपणे साजरा केला जातो. काही ठिकाणी १५ ते २० फुट उंचीवर दहिहंडी लावली जाते. मागील काही वर्षे उंच हंडीमुळे गोविंदांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे वसई-विरार महापालिकेतर्फे ४६५७ गोविंदाना मोफत विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक कसून सराव करतात. गोविंदा पथकात समाविष्ट गोविंदांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून गेल्या काही वर्षापासून गोविंदा पथकांना मोफत विमा देण्याची योजना महानगरपालिकेने राबवले आहे. 'गोविंदाचा अपघात विमा' या योजनेचा नाव आहे. सुरवातीला योजनेस अत्यल्प प्रतिसाद होता. मात्र, शुक्रवारी ७८ गोविंदा पथकांनी महानगरपालिकेत नोंदणी केली असून एकूण ७५ पथकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेसाठी संपर्क?
ज्या गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा गोविंदा पथकातील गोविंदांना उत्सवाच्या दरम्यान काही अपघात झाल्यास न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या ०२५०-२३३२९०१, विल्सन नरोन्हा ९५९४७६२७२ तसेच अरुणा जाधव ९०११२९८८८९ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन क्रीडा विभागाचे उपआयुक्त डॉ. किशोर गवस यांनी केले.