ETV Bharat / state

रेशनकार्ड, जीवनावश्यक गोष्टींसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन; प्रशासनाने ताब्यातील आंदोलकांना सोडले

author img

By

Published : May 28, 2020, 10:59 AM IST

जीवनावश्यक वस्तूंच्या हक्कासाठी २६ मेपासून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर "हक्काग्रह" आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे आंदोलनात सहभागी झाले.

ttr
आंदोलकांशी चर्चा करताना पोलीस

पालघर - रेशन कार्ड आणि जीवनावश्यक वस्तूंच्या हक्कासाठी २६ मेपासून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर "हक्काग्रह" आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत यांनी आंदोलनात सहभागी होत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र प्रशासनाने इतर आंदोलकांना सोडून दिले.

रेशनकार्ड, जीवनावश्यक गोष्टीसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन; प्रशासनाने ताब्यातील आंदोलकांना सोडले

आंदोलनाचा दुसरा दिवस असून शांततेत आणि शासनाचे सर्व नियम पाळून आंदोलन सुरू होते. डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील श्रमजीवीच्या 31 आंदोलकांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर मात्र प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेत आंदोलकांना सोडून दिले.

आंदोलन कशासाठी?

लॉकडाऊन काळात वंचित गरीबांना रेशनकार्ड आणि धान्यासोबतच इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारने हमीपत्र देत पंडित यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या. मात्र न्यायालयाने आदेश देऊनही त्या हमीपत्राची अंमलबजावणी सरकारकडून झालेली नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी श्रमजीवी संघटनेमार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर हक्काग्रह आंदोलन सुरू केले आहे.

पालघर - रेशन कार्ड आणि जीवनावश्यक वस्तूंच्या हक्कासाठी २६ मेपासून जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयासमोर "हक्काग्रह" आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडीत यांनी आंदोलनात सहभागी होत अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र प्रशासनाने इतर आंदोलकांना सोडून दिले.

रेशनकार्ड, जीवनावश्यक गोष्टीसाठी श्रमजीवी संघटनेचे आंदोलन; प्रशासनाने ताब्यातील आंदोलकांना सोडले

आंदोलनाचा दुसरा दिवस असून शांततेत आणि शासनाचे सर्व नियम पाळून आंदोलन सुरू होते. डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनातील श्रमजीवीच्या 31 आंदोलकांना डहाणू पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी अचानक केलेल्या कारवाईमुळे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर मात्र प्रशासनाने बचावात्मक पवित्रा घेत आंदोलकांना सोडून दिले.

आंदोलन कशासाठी?

लॉकडाऊन काळात वंचित गरीबांना रेशनकार्ड आणि धान्यासोबतच इतर जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून विवेक पंडित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारने हमीपत्र देत पंडित यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या. मात्र न्यायालयाने आदेश देऊनही त्या हमीपत्राची अंमलबजावणी सरकारकडून झालेली नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी श्रमजीवी संघटनेमार्फत जिल्ह्यातील तहसील कार्यालयावर हक्काग्रह आंदोलन सुरू केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.