ETV Bharat / state

चक्रीवादळात अडकलेल्या बोटी किनाऱ्यावर येऊ लागल्या

वादळात सापडलेल्या मच्छिमार बोटी सुखरूपपणे जमेल तो जवळचा किनारा गाठत आहेत. सातपाटी भागातील काही पाच बोटींनी उंबरगाव येथे आश्रय घेतला असल्याची माहिती मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील व मच्छिमार संघटनेचे पंकज पाटील यांनी सांगितले.

author img

By

Published : Oct 17, 2020, 4:20 PM IST

पालघर
पालघर

पालघर - अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टी भागातून निघालेले वादळ अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात पोहचले आहे. या वादळाची तीव्रता वाढल्याने पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार बांधव अडकून पडले होते. ते आता बोटिसह परतत आहेत. या वादळात सापडलेल्या मच्छिमार बोटी सुखरूपपणे जमेल तो जवळचा किनारा गाठत आहेत.

अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवरील हे चक्रीवादळ आता अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. पालघर मधील सातपाटी येथील काही बोटी मासेमारी करिता समुद्रात गेल्या होत्या. समुद्रात वादळ वाढल्याने या बोटी परतत आहेत. यातील सातपाटी भागातील काही पाच बोटींनी उंबरगाव येथे आश्रय घेतला असल्याची माहिती मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील व मच्छिमार संघटनेचे पंकज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - 'अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त, तातडीच्या मदतीसह ओला दुष्काळ जाहीर करा'

सातपाटी येथील 436 बोटी आहेत, तर या किनारपट्टी भागात 1 हजारहून अधिक बोटी मासेमारीसाठी जात असतात. या सर्व बोटी आता किनाऱ्यावर परतत आहेत. दरम्यान पालघर जिल्हा प्रशानाच्यावतीने मच्छिमार लोकांनी काही दिवस समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

पालघर - अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टी भागातून निघालेले वादळ अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टी भागात पोहचले आहे. या वादळाची तीव्रता वाढल्याने पालघर जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेले मच्छिमार बांधव अडकून पडले होते. ते आता बोटिसह परतत आहेत. या वादळात सापडलेल्या मच्छिमार बोटी सुखरूपपणे जमेल तो जवळचा किनारा गाठत आहेत.

अरबी समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवरील हे चक्रीवादळ आता अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. पालघर मधील सातपाटी येथील काही बोटी मासेमारी करिता समुद्रात गेल्या होत्या. समुद्रात वादळ वाढल्याने या बोटी परतत आहेत. यातील सातपाटी भागातील काही पाच बोटींनी उंबरगाव येथे आश्रय घेतला असल्याची माहिती मच्छिमार कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील व मच्छिमार संघटनेचे पंकज पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - 'अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त, तातडीच्या मदतीसह ओला दुष्काळ जाहीर करा'

सातपाटी येथील 436 बोटी आहेत, तर या किनारपट्टी भागात 1 हजारहून अधिक बोटी मासेमारीसाठी जात असतात. या सर्व बोटी आता किनाऱ्यावर परतत आहेत. दरम्यान पालघर जिल्हा प्रशानाच्यावतीने मच्छिमार लोकांनी काही दिवस समुद्रात बोटी घेऊन जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.