नाशिक - येवला तालुक्यातील देशमाने शिवारात जनावरांची वाहतूक करणारी कार अज्ञातांनी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या कारमधून 2 गायी व 1 बैलाची वाहतूक करण्यात येत होती.
हेही वाचा - 'वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या स्नातकांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवा द्यावी'
कारमधून जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याचे समजताच देशमाने परिसरातील स्थानिक नागरिकांनी कार थांबवून त्यातील एक बैल आणि 2 गाईंना बाहेर काढले. त्यांनतर त्यांनी ही कार पेटवून दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.